शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अ‍ॅड. गायके आणि नानासाहेब पाटील यांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:33 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेले अ‍ॅड. सदाशिव गायके आणि नानासाहेब पाटील यांना मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी गुरुवारी (दि.२८) न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले होते.

ठळक मुद्देसुरेश पाटील आत्महत्या प्रकरण

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेले अ‍ॅड. सदाशिव गायके आणि नानासाहेब पाटील यांना मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी गुरुवारी (दि.२८) न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले होते.अ‍ॅड. गायके यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (दि.१) सत्र न्यायालयात सुनावणी होईल. नानासाहेब पाटील यांच्या जामीन अर्जावरसुद्धा शुक्रवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.सरकारी वकील सूर्र्यकांत सोनटक्के यांनी गुरुवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले की, पोलीस कोठडीत गायके आणि पाटील यांनी तपासामध्ये सहकार्य केले नाही. २० वर्षे छळ करण्यामागचा उद्देश तपासण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली. त्यांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याची विनंती सोनटक्के यांनी केली. तक्रारदार नितीन सुरेश पाटील यांच्या वतीने अ‍ॅड. अभयसिंह भोसले यांनी सरकारी वकिलांना साह्य केले.अ‍ॅड. गायके यांच्या वतीने अ‍ॅड. सोमनाथ, एस. एस. लड्डा आणि अ‍ॅड. सागर एस.लड्डा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, पोलिसांच्या ताब्यात असताना आरोपींनी सर्वतोपरी सहकार्य केले आहे. पोलिसांनी जुन्याच मुद्यावर वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली आहे. आरोपींकडून काहीही हस्तगत करावयाचे नसल्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीची गरज नाही. नानासाहेब पाटील यांच्या वतीने अ‍ॅड. कय्युम शेख यांनीही पोलीस कोठडी देऊ नये, अशी विनंती केली.सुनावणीअंती न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर गायके यांच्या वतीने अ‍ॅड. लड्डा यांनी बुधवारी (दि. २७) सत्र न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला असून, त्या अर्जावर शुक्रवारी (दि.१ मार्च) सुनावणी ठेवण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर नानासाहेब पाटीलच्या वतीने अ‍ॅड. कय्युम यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने सरकार पक्षाला त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले. तपास अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी एक दिवसाचा वेळ मागून घेतला. शुक्रवारी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.----------------

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी