शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

वक्फ जमिनींचे ‘श्रीखंड’ खाणाऱ्यांवर कारवाई अटळ; बोर्डाचा लीगल सेल स्थापण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 19:10 IST

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बैठकीत बोर्डाला सक्षम बनविण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : वक्फ बोर्डाच्या राज्यात कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आहेत. त्यातील अनेक जमिनींचे भूमाफियांनी श्रीखंड खाण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी लीगल सेल स्थापन करण्याचा निर्णय राज्यस्तरीय बैठकीत अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांच्यासह सदस्यांनी घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची तीन दिवसीय बैठक छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी पार पडली. बोर्डाला सक्षम बनविण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सोलापूरच्या चिरागली कब्रस्तान, पुण्याच्या आलमगीर मशीदबाबत अनेक तक्रारी होत्या. यासंदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरातील जागांबाबतही चर्चा झाली. प्रत्येक जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या पॅनलवर वकील नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यस्तरीय बैठकीत तक्रारींचा निपटारा करण्यासाठी दोन दिवस विविध प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली. पहिल्या दिवशी ४२, दुसऱ्या दिवशी ९६ असे एकूण १३८ प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात आले. ७० तक्रारींमध्ये क्लोज फॉर ऑर्डर करण्यात आली. तक्रारींचा निपटारा जलद गतीने करण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्ष डॉ. मिर्झा यांनी दिले. बैठकीस खा. फौजियाखान, खा. इम्तियाज जलील, आ. फारूक शहा, मौलाना अथर अली, हसनैन शाकीर, मुदसीर लांबे, समीर काजी, उपमुख्य कार्यकरी अधिकारी जुनेद सय्यद यांची उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी मोईन ताशीलदार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत भाग घेतला.

ऑडीटसाठी नोटिसा जोरीराज्यातील तब्बल तेरा हजार संस्थांना आपले ऑडिट दाखल करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रलंबित वक्फ फंड उत्पन्नास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वक्फ जामिनींना भाडेतत्त्वावर (लीज) देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रयोगास प्रतिसाद मिळत असून, महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEnchroachmentअतिक्रमण