शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

आदित्य ठाकरेंवर सभेपूर्वीच व्यंगचित्राद्वारे वार; अब्दुल सत्तार म्हणाले 'ते' आता जागी झाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 15:40 IST

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या सिल्लोड येथे सभेचे आयोजन करण्यात आल्याचे कळताच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्याच दिवशी सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन केले.

औरंगाबाद: कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा बालेकिल्ला सिल्लोडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज समोरासमोर येणार आहेत. मात्र, समोरसमोर येण्यापूर्वीच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका कार्टूनद्वारे आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्तेच्या खुर्चीवर झोपलेले आदित्य ठाकरे सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत, असा आशयाचे हे व्यंगचित्र आहे.  

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या सिल्लोड येथे सभेचे आयोजन करण्यात आल्याचे कळताच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्याच दिवशी सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन केले. दोन्ही कार्यक्रमांची ठिकाणे जवळ असल्याचे पाहून प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करीत आदित्य यांच्या सभेस जागा बदलून परवानगी दिली. अतिवृष्टीमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आणि जिल्ह्यातील कृषीमंत्री असूनही शेतकऱ्यांना दिवाळीचा सण साजरा करता आला नाही. शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी गंगापूर तालुक्यात केलेल्या धावत्या नुकसान पाहणी दौऱ्यात केला होता. यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रान पेटविण्यासाठी शिवसेना सक्रिय झाली आहे. आदित्य ठाकरे आज सायंकाळी सिल्लोड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 

तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्याकडून सिल्लोड येथील जिल्हा परिषदेच्या मैदानात श्रीकांत शिंदे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या व्यासपीठावर आदित्य ठाकरे यांचं एक व्यंगचित्र लावण्यात आला आहे. या व्यंगचित्रात सत्ता असताना सत्तेच्या खुर्चीवर झोपलेले आदित्य ठाकरे समोर शेतकरी हात जोडलेला आहे तर त्यानतंर सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांसमोर हात जोडलेले आदित्य ठाकरे दाखवण्यात आले आहे. यातून कृषिमंत्री सत्तार यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना डिवचले आहे. सत्तारांचे आव्हान स्वीकारून सिल्लोडमध्ये आलेले आदित्य आता यावर कशा प्रकारे प्रतिउत्तर देता याची उत्सुकता आहे. 

आता बांधावर जाऊन काय उपयोग सत्तेत असताना आदित्य ठाकरे यांना कुठे जावे हे कळले नाही. सत्ता गेल्यास ते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. पण आता तिथे काही नाही. आम्ही पंचनामे केले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. आता आदित्य ठाकरे श्रेय घेण्यासाठी येत आहेत त्यामुळे त्यांना पप्पू म्हणतो. तसेच व्यंगचित्रामध्ये तेच दिसत असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAbdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबाद