शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

‘जायकवाडी’च्या प्रतिबंधित क्षेत्रात चर खोदणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:49 IST

बळीराजा चिंतेत : उभी पिके वाचविण्यासाठीची धडपड व्यर्थ

पैठण : जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रात पोकलेन लावून पाण्यासाठी चर खोदणाºया मुलानी वाडगाव येथील तीन शेतकऱ्यांना जायकवाडी प्रशासनाने केलेल्या तक्रारीनुसार बिडकीन पोलिसांनी समज देऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.जायकवाडी प्रशासनाच्या या कारवाईने शेतकरी अस्वस्थ झाले असून शेतात उभे असलेल्या पिकांना वाचवायचे कसे, असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.जायकवाडीचा जलसाठा कमी होत असल्याने शेतीसाठी घेतलेल्या विद्युत मोटारीपासून पाणी बरेच दूर गेल्याने विद्युत पंप बंद पडले आहेत. शेतकºयांनी पिकांना पाणी द्यावे म्हणून जायकवाडीच्या जलफुगवटा क्षेत्रात चर खोदण्याचे काम सुरू केले होते. जायकवाडीचे बॅक वॉटर क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात कुठलेही काम करण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे या शेतकºयांना जायकवाडी प्रशासनाने कळवून चर खोदण्याचे काम बंद केले आहे.जायकवाडी धरणाची पाणीपातळी सध्या जोत्याखाली गेली आहे. यामुळे बॅक वॉटर क्षेत्रातील शेतकºयांनी लावलेल्या मोटारी कोरड्या पडल्या आहेत. शेतातील पिकांना पाणी देता यावे म्हणून शेतकºयांनी जायकवाडीच्या जलसाठ्यातून मोटारीपर्यंत पाणी यावे, म्हणून लोकवर्गणी करून मुलानी वाडगाव परिसरात यांत्रिक मशिनरी लावून चर खोदण्याचे काम सुरू केले होते. दरम्यान, याबाबत जायकवाडी प्रशासनास खबर मिळताच कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, सहायक कार्यकारी अभियंता शिवप्रसाद खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी संबंधित शेतकºयांना चर खोदण्यास प्रतिबंध करण्यात यावा, असा अर्ज बिडकीन पोलिस ठाण्यात दिला होता. या अजार्नुसार सय्यद अफसर सय्यद अब्दुल, राजू हरिभाऊ मिसाळ व रामकिसन शिवाजी शेळके यांना पोलिसांनी समज देऊन जायकवाडीच्या बॅक वॉटर क्षेत्रामध्ये सुरू असलेले काम बंद केले आहे.कोट....शेतकरी म्हणतात... पाणी परवाना घेतलाआम्ही शासनाचा रितसर पाणी परवाना भरला आहे. धरणातील पाणी कमी झाल्याने आम्ही व इतर गावातील लोकांनी मिळून लोकवर्गणीतून जायकवाडी धरण जलफुगवटा क्षेत्रात पोकलेन लावून माती काढत होतो. असे केले नाही तर आमची पिके जळून जातील, मग आम्ही पाणी पाणी परवानगी घेऊन आमचा काय उपयोग आहे, अशी प्रतिक्रिया या शेतकºयांनी दिली.जायकवाडी प्रशासनाची कारवाईगोदावरीच्या उर्ध्व खोºयातून जायकवाडी धरणासाठी नऊ टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केल्यानंतर सदरील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावेळी याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जायकवाडी धरणात पाण्याची गळती जास्त असून अवैध उपसा कनेक्शन जास्त असल्याचे म्हटले होते. जायकवाडी प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात अवैध कनेक्शन रोखण्यासाठी तत्पर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनानुसार महावितरण, महसूल, पोलीस व जायकवाडी प्रशासन यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने इसारवाडी परिसरात १२ फेब्रुवारी रोजी २४ अवैध विद्युत पंपाचे कनेक्शन तोडून जप्तीची कारवाई केली होती. दरम्यान, या कारवाईत अवैध कनेक्शनद्वारे इस्ट वेस्ट सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पाणी उचलत असल्याचे लक्षात आल्याने दगडी धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी या कंपनीस नोटीस देऊन दंडात्मक कारवाई केली. कंपनीने कारवाईनंतर पाणी उचलण्यासाठी रितसर अर्ज केला असल्याचे सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.जायकवाडीच्या बुडीत क्षेत्रात पथक तैनातजायकवाडीच्या बुडीत क्षेत्रात येणाºया परिसरात गस्ती पथक तैनात करण्यात आले असून या पथकाद्वारे संपूर्ण क्षेत्रात नजर ठेवली जाणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. जायकवाडी धरणाचा परिसरातील शेतकºयांनी पाणी परवाना घेतलेला असून पाणी उचलण्याचा त्यांना अधिकार आहे. राज्य वन्यजीव मंडळाकडे याबाबत शेतकºयांच्या वतीने अर्ज करून परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे दत्ता गोर्डे, बप्पा शेळके, तुषार शिसोदे यांनी सांगितले.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात