शहरं
Join us  
Trending Stories
1
महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
3
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
4
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
5
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
6
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
7
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
8
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
9
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
10
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
11
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
12
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
13
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
14
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
15
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
16
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
17
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
18
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
19
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
20
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यात शेतकऱ्यांना फसविणाऱ्या दोन ‘सीएससी’ सेंटरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 13:18 IST

पीक विमा भरूनही फायदा होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयावर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती याबाबत कारवाई करू शकते

औरंगाबाद : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर आणि कन्नड तालुक्यांतील दोन सीएससींवर (कॉमन सर्व्हिस सेंटर) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी ही कारवाई केली असून, शेतकरी पीक विम्याबाबत येणाऱ्या तक्रारी वाढल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पीक विमा, दुष्काळ अनुदान प्रकरणातून राजकारण होऊ नये, यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाला विशेष सूचना दिल्याचे वृत्त आहे. गंगापूर तालुक्यातील पिंपळगाव देवाशी येथील अशोक वरणे आणि कन्नड तालुक्यातील चांभारवाडी येथील प्रदीप शेवते यांच्या सीएस सेंटरचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. 

पीक विमा भरूनही फायदा होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत असून, या प्रकरणात शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयावर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, विमा कंपनीचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची बैठक दोन दिवसांपूर्वी झाली होती. त्या बैठकीनंतर सीएस सेंटरवर तातडीने कारवाई केली. तालुकानिहाय अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी चौधरी यांनी विमा कंपनीला दिल्या असून, शेतकऱ्यांना पीक विम्यात फसविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी दिला आहे.

कारवाईसाठी अशी आहे समिती शेतकऱ्यांची अडवणूक करून अतिरिक्त पैसे वसूल करणे, विमा कंपनीला पैसे जमा न करणे, अशा प्रकारच्या तक्रारी जर आल्या तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती याबाबत कारवाई करू शकते, तसेच विभागीय पातळीवरील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आयुक्तांच्या अखत्यारीत पाच सदस्यीय समिती आहे. बोगस सातबारा व पीक फेरा नोंदीच्या आधारे पीक विमा प्रकरणे पुराव्यानिशी निदर्शनास आल्यास त्याप्रकरणी दोषींवर जिल्हा संनियंत्रण समितीच्या मान्यतेने फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार समितीकडे आहेत. 

नुकसानभरपाईचे सूत्र असे...भरपाई रकमेसोबत उंबरठा उत्पन्न वजा करून अपेक्षित उत्पन्न काढण्यात येते. त्याला उंबरठा उत्पन्नाने भागले जाते. त्यानंतर विमा संरक्षित रक्कम व २५ टक्के विमा रक्कम गुणली जाते. ३.५ पट किंवा ३५ टक्क्यांपेक्षा जी जास्त रक्कम जास्त असेल ती रक्कम अदा केली जाते. यापेक्षा जास्त रक्कम असेल, तर केंद्र व राज्य शासन प्रत्येकी ५० टक्के रक्कम समप्रमाणात अदा करते.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagricultureशेती