शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

औरंगाबादच्या कचऱ्यासाठी अखेर यंत्रे घेण्याचे निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:16 IST

शहरातील कचरा प्रश्नात राज्य शासनाने यापूर्वीच लक्ष घातले असून, कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी ९० मेट्रिक टन क्षमतेच्या ९ मशीन खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी घेण्यात आला.

ठळक मुद्देशासन निर्णय : सात दिवसांची निविदा आज निघणार

औरंगाबाद : शहरातील कचरा प्रश्नात राज्य शासनाने यापूर्वीच लक्ष घातले असून, कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी ९० मेट्रिक टन क्षमतेच्या ९ मशीन खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी घेण्यात आला. बुधवारी यंत्र खरेदीची निविदा काढण्यात येणार आहे. ही निविदा अल्प मुदतीची राहणार असून, ३१ मार्चपूर्वी यंत्रांच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण होईल यादृष्टीने शासनाने पाऊल उचलले आहे. विशेष बाब म्हणजे यंत्र खरेदीचा आर्थिक भार महापालिकेवर पडणार नाही.

१६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला तरी कोणताच ठोस निर्णय घेण्यात येत नव्हता. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनीही औरंगाबादेत येऊन कचरा प्रश्न सोडविण्यासाठी पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याची सूचना केली होती. महापालिकेने या पंचसूत्रीवर कोणतीही अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे परिस्थिती ‘जैसे थे’ होती. सोमवारी सचिव सुधाकर बोबटे यांना खास औरंगाबादेत पाठविण्यात आले. मागील दोन दिवसांमध्ये त्यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांच्यासोबत चर्चा करून मशीन खरेदीचे निश्चित केले.

मनपाच्या प्रत्येक झोनमध्ये १० मेट्रिक टन क्षमतेची यंत्रणा बसविण्यात येईल. एका यंत्रणेचा खर्च १६ लाखांपर्यंत राहील. यामध्ये श्रेडर यंत्र ओल्या कचºयाला एका चौकटीत आणून प्रक्रिया करील, तर बेलिंग मशीन सुक्या कचºयावर प्रक्रिया करील. सोबतच स्क्रीनिंग मशीनही राहतील. प्रत्येक झोनमध्ये तीन म्हणजे एकूण २७ मशीन लावण्यात येतील. सुमारे ५ कोटी रुपये या कामावर खर्च होणार आहेत. राज्य शासन दहा कोटी रुपये युद्धपातळीवर महापालिकेला देणार आहे. त्यामुळे मनपावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. महापालिका बुधवारी मशीन खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध करणार आहे. ७ दिवसांची ही निविदा राहणार असून, त्यानंतर लगेच संबंधित कंपनीला वर्क आॅर्डर देण्यात येईल.

कचरा प्रश्नावर बैठकांचे सत्र सुरूचशहर आणि आसपास कुठेच कचरा साठवून ठेवता येणार नाही, हे माहीत असूनही महापालिकेने कचराकोंडीवर कोणताच तोडगा काढलेला नाही. मागील एक महिन्यात पन्नासपेक्षा अधिक बैठका घेण्यात आल्या आहेत. मात्र, ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. आजही शहरातील प्रमुख रस्त्यांवर १० हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. नागरिक दररोज या कचºयाला आग लावून देत आहेत. धुरामुळे परिसरात राहणाºया

नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.शहरात कोणतीही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिका कायद्यात अत्यावश्यक बाबींच्या खरेदीची मुभा आहे. ६७-३-सी या कलमाचा वापर आजपर्यंत महापालिकेत दहा हजार वेळेस करण्यात आला असेल. जलवाहिन्या टाकणे, गट्टू बसविणे, फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करणे आदी अनेक कामांसाठी या कलमाचा वापर झाला आहे. मागील एक महिन्यापासून शहरात कचºयामुळे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. साठलेल्या कचºयामुळे रोगराई पसरू शकते. सुदैवाने अद्यापपर्यंत रोगराई पसरलेली नाही. मात्र, महापालिका प्रशासन आणीबाणीच्या कायद्याचा वापर करायला अजिबात तयार नाही. पदाधिकाºयांनी अनेकदा सूचना केल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कचºयावर प्रक्रिया करणाºया मशीन निविदा पद्धतीनेच खरेदी करणार, हा प्रशासनाचा हट्ट कायम आहे.

मंगळवारी राज्य शासनाचे सचिव सुधाकर बोबडे यांच्या उपस्थितीत कचºयावर प्रक्रिया करणाºया कोणत्या मशीन खरेदी करायच्या, हे निश्चित झाले. त्यासाठीही निविदा पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. इच्छुक कंपन्यांनी ७ दिवसांत निविदा भराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.यंत्रसामुग्री खरेदीसाठी संपूर्ण रक्कम राज्य शासन देत आहे. बुधवारपर्यंत महापालिकेला सुमारे १० कोटींचा निधीही प्राप्त होणार आहे. शासन उदार अंत:करणाने या समस्येत मदत करायला तयार असतानाही महापालिका तत्परतेने काम करायला तयार नाही. सर्वसाधारण सभा, स्थायी समिती आणि महापालिकेत अद्यापपर्यंत पन्नासपेक्षा अधिक बैठका यासंदर्भात घेण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपो