शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

आदित्य ठाकरेंवर सभेपूर्वीच व्यंगचित्राद्वारे वार; अब्दुल सत्तार म्हणाले 'ते' आता जागी झाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 15:40 IST

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या सिल्लोड येथे सभेचे आयोजन करण्यात आल्याचे कळताच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्याच दिवशी सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन केले.

औरंगाबाद: कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा बालेकिल्ला सिल्लोडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज समोरासमोर येणार आहेत. मात्र, समोरसमोर येण्यापूर्वीच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका कार्टूनद्वारे आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्तेच्या खुर्चीवर झोपलेले आदित्य ठाकरे सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत, असा आशयाचे हे व्यंगचित्र आहे.  

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या सिल्लोड येथे सभेचे आयोजन करण्यात आल्याचे कळताच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्याच दिवशी सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन केले. दोन्ही कार्यक्रमांची ठिकाणे जवळ असल्याचे पाहून प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करीत आदित्य यांच्या सभेस जागा बदलून परवानगी दिली. अतिवृष्टीमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आणि जिल्ह्यातील कृषीमंत्री असूनही शेतकऱ्यांना दिवाळीचा सण साजरा करता आला नाही. शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी गंगापूर तालुक्यात केलेल्या धावत्या नुकसान पाहणी दौऱ्यात केला होता. यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रान पेटविण्यासाठी शिवसेना सक्रिय झाली आहे. आदित्य ठाकरे आज सायंकाळी सिल्लोड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 

तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्याकडून सिल्लोड येथील जिल्हा परिषदेच्या मैदानात श्रीकांत शिंदे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या व्यासपीठावर आदित्य ठाकरे यांचं एक व्यंगचित्र लावण्यात आला आहे. या व्यंगचित्रात सत्ता असताना सत्तेच्या खुर्चीवर झोपलेले आदित्य ठाकरे समोर शेतकरी हात जोडलेला आहे तर त्यानतंर सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांसमोर हात जोडलेले आदित्य ठाकरे दाखवण्यात आले आहे. यातून कृषिमंत्री सत्तार यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना डिवचले आहे. सत्तारांचे आव्हान स्वीकारून सिल्लोडमध्ये आलेले आदित्य आता यावर कशा प्रकारे प्रतिउत्तर देता याची उत्सुकता आहे. 

आता बांधावर जाऊन काय उपयोग सत्तेत असताना आदित्य ठाकरे यांना कुठे जावे हे कळले नाही. सत्ता गेल्यास ते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. पण आता तिथे काही नाही. आम्ही पंचनामे केले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. आता आदित्य ठाकरे श्रेय घेण्यासाठी येत आहेत त्यामुळे त्यांना पप्पू म्हणतो. तसेच व्यंगचित्रामध्ये तेच दिसत असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAbdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबाद