शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
ना पाकिस्तान, ना अफगानिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकानंच केला खुलासा
3
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
4
इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
6
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
7
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
8
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
9
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
10
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
11
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
12
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
13
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
14
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
15
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
16
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
17
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
18
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
19
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
20
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?

नऊ महिन्यांपासून प्रशासकीय राजवट; संपूर्ण नियोजन कोलमंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 20:43 IST

प्रशासन ओल्या दुष्काळाचे पंचनामे करीत आहे; परंतु पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न आहे. 

- विकास राऊत 

औरंगाबाद : जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) बैठक फेबु्रवारी महिन्यापासून झालेली नाही. परिणामी, ९ महिन्यांपासून प्रशासकीय राजवट जिल्ह्यात लागू असून, उन्हाळ्यातील कोरडा आणि पावसाळ्यातील ओला दुष्काळ निवडणूक आचारसंहिता आणि रणधुमाळीत हरवला. या ९ महिन्यांत शेतकरी दोन्ही बाजूंनी होरपळला असून, निवडणुकीच्या धामधुमीत त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. उन्हाळ्यात पूर्ण जिल्ह्यात दुष्काळाचे चटके बसले. लोकसभा निवडणुकीत त्याकडे दुर्लक्ष झाले, तर ओल्या दुष्काळाकडे विधानसभेच्या निवडणुकीमुळे दुर्लक्ष झाले.

जिल्ह्याला वित्त व नियोजन विभागाकडून आर्थिक मर्यादेसह २५८ कोटी २ लाख रुपयांची तरतूद होण्याची शक्यता होती. ५२ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी प्रशासनाने केली होती. १ एप्रिलपासून आजवर प्रशासनाने जिल्ह्यात काय कामे केली, याची कुठलीही माहिती दिलेली नाही. ९ महिन्यांपासून प्रशासकीय कारभार सुरू असून, योजनांच्या अंमलबजावणीबाबत कुणीही बोलत नाही. 

२६ कोटी रुपयांच्या रस्ते कामांना जि.प. प्रशासनाने मंजुरी दिली होती. ती कामे आचारसंहिता आणि राजकारणामुळेअडकली. ज्या गावांतील इतर मार्गांचे काम रखडलेले आहे. ती कामे निवडणुकीमुळे लांबणीवर पडली. शिवसेनेतील राजकीय वादामुळे २०१८ मध्ये काही कामे रद्द करण्यावरून वाद झाले होते. २०१९ मध्येदेखील काही कामे रद्द करण्यावरून वाद झाले. २ फेबु्रवारी २०१९ रोजी नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर आजवर प्रशासकीय राजवट असल्यासारखेच कामकाज सुरू आहे. 

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे पालकमंत्री पद गेल्यानंतर डॉ. दीपक सावंत यांना १७ जानेवारी २०१८ पासून ७ जानेवारी २०१९ पर्यंतचा कार्यकाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मिळाला. सावंत यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपल्यामुळे ७ जानेवारी २०१९ रोजी त्यांनी पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.

निवडणुकीतच गेले ९ महिने पालकमंत्री शिंदे यांनी २ फेबु्रवारी रोजी डीपीसीची बैठक घेतली. त्यानंतर १० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली. २७ मेपर्यंत ती आचारसंहिता होती. त्यानंतर औरंगाबाद-जालना विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागली. सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली. २४ आॅक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल लागले. १८ दिवसांपासून राज्यात सरकार नाही. प्रशासन ओल्या दुष्काळाचे पंचनामे करीत आहे; परंतु पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयGovernmentसरकारMarathwadaमराठवाडा