शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

विजचोरांना दणका! महावितरणच्या धडक मोहिमेत ११७ जणांवर कारवाई

By साहेबराव हिवराळे | Updated: September 28, 2022 17:45 IST

औरंगाबाद व जालना जिल्ह्यात वीजचोरीविरोधात महावितरणने जोरदार मोहीम उघडली आहे.

औरंगाबाद : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने राबविलेल्या धडक मोहिमेत मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याची ११७ प्रकरणे शहरात उघडकीस आली आहेत. या सर्वांवर विद्युत कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. महावितरणच्या मोहिमेमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

औरंगाबाद व जालना जिल्ह्यात वीजचोरीविरोधात महावितरणने जोरदार मोहीम उघडली आहे. यात अधिक हानी असलेल्या वीज वाहिन्यांवरील भागात विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी प्रत्येक वाहिनीवर दोन ते तीन पथके तैनात करण्यात आलेली आहेत. तसेच याकामी भरारी पथकांचेही साह्य घेतले जात आहे. शून्य, १ ते ३०, ३१ ते ५० तसेच ५१ ते १०० युनिट वीजवापर असलेल्या वीजग्राहकांची पडताळणी केली जात आहे. तसेच वीजचोरीची गुप्त माहिती व तक्रारींवरही कारवाई केली जात आहे. यात संशयास्पद मीटर जप्त करून महावितरणच्या प्रयोगशाळेत तपासणी केली जात आहे.

औरंगाबाद शहरात राहुलनगर, रोशनगेट, गणेश कॉलनी, जकात नाका, जसवंतपुरा, मोंढा व निजामुद्दिन या विद्युत वाहिन्यांवर १ सप्टेंबरपासून राबविलेल्या मोहिमेत वीजचोरीचा संशय असलेले १४९ मीटर जप्त करण्यात आले. तपासणीअंती यातील ११७ मीटरमध्ये ग्राहकांनी फेरफार करून जवळपास एक लाख युनिटची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. या ग्राहकांवर विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

बिल भरेपर्यंत वीज खंडित..ही बिले त्यांनी २४ तासांत भरणा न केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच वीजचोरीचे बिल भरेपर्यंत त्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण