शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श बँक घाेटाळा, मानकापे कुटुंबातील तिघे पाचव्यांदा कारागृहातून पाेलिसांच्या ताब्यात

By सुमित डोळे | Updated: March 2, 2024 13:23 IST

आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचे २०१७-२२ चे रेकॉर्डही नव्याने तपासणार

छत्रपती संभाजीनगर : कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या अंबादास मानकापे, त्याचा मुलगा सुनील व सून सुनंदा, संचालक नामदेव कचकुरेला पोलिसांनी पाचव्यांदा हर्सूल कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत २०२२-२३ या एका वर्षात ४८ कोटी ८५ लाख ७२ हजार रुपये हडपल्याप्रकरणी डिसेंबर महिन्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी तिघांना गुरुवारी ताब्यात घेतले. न्यायालयाने तिघांना ३ मार्चपर्यंत पाेलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आरबीआयच्या निर्देशानंतर बँकेच्या लेखापरीक्षणानंतर डिसेंबर, २०२३ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च, २०२३ दरम्यानचे बँकेच्या मुख्य शाखेचे लेखापरीक्षण केले. त्यात मानकापेने सहकारी बँकेतून पहिल्या टप्प्यात ओम कन्स्ट्रक्शन, आदर्श बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स, आदर्श ऑइल मिल, समर्थ इंटरप्रायजेस, आदर्श डेअरी प्रॉडक्टसच्या नावे लाखोंचे विनातारण कर्ज उचलले. त्यासाठी ना कागदपत्रांची पूर्तता केली ना पुढे कर्जाची परतफेड केली. शिवाय, जवळच्यांनाच कोट्यवधींच्या कर्जाची खैरात वाटली. २०२० मध्येच मानकापेला कारवाईची कुणकुण लागली होती. त्यामुळे त्याने सून व अन्य नातेवाइकांना संचालक मंडळावरून वगळून ओळखीतील महिलांना संचालक बनविले. मात्र, मानकापे, त्याची मुले, सहव्यवस्थापक नामदेव कचकुरेंनीच घोटाळा केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अशोक अवचार या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

- ११ जुलै रोजी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२ कोटींच्या घोटाळ्यात अंबादास, मुलगा सुनील, सून सुनंदा व वनितासह १३ आरोपींना सर्वप्रथम अटक झाली. यातील १२ आरोपी अद्यापही कारागृहात आहे.- त्यानंतर त्याच्यावर मात्र, याच दरम्यान मानकापेच्या आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतही घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले.- मानकापेकडे व्यवस्थापक असलेल्या देवीदास सखाराम आधाने (रा. नवजीवन कॉलनी) याच्या यशस्विनी संस्थेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.- मानकापे, त्याच्या सुना व मुले एकूण चार घोटाळ्यांच्या पाच गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपी आहे. त्यांपैकी त्याला पाचव्यांदा ताब्यात घेण्यात आले.

‘त्या’ पाच वर्षांचेही ऑडिटनिरीक्षक संभाजी पवार यांच्या माहितीनुसार, गुन्हा हा एप्रिल २०२२ ते मार्च, २०२३ दरम्यानच्या घोटाळ्यांचा आहे. मात्र, त्यापूर्वी मानकापे गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. त्यामुळे आदर्श महिला नागरी सहकारी बँकेच्या २०१७-२०२२ दरम्यानच्या स्वतंत्र ऑडिटसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यात घोटाळ्याची रक्कम वाढण्याची दाट शक्यता असल्याचे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी