शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

प्रशासनाचा 'डोस' कामी आला; लसीकरणासाठी लांबलचक रांगा, वेळ दोन तासांनी वाढवली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 13:49 IST

Corona Vaccination In Aurangabad : मनुष्यबळाची कमतरता भासत असून दररोज १५ हजार लस देण्यात येत आहेत 

औरंगाबाद : लस घेतल्याशिवाय पेट्रोल, पगार, रेशनसह शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश नाही, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतल्याने शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर लांबलचक रांगा दिसून आल्या ( Queues For Corona Vaccination In Aurangabad ). या रांगा पाहून महापालिका प्रशासनाने लसीकरणाची वेळ दोन तास वाढविण्याचा मोठा निर्णय तातडीने घेतला. सकाळी १० वाजता सुरू होणारे लसीकरण आता ९ वाजता सुरू होईल. सायंकाळी ५ वाजताऐवजी आता ६ वाजतापर्यंत लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

कोरोनासाठी महापालिकेने तब्बल ७०० कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले होते. पगारासाठी निधी मिळत नसल्याने १३६ कर्मचारी वगळून सर्वांना नोकरीवरून काढण्यात आले. अत्यल्प मनुष्यबळावर दररोज तब्बल ७० ठिकाणी लसीकरण, कोरोना तपासण्या करणे प्रशासनाला अवघड जात आहे. त्यामुळे ६ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू केले. खास लसीकरणासाठी घाटी रुग्णालयाकडून १० कर्मचारी घेतले. तरीही कर्मचारी कमीच पडत आहेत.

बुधवारी तर शहरातील प्रत्येक लसीकरण केंद्राबाहेर किमान ४०० ते ५०० नागरिकांच्या रांगा लागल्या. हे पाहून आरोग्य कर्मचाऱ्यांना धडकीच भरली. जेथे सर्वाधिक रांगा होत्या, तेथे कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त पथक पाठविण्यात आले. जिन्सी, शहाबाजार, सिडको एन-८, बन्सीलाल नगर केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. विशेष बाब म्हणजे दुसरा डोस घेण्याची मुदत काही महिन्यांपूर्वी संपलेली असताना आता लस घेण्यासाठी नागरिक असल्याचे निदर्शनास आले. लसीकरण सुरळीत व्हावे, यासाठी महापालिकेतील माजी सैनिक अनेक केंद्रांवर तैनात केले.

चार मोबाइल पथकलस घेण्यासाठी अनेक नागरिक केंद्रांवर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने चार रिक्षा लावून घरोघरी जावून लस देण्याची माेहीम बुधवारपासून सुरू केली. या रिक्षांवर भोंगाही लावण्यात आला आहे. आधार कार्ड दाखवा लस घ्या, अशी मोहीम सुरू करण्यात आली.

सिरिंजचा साठा प्राप्तमहापालिकेला ७५ हजार सिरिंजचा साठा बुधवारी सकाळी प्राप्त झाला. जिल्हा परिषद, आरोग्य उपसंचालक आदी विभागांकडे मोठ्या प्रमाणात साठा पडून आहे. यापूर्वी मनपाने त्यांना सिरिंज दिलेले आहेत. त्यामुळे सिरिंजअभावी लसीकरण मोहीम बंद पडण्याचा प्रश्नच येत नसल्याचे मंडलेचा यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद