शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
5
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
6
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
7
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
8
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
9
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
10
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
11
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
12
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
13
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
14
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
15
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
16
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
17
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
18
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
19
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
20
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई

७० च्या दशकानंतर चळवळी अस्तित्वहीन होत गेल्याने राज्यसंस्था निरंकुश - प्रकाश पवार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 20:01 IST

भारतात १८१८ साली अस्तीत्वात आलेल्या राज्यसंस्थेवर तेव्हापासून ते १९७० पर्यंत चळवळींनी अंकुश ठेवला होता. चळवळींच्या धोरणांवर राज्य संस्था निर्णय घेत होती. मात्र ७० च्या दशकानंतर चळवळी अस्तित्वहीन होत गेल्या. याचा परिणाम राज्यसंस्था निरंकुश सत्ताधिश झाली आहे. हे सामाजिक हिताच्या दृष्टीकोणातुन धोक्याचे असल्याचे मत राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात दोनदिवसीय मोईन शाकीर व्याख्यानमालेला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी डॉ. प्रकाश पवार यांनी ‘भारतीय राज्यसंस्था आणि चळवळींचे संबंध’ या विषयावर भाष्य केले.

औरंगाबाद : भारतात १८१८ साली अस्तीत्वात आलेल्या राज्यसंस्थेवर तेव्हापासून ते १९७० पर्यंत चळवळींनी अंकुश ठेवला होता. चळवळींच्या धोरणांवर राज्य संस्था निर्णय घेत होती. मात्र ७० च्या दशकानंतर चळवळी अस्तित्वहीन होत गेल्या. याचा परिणाम राज्यसंस्था निरंकुश सत्ताधिश झाली आहे. हे सामाजिक हिताच्या दृष्टीकोणातुन धोक्याचे असल्याचे मत राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात दोनदिवसीय मोईन शाकीर व्याख्यानमालेला गुरुवारपासून सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. श्रीराम निकम होते. संयोजक डॉ. प्रशांत अमृतकर यांची उपस्थिती होती. पहिल्या दिवशी डॉ. प्रकाश पवार यांनी ‘भारतीय राज्यसंस्था आणि चळवळींचे संबंध’ या विषयावर भाष्य केले. यात ते म्हणाले, भारतात १८१८ साली राज्य संस्था अस्तित्वात आल्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याची चर्चा सुरु झाली. पुढे महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, कृष्णाजी केळुसकर गुरूजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेकांनी राज्य संस्थाही गोरगरीब, वंचितांसाठी कार्य करणारी असली पाहिजे, अशी मांडणी केली. आग्रह धरला. महात्मा फुले यांनी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडा रचुन ते कुळवाडीभूषण असल्याचे दाखवून दिले. म्हणजेच शिवाजी महाराजांनी शेतकरी, गोरगरीबांसाठी राज्याची निर्मिती केली. तर आताच्या राज्यसंस्थांनीही त्यांच्यासाठी राज्य राबविले पाहिजे, असा आग्रह महात्मा फुुले धरतात.

यातुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुढेच पाऊल टाकत शोषित, वंचितांच्या न्यायासाठी लढा उभारतात. त्यांच्या जोडीलाच छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड या  सत्ताधिशांनी राज्यसंस्था गोरगरीबांसाठी प्रत्यक्षात राबविली. या चळवळीत स्वत: झोकून दिलेले असल्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत स्टेट सोशालिझमची मांडणी केली. राज्यसंस्थेने सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत,‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ योजना राबविल्या पाहिजेत, ही अपेक्षा होती. स्वातंत्र्यानंतर १९४७ ते ६५ या काळात राज्यसंस्था लोकांसाठीच वापरली गेली. चळवळींचा अजेंडा राज्य सरकार स्विकारत होते. मात्र या काळानंतर परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. १९८० पासून चळवळींना वाटू लागले आम्हाला काहीतरी मिळाले पाहिजे, तशी परिस्थितीही सरकारने तयार करुन ठेवली होती. यामुळे चळवळींच्या अस्ताचा प्रारंभ सुरु झालेला होता. जागतिकिकरणानंतर त्यात वेगाने भर पडली, असल्याचेही डॉ. प्रकाश पवार यांनी सांगितले. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक  डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. हरी सोनकांबळे यांनी केले. शुक्रवारी डॉ. पवार हे ‘भारजीय राज्यसंस्था व तंत्रज्ञानाचे संबंध’ या विषयाची मांडणी करणार आहेत.

एका पदासाठी चळवळ गहाणमागील काही वर्षांपासून चळवळीच्या प्रमुखाला आमदार, खासदार, मंत्री किंवा इतर कोणते पद दिले की अख्खी चळवळ संबंधितांच्या पायाथ्याशी नेवून ठेवण्याचा प्रकार वाढला आहे. याचा परिणाम राज्यसंस्था चळवळींचा कोणाताही अजेंडा स्विकारणे तर सोडा साधा विचारही करण्यास तयार नसल्याचेही डॉ. पवार म्हणाले.

ही आहेत चळवळींच्या -हासाची कारणेडॉ. प्रकाश पवार यांनी व्याख्यानानंतर खुल्या प्रश्नोत्तरात चळवळींच्या -हासाची कारणे सांगितली. यात चळवळीतील कार्यकर्ते, नेत्यांचा तोकडा अभ्यास, लोकांमध्ये मिसळण्याचा आभाव आणि चळवळ घडविण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण नसणे, तसे वातावरण राज्यसंस्थाही निर्माण होऊ देत नाही. ही चळवळीच्या -हासाची कारणे असल्याचे डॉ. पवार म्हणाले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद