शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
2
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
3
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
4
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
5
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
6
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
7
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
8
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
9
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
10
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
11
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
12
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
14
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
15
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
16
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
17
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
18
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
19
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
20
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”

प्रशासनाचे शहराचे सर्वंकष निरीक्षण सुरू; संचारबंदीचा निर्णय होणार सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 20:22 IST

शहराचे सर्वंकष निरीक्षण सुरू असून, ६ जुलै रोजी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मनपा, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात बैठक होईल.

ठळक मुद्देसंचारबंदी, लॉकडाऊनने कोरोनावर नियंत्रण शक्य नाही; परंतु रुग्णसंख्येला आळा बसू शकतो. ६ जुलैपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर कर्फ्यू लावावा लागेल

औरंगाबाद : कोरोनाचा विळखा शहर आणि ग्रामीण भागाभोवती घट्ट होत चालला आहे. त्यातच वाळूज व परिसरातील सात ग्रामपंचायत हद्दींमध्येही कोरोनाच्या रुग्णांची रीघ लागली आहे. शिस्त आणि नियमांच्या पालनातूनच कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य असल्यामुळे शहरवासीयांना प्रशासनाने १० जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. 

शहराचे सर्वंकष निरीक्षण सुरू असून, ६ जुलै रोजी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मनपा, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात बैठक होईल. त्यानंतर लॉकडाऊन, कर्फ्यू, संचारबंदीचा निर्णय होईल, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची उपस्थिती होती.  आयुक्त केंद्रेकर म्हणाले, संचारबंदी, लॉकडाऊनने कोरोनावर नियंत्रण शक्य नाही; परंतु रुग्णसंख्येला आळा बसू शकतो. 

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत ५० रुग्ण आढळले तरी लॉकडाऊन केले जात आहे, मग औरंगाबादला २०० रुग्ण आढळले तरी याबाबत विचार का होत नाही. जिल्हानिहाय लॉकडाऊनची व्याख्या वेगळी आहे काय? यावर केंद्रेकर म्हणाले, विभागातील जिल्ह्याचे पूर्ण अधिकार स्थानिक प्रशासनाला आहेत. परभणी, बीड आणि औरंगाबादची तुलना होणे शक्य नाही. कारण औरंगाबादमध्ये त्या जिल्ह्यांपेक्षा सुविधा मोठ्या प्रमाणात आहेत. त्या जिल्ह्यांत परिस्थिती हाताबाहेर गेली तर यंत्रणेवर ताण पडू शकतो. त्यामुळे नियंत्रण मिळविण्यासाठी घ्यावयाचे अधिकारी तेथील प्रशासनाला आहेत. दरम्यान, शहरात अचानक संचारबंदीचा निर्णय लागू करण्याऐवजी जनजागृती करून विचार होणार आहे. ६ जुलैपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर कर्फ्यू लावावा लागेल आणि हा कर्फ्यू साधारण नसेल. सोमवारपर्यंत औरंगाबादकरांना शिस्त पाळण्याची मुदत आहे.

वाळूजमध्ये उद्योग वगळता संचारबंदी वाळूजसह सात गावांमध्ये उद्योग व्यवस्थापन वगळता ४ ते १२ जुलैदरम्यान कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वाळूज परिसरात पूर्णत: कर्फ्यू लावण्याची गरज आहे. दूध पुरवठा, मेडिकल सेवा आणि उद्योग वगळता सर्व काही बंद असणार आहे. उद्योगांना जरी सवलत असली तर त्यांना कमीत-कमी मनुष्यबळात उत्पादन घ्यावे लागेल. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना शहरातून वाळूजमध्ये जाण्याबाबत पासेस दिले आहेत, त्यांनाच ये-जा करण्याची परवानगी असेल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. 

परिस्थिती हाताबाहेर गेली तर लॉकडाऊनमनपा आयुक्त आस्तिकुमार पाण्डेय यांनी सांगितले की, परिस्थिती हाताबाहेर गेली तर एक वेळ लॉकडाऊन करावेच लागणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी सुविधांमध्ये कमतरता पडणार नाही. रुग्णसंख्या वाढत आहे, तरीही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद