शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज एमआयडीसीत अपघात सत्र सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 18:56 IST

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात अपघात सत्र सुरुच असून, शुक्रवार एफडीसी कॉर्नरजवळ भरधाव ट्रकच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या क्लिनरचा शनिवारी मृत्यू झाला आहे. या परिसरात तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन दिवसांत तिघांचा बळी गेला आहे.

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात अपघात सत्र सुरुच असून, शुक्रवार एफडीसी कॉर्नरजवळ भरधाव ट्रकच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या क्लिनरचा शनिवारी मृत्यू झाला आहे. या परिसरात तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन दिवसांत तिघांचा बळी गेला आहे.

भारतसिंग अमृतलाला (२५ रा.फुसफुरा ता.जि.धौलपूर, राजस्थान) हा मेवात ट्रॉन्सपोर्टवर ट्रकचालक (आर.जे.११, जी.ए.७१०६) म्हणून तर त्याचा भाऊ संतोष सिंग (२३) हा क्लिनर म्हणून काम करतो. दरम्यान, उत्तरप्रदेशातील नोएडा येथून ट्रकमध्ये पॉलिथीन बॅगा घेऊन चालक भारतसिंग व क्लिनर संतोषसिंग हे २३ नोव्हेंबरला दुपारी १.३० वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीत आले होते. या परिसरातील आरएसपीएल कंपनीचा माल पोहोच करण्यासाठी या दोघांनी कंपनीजवळ ट्रक उभा केला होता.

दरम्यान, सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दोघे नाष्टा करण्यासाठी एका कॅन्टीनच्या दिशेने पायी जात होते. याच वेळी एफडीसी कंपनीकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एम.एच.०४, सी.ए.६५८९) रस्ता ओलांडणाºया संतोषसिंगला धडक दिली. घटनेनंतर तात्त्काळ भारतसिंगने नागरिकांच्या मदतीने संतोषला रस्त्याच्याकडेला हलविले. १०८ रुग्णवाहिकेतून त्याला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास दोघेही भाऊ पुन्हा एमआयडीसीत परतले होते. रात्री जेवण केल्यानंतर भारतसिंग व संतोषसिंग हे ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपी गेले होते.

शनिवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास चालक भारतसिंग संतोषसिंग याला चहा पिण्यासाठी उठवित होता. मात्र, तो झोपेतून उठत नसल्याने भारतसिंगने ट्रॉन्सपोर्टच्या कार्यालयात याची माहिती दिली. त्यानंतर संतोषसिंग याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता सकाळी १० वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी चालक भारतसिंग याच्या तक्रारीवरुन फरार आयशर चालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे हे करीत आहेत.

तीन दिवसात तिघांचा बळीवाळूज एमआयडीसी परिसरात तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन दिवसांत तिघांचा बळी गेला आहे. साजापूरच्या पेट्रोल पंपाजवळ २२ नोव्हेंबरला रिक्षा नादूरुस्त ट्रकवर धडल्यामुळे रिक्षाचालक जालिंदर भुजाडी यांचा मृत्यू झाला होता. २३ नोव्हेंबरला प्रकाशसिंग सज्जनसिंग मुनोत यांना भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर तिसºया दिवशी आयशरच्या धडकेने संतोष सिंग याचाही बळी गेला आहे.

वाहतुक शाखा कुचकामीवाळूज उद्योगनगरीत बेशिस्त वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावरच वाहने उभी राहत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. वाळूज उद्योगनगरीसाठी स्वतंत्र वाहतुक शाखेची निर्मिती होऊनही वाहतुकीला शिस्त लागत नसल्यामुळे नागरिक व वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.-------------------------------

टॅग्स :AccidentअपघातWalujवाळूजAurangabadऔरंगाबाद