शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचे शहराचे सर्वंकष निरीक्षण सुरू; संचारबंदीचा निर्णय होणार सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 20:22 IST

शहराचे सर्वंकष निरीक्षण सुरू असून, ६ जुलै रोजी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मनपा, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात बैठक होईल.

ठळक मुद्देसंचारबंदी, लॉकडाऊनने कोरोनावर नियंत्रण शक्य नाही; परंतु रुग्णसंख्येला आळा बसू शकतो. ६ जुलैपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर कर्फ्यू लावावा लागेल

औरंगाबाद : कोरोनाचा विळखा शहर आणि ग्रामीण भागाभोवती घट्ट होत चालला आहे. त्यातच वाळूज व परिसरातील सात ग्रामपंचायत हद्दींमध्येही कोरोनाच्या रुग्णांची रीघ लागली आहे. शिस्त आणि नियमांच्या पालनातूनच कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य असल्यामुळे शहरवासीयांना प्रशासनाने १० जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. 

शहराचे सर्वंकष निरीक्षण सुरू असून, ६ जुलै रोजी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मनपा, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात बैठक होईल. त्यानंतर लॉकडाऊन, कर्फ्यू, संचारबंदीचा निर्णय होईल, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची उपस्थिती होती.  आयुक्त केंद्रेकर म्हणाले, संचारबंदी, लॉकडाऊनने कोरोनावर नियंत्रण शक्य नाही; परंतु रुग्णसंख्येला आळा बसू शकतो. 

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत ५० रुग्ण आढळले तरी लॉकडाऊन केले जात आहे, मग औरंगाबादला २०० रुग्ण आढळले तरी याबाबत विचार का होत नाही. जिल्हानिहाय लॉकडाऊनची व्याख्या वेगळी आहे काय? यावर केंद्रेकर म्हणाले, विभागातील जिल्ह्याचे पूर्ण अधिकार स्थानिक प्रशासनाला आहेत. परभणी, बीड आणि औरंगाबादची तुलना होणे शक्य नाही. कारण औरंगाबादमध्ये त्या जिल्ह्यांपेक्षा सुविधा मोठ्या प्रमाणात आहेत. त्या जिल्ह्यांत परिस्थिती हाताबाहेर गेली तर यंत्रणेवर ताण पडू शकतो. त्यामुळे नियंत्रण मिळविण्यासाठी घ्यावयाचे अधिकारी तेथील प्रशासनाला आहेत. दरम्यान, शहरात अचानक संचारबंदीचा निर्णय लागू करण्याऐवजी जनजागृती करून विचार होणार आहे. ६ जुलैपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर कर्फ्यू लावावा लागेल आणि हा कर्फ्यू साधारण नसेल. सोमवारपर्यंत औरंगाबादकरांना शिस्त पाळण्याची मुदत आहे.

वाळूजमध्ये उद्योग वगळता संचारबंदी वाळूजसह सात गावांमध्ये उद्योग व्यवस्थापन वगळता ४ ते १२ जुलैदरम्यान कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वाळूज परिसरात पूर्णत: कर्फ्यू लावण्याची गरज आहे. दूध पुरवठा, मेडिकल सेवा आणि उद्योग वगळता सर्व काही बंद असणार आहे. उद्योगांना जरी सवलत असली तर त्यांना कमीत-कमी मनुष्यबळात उत्पादन घ्यावे लागेल. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना शहरातून वाळूजमध्ये जाण्याबाबत पासेस दिले आहेत, त्यांनाच ये-जा करण्याची परवानगी असेल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. 

परिस्थिती हाताबाहेर गेली तर लॉकडाऊनमनपा आयुक्त आस्तिकुमार पाण्डेय यांनी सांगितले की, परिस्थिती हाताबाहेर गेली तर एक वेळ लॉकडाऊन करावेच लागणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी सुविधांमध्ये कमतरता पडणार नाही. रुग्णसंख्या वाढत आहे, तरीही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद