शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचा 'डोस' कामी आला; लसीकरणासाठी लांबलचक रांगा, वेळ दोन तासांनी वाढवली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 13:49 IST

Corona Vaccination In Aurangabad : मनुष्यबळाची कमतरता भासत असून दररोज १५ हजार लस देण्यात येत आहेत 

औरंगाबाद : लस घेतल्याशिवाय पेट्रोल, पगार, रेशनसह शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश नाही, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतल्याने शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर लांबलचक रांगा दिसून आल्या ( Queues For Corona Vaccination In Aurangabad ). या रांगा पाहून महापालिका प्रशासनाने लसीकरणाची वेळ दोन तास वाढविण्याचा मोठा निर्णय तातडीने घेतला. सकाळी १० वाजता सुरू होणारे लसीकरण आता ९ वाजता सुरू होईल. सायंकाळी ५ वाजताऐवजी आता ६ वाजतापर्यंत लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

कोरोनासाठी महापालिकेने तब्बल ७०० कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले होते. पगारासाठी निधी मिळत नसल्याने १३६ कर्मचारी वगळून सर्वांना नोकरीवरून काढण्यात आले. अत्यल्प मनुष्यबळावर दररोज तब्बल ७० ठिकाणी लसीकरण, कोरोना तपासण्या करणे प्रशासनाला अवघड जात आहे. त्यामुळे ६ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू केले. खास लसीकरणासाठी घाटी रुग्णालयाकडून १० कर्मचारी घेतले. तरीही कर्मचारी कमीच पडत आहेत.

बुधवारी तर शहरातील प्रत्येक लसीकरण केंद्राबाहेर किमान ४०० ते ५०० नागरिकांच्या रांगा लागल्या. हे पाहून आरोग्य कर्मचाऱ्यांना धडकीच भरली. जेथे सर्वाधिक रांगा होत्या, तेथे कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त पथक पाठविण्यात आले. जिन्सी, शहाबाजार, सिडको एन-८, बन्सीलाल नगर केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. विशेष बाब म्हणजे दुसरा डोस घेण्याची मुदत काही महिन्यांपूर्वी संपलेली असताना आता लस घेण्यासाठी नागरिक असल्याचे निदर्शनास आले. लसीकरण सुरळीत व्हावे, यासाठी महापालिकेतील माजी सैनिक अनेक केंद्रांवर तैनात केले.

चार मोबाइल पथकलस घेण्यासाठी अनेक नागरिक केंद्रांवर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने चार रिक्षा लावून घरोघरी जावून लस देण्याची माेहीम बुधवारपासून सुरू केली. या रिक्षांवर भोंगाही लावण्यात आला आहे. आधार कार्ड दाखवा लस घ्या, अशी मोहीम सुरू करण्यात आली.

सिरिंजचा साठा प्राप्तमहापालिकेला ७५ हजार सिरिंजचा साठा बुधवारी सकाळी प्राप्त झाला. जिल्हा परिषद, आरोग्य उपसंचालक आदी विभागांकडे मोठ्या प्रमाणात साठा पडून आहे. यापूर्वी मनपाने त्यांना सिरिंज दिलेले आहेत. त्यामुळे सिरिंजअभावी लसीकरण मोहीम बंद पडण्याचा प्रश्नच येत नसल्याचे मंडलेचा यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद