शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रशासनाचे शहराचे सर्वंकष निरीक्षण सुरू; संचारबंदीचा निर्णय होणार सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 20:22 IST

शहराचे सर्वंकष निरीक्षण सुरू असून, ६ जुलै रोजी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मनपा, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात बैठक होईल.

ठळक मुद्देसंचारबंदी, लॉकडाऊनने कोरोनावर नियंत्रण शक्य नाही; परंतु रुग्णसंख्येला आळा बसू शकतो. ६ जुलैपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर कर्फ्यू लावावा लागेल

औरंगाबाद : कोरोनाचा विळखा शहर आणि ग्रामीण भागाभोवती घट्ट होत चालला आहे. त्यातच वाळूज व परिसरातील सात ग्रामपंचायत हद्दींमध्येही कोरोनाच्या रुग्णांची रीघ लागली आहे. शिस्त आणि नियमांच्या पालनातूनच कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य असल्यामुळे शहरवासीयांना प्रशासनाने १० जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. 

शहराचे सर्वंकष निरीक्षण सुरू असून, ६ जुलै रोजी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मनपा, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात बैठक होईल. त्यानंतर लॉकडाऊन, कर्फ्यू, संचारबंदीचा निर्णय होईल, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची उपस्थिती होती.  आयुक्त केंद्रेकर म्हणाले, संचारबंदी, लॉकडाऊनने कोरोनावर नियंत्रण शक्य नाही; परंतु रुग्णसंख्येला आळा बसू शकतो. 

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत ५० रुग्ण आढळले तरी लॉकडाऊन केले जात आहे, मग औरंगाबादला २०० रुग्ण आढळले तरी याबाबत विचार का होत नाही. जिल्हानिहाय लॉकडाऊनची व्याख्या वेगळी आहे काय? यावर केंद्रेकर म्हणाले, विभागातील जिल्ह्याचे पूर्ण अधिकार स्थानिक प्रशासनाला आहेत. परभणी, बीड आणि औरंगाबादची तुलना होणे शक्य नाही. कारण औरंगाबादमध्ये त्या जिल्ह्यांपेक्षा सुविधा मोठ्या प्रमाणात आहेत. त्या जिल्ह्यांत परिस्थिती हाताबाहेर गेली तर यंत्रणेवर ताण पडू शकतो. त्यामुळे नियंत्रण मिळविण्यासाठी घ्यावयाचे अधिकारी तेथील प्रशासनाला आहेत. दरम्यान, शहरात अचानक संचारबंदीचा निर्णय लागू करण्याऐवजी जनजागृती करून विचार होणार आहे. ६ जुलैपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर कर्फ्यू लावावा लागेल आणि हा कर्फ्यू साधारण नसेल. सोमवारपर्यंत औरंगाबादकरांना शिस्त पाळण्याची मुदत आहे.

वाळूजमध्ये उद्योग वगळता संचारबंदी वाळूजसह सात गावांमध्ये उद्योग व्यवस्थापन वगळता ४ ते १२ जुलैदरम्यान कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वाळूज परिसरात पूर्णत: कर्फ्यू लावण्याची गरज आहे. दूध पुरवठा, मेडिकल सेवा आणि उद्योग वगळता सर्व काही बंद असणार आहे. उद्योगांना जरी सवलत असली तर त्यांना कमीत-कमी मनुष्यबळात उत्पादन घ्यावे लागेल. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना शहरातून वाळूजमध्ये जाण्याबाबत पासेस दिले आहेत, त्यांनाच ये-जा करण्याची परवानगी असेल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. 

परिस्थिती हाताबाहेर गेली तर लॉकडाऊनमनपा आयुक्त आस्तिकुमार पाण्डेय यांनी सांगितले की, परिस्थिती हाताबाहेर गेली तर एक वेळ लॉकडाऊन करावेच लागणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी सुविधांमध्ये कमतरता पडणार नाही. रुग्णसंख्या वाढत आहे, तरीही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद