शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा.."; राज ठाकरे यांचे आयोगाला 'ओपन चॅलेंज'
2
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
3
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
4
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
5
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
6
Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
7
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
8
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
9
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
10
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
11
IND W vs ENG W World Cup 2025 Match LIVE Streaming : सेमीचं परफेक्ट सेमीकरण सेट करण्याचं चॅलेंज
12
जैन समाजाने दाखवलं एकीचं बळ! एकाचवेळी खरेदी केल्या १८६ लक्झरी कार; प्रत्येक गाडीवर किती डिस्काउंट?
13
महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर...
14
अतूट प्रेम! लेकाच्या मृत्यूनंतर काही क्षणात आईनेही सोडला जीव; एकत्र काढली अंत्ययात्रा
15
पैसे तयार ठेवा! ऑनलाईन शॉपिंग कंपनी मीशो IPO आणण्यासाठी सज्ज! किती कोटींचा निधी उभारणार?
16
Smriti Mandhana Soon Marry : ठरलं! टीम इंडियाची 'क्वीन' लवकरच उरकणार लग्न; तिच्या 'राजकुमारानं'च दिली हिंट
17
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
18
Video - कामाचा मोबदला! रशियन महिलेने मेडला दिला महिन्याला ४५ हजार पगार, चर्चेला उधाण
19
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
20
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...

नऊ महिन्यांपासून प्रशासकीय राजवट; संपूर्ण नियोजन कोलमंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 20:43 IST

प्रशासन ओल्या दुष्काळाचे पंचनामे करीत आहे; परंतु पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न आहे. 

- विकास राऊत 

औरंगाबाद : जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) बैठक फेबु्रवारी महिन्यापासून झालेली नाही. परिणामी, ९ महिन्यांपासून प्रशासकीय राजवट जिल्ह्यात लागू असून, उन्हाळ्यातील कोरडा आणि पावसाळ्यातील ओला दुष्काळ निवडणूक आचारसंहिता आणि रणधुमाळीत हरवला. या ९ महिन्यांत शेतकरी दोन्ही बाजूंनी होरपळला असून, निवडणुकीच्या धामधुमीत त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. उन्हाळ्यात पूर्ण जिल्ह्यात दुष्काळाचे चटके बसले. लोकसभा निवडणुकीत त्याकडे दुर्लक्ष झाले, तर ओल्या दुष्काळाकडे विधानसभेच्या निवडणुकीमुळे दुर्लक्ष झाले.

जिल्ह्याला वित्त व नियोजन विभागाकडून आर्थिक मर्यादेसह २५८ कोटी २ लाख रुपयांची तरतूद होण्याची शक्यता होती. ५२ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी प्रशासनाने केली होती. १ एप्रिलपासून आजवर प्रशासनाने जिल्ह्यात काय कामे केली, याची कुठलीही माहिती दिलेली नाही. ९ महिन्यांपासून प्रशासकीय कारभार सुरू असून, योजनांच्या अंमलबजावणीबाबत कुणीही बोलत नाही. 

२६ कोटी रुपयांच्या रस्ते कामांना जि.प. प्रशासनाने मंजुरी दिली होती. ती कामे आचारसंहिता आणि राजकारणामुळेअडकली. ज्या गावांतील इतर मार्गांचे काम रखडलेले आहे. ती कामे निवडणुकीमुळे लांबणीवर पडली. शिवसेनेतील राजकीय वादामुळे २०१८ मध्ये काही कामे रद्द करण्यावरून वाद झाले होते. २०१९ मध्येदेखील काही कामे रद्द करण्यावरून वाद झाले. २ फेबु्रवारी २०१९ रोजी नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर आजवर प्रशासकीय राजवट असल्यासारखेच कामकाज सुरू आहे. 

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे पालकमंत्री पद गेल्यानंतर डॉ. दीपक सावंत यांना १७ जानेवारी २०१८ पासून ७ जानेवारी २०१९ पर्यंतचा कार्यकाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मिळाला. सावंत यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपल्यामुळे ७ जानेवारी २०१९ रोजी त्यांनी पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.

निवडणुकीतच गेले ९ महिने पालकमंत्री शिंदे यांनी २ फेबु्रवारी रोजी डीपीसीची बैठक घेतली. त्यानंतर १० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली. २७ मेपर्यंत ती आचारसंहिता होती. त्यानंतर औरंगाबाद-जालना विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागली. सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली. २४ आॅक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल लागले. १८ दिवसांपासून राज्यात सरकार नाही. प्रशासन ओल्या दुष्काळाचे पंचनामे करीत आहे; परंतु पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयGovernmentसरकारMarathwadaमराठवाडा