शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

अधिकाºयांवर कारवाई मुंबईतूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:16 IST

दोन वर्षातील लेखापरिक्षण अहवालाची पडताळणी आणि एका वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात अधिकाºयांची साक्षी नोंदविण्यासाठी जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीने आर्थिक अनियमिततेस जबाबदार असलेल्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबईतच घेतला जाणार असल्याचे सांगून कारवाईच्या भीतीने धास्तावलेल्या अधिकाºयांवर अनिश्चितेची टांगती तलवार कायम ठेवली. तर दुसरीकडे समितीच्या शाही बडदास्तीवर जि.प. प्रशासनाने लाखो रुपयांची उधळपट्टी केल्यानंतरही हा पाहूणचार आनंदाने स्विकारुन पत्रकारांना टाळत समितीने आपला दौरा आटोपता घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन वर्षातील लेखापरिक्षण अहवालाची पडताळणी आणि एका वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात अधिकाºयांची साक्षी नोंदविण्यासाठी जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीने आर्थिक अनियमिततेस जबाबदार असलेल्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबईतच घेतला जाणार असल्याचे सांगून कारवाईच्या भीतीने धास्तावलेल्या अधिकाºयांवर अनिश्चितेची टांगती तलवार कायम ठेवली. तर दुसरीकडे समितीच्या शाही बडदास्तीवर जि.प. प्रशासनाने लाखो रुपयांची उधळपट्टी केल्यानंतरही हा पाहूणचार आनंदाने स्विकारुन पत्रकारांना टाळत समितीने आपला दौरा आटोपता घेतला.महाराष्ट्र विधानमंडळाची २५ आमदारांची समिती ८ नोव्हेंबरपासून जिल्ह्याच्या दौºयावर आली होती. ८ रोजी २००८-०९ व २०११-१२ या आर्थिक वर्षातील लेखापरिक्षण पूनर्विलोकन अहवालाची पडताळणी केल्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील नऊही पंचायत समित्या, काही ग्रामपंचायती, शाळा व कामांना भेटी दिल्या. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात २०१२-१३ च्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाºयांची साक्ष घेण्यात आली. सकाळी ११ वाजता बैठकीला सुरुवात झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत ही बैठक चालली. या बैठकीत वार्षिक प्रशासन अहवालातील त्रुटीबाबत विविध विभागाच्या अधिकाºयांना समितीच्या सदस्यांनी जाब विचारला. आर्थिक अनियमिततेप्रकरणी साक्षही घेण्यात आली. या अनियमिततेला जबाबदार असणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याबाबतचा अंतिम निर्णय मुंबईत होणार असल्याचे संकेत देण्यात आले. विशेषत: या बैठकीत पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरवसे यांच्यावरील कारवाईचे संकेत मिळत होते. याशिवाय समितीच्या सदस्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजासंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला. या विभागाच्या अनेक कामांमध्ये आढळलेल्या अनियमिततेप्रकरणी चौकशी करुन तातडीने अहवाल सादर करावा, असे आदेश अधिकाºयांना देण्यात आले.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन, रस्ते आदींची कामे सध्या ठप्प पडली आहेत. अधिकाºयांकडूनही याबाबत टाळाटाळ केली जात आहे. ही बाब योग्य नसून मजुरांची मागणी असेल तर कामे करण्यास काय हरकत आहे, असा सवाल अधिकाºयांनी उपस्थित केला. रोहयोचे काम करीत असताना योग्य ते निकष पाळत या कामांना गती देण्याची जबाबदारी अधिकाºयांची आहे. या विभागासाठी उपलब्ध असलेला निधी खर्चच झाला नसेल तर शासनाचा सर्वसामान्यांप्रती असलेला हेतू साध्य कसा होईल, असा सवाल उपस्थित करण्यात आला.मराठवाड्यात जिल्हा परिषद माध्यमिकच्या सर्वाधिक शाळा आहेत. परभणी जिल्ह्यात ४० जि.प.हायस्कूल आहेत. यातील अनेक शाळांच्या इमारती या निजामकालीन आहेत. या इमारतींच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी बृहत आराखडा तयार करावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीकडूनही निधी उपलब्ध होऊ शकतो, याबाबतचे प्रस्ताव अधिकाºयांनी सादर करावेत, असे आदेश समितीचे अध्यक्ष आ.सुधीर पारवे यांनी दिले. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत. परंतु, या मालमत्तांवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे या मालमत्तांचे सर्व्हेक्षण करुन त्यावरील अतिक्रमणे हटवावीत, वेळ प्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी, असेही यावेळी पारवे यांनी सूचविले. परभणी जिल्ह्यात आणखी नवीन पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व २२ उपकेंद्रांची गरज आहे. तसेच ताडकळस येथे ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता आहे. त्यामुळे या संदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे आदेश देण्यात आले.जिल्ह्यातील अनेक पंचायत समित्यांकडे आर्थिक वर्षाचे ८ महिने झाले तरी निधी शिल्लक आहे. त्यामुळे विकासकामे झालेली नाहीत. त्यामुळे हा निधी खर्च करण्यासंदर्भात अधिकाºयांनी नियोजन करावे व विकासकामे तातडीने सुरु करावीत, अशा सूचनाही यावेळी समितीच्या सदस्यांनी केल्या.