शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

पाणीटंचाईला प्रशासन जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:05 IST

औरंगाबाद : शहरातील १५ लाखांपैकी १० ते ११ लाख नागरिकांनाच पाणी देण्याचे दायित्व महापालिकेवर आहे. चार दिवसाआडही मनपा प्रशासन ...

ठळक मुद्देतज्ज्ञांचा बॉम्बगोळा : गुरुत्वाकर्षण शक्तीचा उपयोगच नाही

औरंगाबाद : शहरातील १५ लाखांपैकी १० ते ११ लाख नागरिकांनाच पाणी देण्याचे दायित्व महापालिकेवर आहे. चार दिवसाआडही मनपा प्रशासन पाणी देऊ शकत नसेल, तर याला प्रशासनच कारणीभूत आहे. शहरात सायफन पद्धतीच्या नहरींचे उदाहरण डोळ्यासमोर असतानाही मनपा गुरुत्वाकर्षण पद्धतीचा अवलंब करून पाणी देत नाही. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाल्याचे मनपाचे निवृत्त शहर अभियंता एम.डी. सोनवणे यांनी सांगितले.शहरात आज १२० ते १२५ एमएलडी पाणी येत आहे. चार दिवसाआड हे पाणी विविध वसाहतींना देणे सहज शक्य आहे. पाचव्या दिवशी मनपा पाणी देणार असेल, तर प्रशासनाकडे चार दिवसांचे किमान ६०० एमएलडी पाणी असते. नियोजन नसल्याने सर्वत्र ओरड सुरू आहे. शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीला पाणीटंचाई म्हणता येणार नाही. ही कृत्रिम पाणीटंचाई आहे. शहरातील पाण्याचे लिकेज आजपर्यंत का बंद केले नाहीत. नक्षत्रवाडी ते जायकवाडीपर्यंत मनपाच्या एअर व्हॉल्व्हवर पाणी भरणाऱ्या नागरिकांची अलोट गर्दी असते. पाण्याची होणारी नासाडी थांबविली पाहिजे. शहरात ६० पेक्षा अधिक पाण्याच्या टाक्या कशासाठी उभारण्यात आल्या आहेत. गुरुत्वाकर्षण पद्धतीने नागरिकांना पाणी मिळावे हा उद्देश होता. नक्षत्रवाडीत ७५ फूट उंचीवर एमबीआर बांधण्यात आला. या एमबीआरला बायपास करून थेट पाणी देण्यात येत आहे. शहरातील अनेक मुख्य लाईनवरून नागरिकांना पाणी देण्याची अजब पद्धत मनपाने सुरू केली. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळणे अवघड आहे. शहरात पाण्याचे टप्पे पूर्वीपेक्षा शंभर पटीने वाढविण्यात आले आहेत. पाणीपुरवठा विभागाने मागील तीन-चार वर्षांमध्ये सर्व मुख्य वाहिन्यांवर क्रॉस कनेक्शन घेतले आहेत. मनपाने पाणीपुरवठ्यात उपाययोजना करण्यासाठी काही तज्ज्ञ नेमले आहेत. या तज्ज्ञांनी ही वस्तुस्थिती का मांडली नाही. आजार एक उपचार दुसरा अशी अवस्था असल्याचे सोनवणे यांनी नमूद केले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात