शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

औरंगाबादसह राज्यातील २५ जिल्हा परिषद, २८३ पंचायत समित्यांचा कारभार प्रशासकांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 14:42 IST

मुदतीत निवडणुका घेता येत नसल्याने निवडणूक विभागाच्या पत्रानंतर राज्य सरकारचा निर्णय

औरंगाबाद : जि. प. आणि पं.स.च्या मुदतीत निवडणुका घेणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला पत्र पाठविल्यानंतर औरंगाबादसह राज्यातील २५ जि. प. आणि २८३ पं. स.वर प्रशासक नियुक्तीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. संबंधित जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पं. स.चे गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रशासक पदाची धुरा सोपविण्यात आली.

औरंगाबादसह राज्यातील २५ जि. प.चे विद्यमान अध्यक्ष, विषय समिती सभापतींची मुदत २० मार्च रोजी समाप्त होणार आहे. यासोबतच औरंगाबाद जिल्ह्यातील ९ सह राज्यांतील २८३ पं. स.च्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांची पंचवार्षिक मुदत १३ मार्च रोजी समाप्त होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय दिला. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली.

या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित करू शकते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे आणि प्रभाग गट रचनेचा अधिकार स्वत:कडे घेणारा कायदा संमत केला. या कायद्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेेणे आणि प्रभाग रचना, गट रचना करण्याचे आदेश राज्य सरकारकडून दिले जातील. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र पाठवून २० मार्च रोजी मुदत संपणाऱ्या जि. प. आणि १३ मार्च रोजी मुदत समाप्त होत असलेल्या पं. स.च्या निवडणुका कालमर्यादेपर्यंत घेता येणे शक्य नसल्याचे नमूद केले. या पत्राचा संदर्भ देत राज्य सरकारने हे आदेश जारी केले. या आदेशानुसार जि. प.चे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी हे जि.प.चे तर पं. स.चे गटविकास अधिकारी हे पं.स.चे प्रशासक म्हणून काम पाहतील.

निवडणूक होईपर्यंत असेल प्रशासकपं. स. आणि जि. प. पंचवार्षिक निवडणुका होऊन नवीन अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची निवड होईपर्यंत प्रशासक कारभार पाहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार