शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नवीन आराखड्यानुसार शहरात १२६ वॉर्ड, ४२ प्रभाग; राजकीय पक्ष, इच्छुक लागले कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 19:22 IST

नवीन आराखड्यानुसार एक वॉर्ड ९ ते १० हजार लोकसंख्येचा असणार आहे. ३ वॉर्डांच्या एका प्रभागाची लोकसंख्या जवळपास ३० हजार असेल.

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका गुरुवारी निकाली निघाली. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महापालिका प्रशासनाने नोव्हेंबर २०२१ मध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे शहरात १२६ वॉर्ड तयार केले. ४२ प्रभागांचा आराखडा सादर केला.

नवीन आराखड्यानुसार एक वॉर्ड ९ ते १० हजार लोकसंख्येचा असणार आहे. ३ वॉर्डांच्या एका प्रभागाची लोकसंख्या जवळपास ३० हजार असेल.राज्य निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबर २०२१ मध्ये राज्यातील २२ महापालिकांसाठी स्वतंत्र सुधारित आदेश काढला. औरंगाबाद महापालिकेलाही नोव्हेंबर महिन्यात कच्चा आराखडा तयार करून आयोगाकडे सादर करावा, असे म्हटले. त्यानुसार मनपा प्रशासनाने आराखडा सादर केला आहे. पूर्वी मनपातील सदस्यांची संख्या ११५ होती. आता १२६ करण्यात आली असून प्रभागांची संख्या ४२ झाली आहे. २०११ च्या लोकसंख्येनुसार २,२८६ प्रगणक गट असल्यामुळे त्यातूनच वॉर्ड आणि प्रभाग तयार करण्यात आले. १२ लाख २८ हजार ३२ इतकी लोकसंख्या, ९ लाख ३९ हजार ४५८ मतदारसंख्या गृहीत धरण्यात आली. १२६ वॉर्डांपैकी ६३ वॉर्ड महिलांसाठी राखीव असतील.

नवीन प्रभाग रचनेत २४ एससी, ३ एसटी, ३४ ओबीसी आणि ६५ सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्य राहतील, असा अंदाज आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय पुढील प्रक्रिया अशक्य आहे. आयोगाकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतर आराखडा प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील. आक्षेप व सूचना विचारात घेऊन प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम केला जाईल. त्यानंतर प्रभाग रचनेतील वॉर्डनुसार नव्याने आरक्षण सोडत काढली जाईल.

२०१५ मधील पक्षीय बलाबलशिवसेना- २९भाजप- २३एमआयएम- २४काँग्रेस- ११बहुजन समाज पार्टी- ५राष्ट्रवादी काँग्रेस- ४रिपाइं (डेमोक्रॅटिक)- २अपक्ष- १७एकूण - ११५

आयोगाने दिलेली लोकसंख्या-१२,२८,०३२अनुसूचित जाती लोकसंख्या- २,३८,१०५अनुसूचित जमाती - १६,३२०

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका