शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

९६ दिवसांनंतर मकबऱ्याचे दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जनजीवन पुन्हा सुरळीत सुरू झाले असून, बुधवारपासून पर्यटनस्थळही अनलॉक करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. यामुळे ...

औरंगाबाद : जनजीवन पुन्हा सुरळीत सुरू झाले असून, बुधवारपासून पर्यटनस्थळही अनलॉक करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. यामुळे तब्बल ९६ दिवसांनंतर बीबी का मकबऱ्याचे दरवाजे बुधवारी उघडले. शहरातील ५०० हौशी नागरिकांनी या संधीचा फायदा उचलत मकबऱ्याला भेट देत बराच वेळ या ऐतिहासिक वास्तूत घालविला.

अनलॉकनंतर बुधवारी बीबी का मकबरा उघडला; पण पाणचक्की, छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तुसंग्रहालय मात्र पर्यटकांसाठी बंदच होते.

पर्यटनस्थळ अनलॉक होणे हे पर्यटनाच्या राजधानीच्या अर्थकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय होय. कारण, येथे जागतिक वारसा अजिंठा, वेरूळ लेणी, दौलताबादचा किल्ला, दख्खन का ताज बीबी का मकबरा, पाणचक्की, औरंगाबाद लेणी व धार्मिक तीर्थक्षेत्रांमुळे दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक येथे येत असतात. त्यावर हॉटेल उद्योग, ट्रॅव्हल्स एजन्सी, रेस्टारंट, पैठणी उद्योग, लहान- मोठे व्यावसायिक, असा हजारो लोकांचा रोजगार अवलंबून आहे.

यामुळे पर्यटनस्थळ सुरू झाल्याने या उद्योगातील लोकांनी निर्णयाचे स्वागत केले. शहरातील फक्त बीबी का मकबरा बुधवारी पर्यटकांसाठी उघडण्यात आला होता. सुरक्षा रक्षक व पुरातत्व विभागातील कर्मचाऱ्यांनी सकाळी मकबऱ्याचा दरवाजा उघडला. कर्मचाऱ्यांनी साफसफाईला सुरुवात केली. तोपर्यंत १० वाजून गेले होते. दिवसभरात विदेशातील एकाच पर्यटकाने मकबऱ्याला भेट दिली. बाहेरगावाहून शहरातील नातेवाइकांना भेटण्यासाठी आलेली काही कुटुंबे होती. त्यांनी पर्यटनस्थळ सुरू झाल्याचा संधीचे सोने करीत मकबरा पाहिला, तसेच शहरातील काही जण कुटुंबीयांसह येत होते. दुपारी उन्हाचा पारा वाढल्याने संख्या रोडावली होती; पण सायंकाळी काही जण हौशीने सहपरिवार मकबऱ्यात आले होते. शुक्रवार ते रविवार या काळात मकबऱ्याला भेट देणाऱ्यांची संख्या वाढेल, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

चौकट

माहेरवाशिणी रमल्या मकबऱ्यात

उस्मानपुरा येथील इंदिरा गांधी मराठी कन्या विद्यालयातील काही माजी विद्यार्थिनी लग्न झाल्यानंतर वेगवेगळ्या शहरांत स्थलांतरित झाल्या. मात्र, या सगळ्या जणी सध्या शहरात आपल्या माहेरी आल्या आहेत. त्या एकमेकींशी संवाद साधत मकबऱ्यात भेटल्या. त्यांनी बराच वेळ तेथे व्यतीत केला. स्वाती म्हस्के, भाग्यशाली त्रिभुवन, सोनाली मुसळेसह अन्य मैत्रिणींनी सेल्फी काढत आनंद व्यक्त केला.

चौकट

नागरिकांची निराशा

देवळाई येथील रहिवासी अल्ताफ शेख हे आपल्या आईला घेऊन मकबऱ्यात आले होते. त्यांनी सांगितले की, मकबऱ्यातील मुख्य कबर, तिच्या भोवतीचा परिसर देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवला आहे. यामुळे कबरीचे दर्शन घेता आले नाही. नाराजी व्यक्त करणारी अशी काही कुटुंबेही आमच्या प्रतिनिधीला भेटली.

चौकट

उद्यापासून सुरू होणार पुराण वस्तुसंग्रहालय

वक्फ बोर्डाच्या आधिपत्याखाली असलेली पाणचक्की उघडण्याची परवानगी बुधवारी देण्यात आली नाही. यामुळे नागरिक पाणचक्कीच्या गेटजवळ चौकशी करून पुढे मकबऱ्याकडे जात होते. मनपाच्या अखत्यारीत येणारे छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तुसंग्रहालय शुक्रवारपासून सुरू होणार असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. औरंगाबाद लेणीला भेट देणाऱ्यांची संख्याही अत्यल्प होती.

चौकट

औरंगाबादमध्ये पर्यटन हंगाम ऑक्टोबर ते मार्च हा ६ महिन्यांचा असतो. आता पर्यटन खुले झाले, तर पर्यटक ऑक्टोबरच्या पुढील महिन्यात पर्यटनाला येण्याचे नियोजन करतात. याचा फायदा येथील पर्यटन उद्योगाला होईल.

-जसवंतसिंग राजपूत,

अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन