शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री मीनाकुमारींनी ५७ वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरकरांना दिला नेहरूंचा पुतळा भेट

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 27, 2023 14:21 IST

पंंडित जवाहरलाल नेहरू स्मृतिदिन विशेष: तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन  ठरले साक्षीदार : ७५ हजार नागरिकांची होती उपस्थिती

छत्रपती संभाजीनगर : अभिनेत्री स्व. मीनाकुमारी ‘पाकिजा’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी शहरात आल्या होत्या. तेव्हा त्या पर्यटनाच्या राजधानीच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यावेळस त्यांनी आठवण म्हणून माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा पूर्णाकृती पुतळा शहरवासीयांना भेट दिला होता. लोकार्पण सोहळ्यास स्वत: तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आले होते. या घटनेस आता ५७ वर्षे पूर्ण झाली आहेत. पं.नेहरूंचा हा पुतळा आजही छावणीत दिमाखाने उभा आहे.

पंडित जवाहरलाल नेहरूंचा शनिवारी (दि.२७ मे) स्मृतिदिन. भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूजींचा एकमेव शहरातील एकमेव पूर्णाकृती पुतळा छावणीत आहे. असाच पुतळा हैदराबाद शहरातही आहे. ‘पाकिजा’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री मीनाकुमारी शहरात आल्या होत्या. तेव्हा शहराच्या काही भागांत व खुलताबाद परिसरात शूटिंग झाली होती. येथील ऐतिहासिक स्थळे पाहून त्या भारावून गेल्या होत्या. या शहराच्या भेटीची आठवण म्हणून त्यांनी पं.नेहरूंचा पुतळा शहरवासीयांना भेट दिला. तेव्हाच्या सार्वजनिक कल्याण समितीतर्फे छावणीत पुतळा उभारण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे या पुतळ्याचे अनावरण २५ मार्च १९६६ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले होते. तेव्हा संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची उपस्थिती होती. तेव्हा हा सोहळा पाहण्यासाठी छावणीत सुमारे ७५ हजार लोक जमले होते. गर्दी आटोक्यात येण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला होता, अशी माहिती त्या क्षणाचे साक्षीदार डाॅ. अनिल मुंगीकर यांनी दिली.

भारताचे शांतिदूतडोक्यावर गांधी टोपी, अंगात कुर्ता, पायजमा, कुर्त्याला ७ बटन. त्यातील वरच्या बटनावर खोचलेला गुलाब, उजवा पाय पुढे, तर डावा पाय पाठीमागे, उजव्या हाताने शांतीचे प्रतीक कबुतर हवेत सोडताना, असा पं.नेहरूंचा पूर्णाकृती पुतळा आहे. कोनशिलेवर ‘भारताचे शांतिदूत’ असा उल्लेख पं.नेहरूंचा करण्यात आला आहे.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन