शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

वाळूज महानगरात प्रशासनाकडूनच प्रदुषणाला खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 18:04 IST

वाळूज महानगर : एकीकडे राज्य सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडून सरकारच्या निर्णयाला बगल देत खुलेआमपणे उघड्यावर कचरा जाळून प्रदूषण वाढीला खतपाणी घातले जात असल्याचे चित्र वाळूज महानगरात पहावयास मिळत आहे.

वाळूज महानगर : एकीकडे राज्य सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडून सरकारच्या निर्णयाला बगल देत खुलेआमपणे उघड्यावर कचरा जाळून प्रदूषण वाढीला खतपाणी घातले जात असल्याचे चित्र वाळूज महानगरात पहावयास मिळत आहे.

वाळूज महानगरातील बजाजनगर, पंढरपूरसह परिसरातील स्थानिक प्रशासनाकडून नागरिक वसाहतीतून जमा झालेल्या प्लास्टिकसह इतर कचऱ्याची याच भागातील मोकळ्या जागेवर जाळून विल्हेवाट लावली जात आहे. प्रशासनाकडे कचरा संकलनाची पुरेशी व्यवस्था नाही. शिवाय कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा डेपोही नाही. त्यामुळे कर्मचारी जमा झालेला कचरा जागा मिळेल तिथे आणून जाळत आहेत. बजाजनगर नागरी वसाहतीत असलेली खदाण, साजापूर पोलीस कॉलनी, एमआयडीसी एसटीपी प्लॅन्ट, रांजणगाव पाझर तलाव, व पंढरपूर फुलेनगरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर कचरा जाळण्याचे प्रकार सुरु आहेत.

प्रशासनाचे पाहून व्यवसायिक व नागरिकांडूनही कचरा मोकळ्या जागेवर आनुन खुलेआमपणे जाळला जात आहे. वाढते प्रदूषण व धुरामुळे नागरिकांना विविध समस्येला सामोरे जावे लागत आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळेझाक करीत असल्याने पर्यावरण प्रेमीमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संबंधी स्थानिक ग्रामपंचायतीला नोटिसा दिल्या आहेत. उघड्यावर कचरा न जाळता त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे. पाहणी करुन याविषयी निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

नागरिक व वाहनधारक त्रस्तस्थानिक प्रशासनाकडून मुख्य रस्त्याच्या बाजूलाच उघड्यावर कचरा जाळला जात आहे. धुरामुळे पादचारी व वाहनधारकांना दम भरणे, डोळे जळजळ होणे आदी त्रास सहन करावा लागत आहे. बºयाचदा धुरामुळे समोरचे दिसून येत नसल्याने अपघाताच्या घटनाही घडत आहेत. शिवाय आग लागून एखादी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. नेहमीच्याच या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबाद