शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

वाळूज एमआयडीसीत अपघात सत्र सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 18:56 IST

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात अपघात सत्र सुरुच असून, शुक्रवार एफडीसी कॉर्नरजवळ भरधाव ट्रकच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या क्लिनरचा शनिवारी मृत्यू झाला आहे. या परिसरात तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन दिवसांत तिघांचा बळी गेला आहे.

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात अपघात सत्र सुरुच असून, शुक्रवार एफडीसी कॉर्नरजवळ भरधाव ट्रकच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या क्लिनरचा शनिवारी मृत्यू झाला आहे. या परिसरात तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन दिवसांत तिघांचा बळी गेला आहे.

भारतसिंग अमृतलाला (२५ रा.फुसफुरा ता.जि.धौलपूर, राजस्थान) हा मेवात ट्रॉन्सपोर्टवर ट्रकचालक (आर.जे.११, जी.ए.७१०६) म्हणून तर त्याचा भाऊ संतोष सिंग (२३) हा क्लिनर म्हणून काम करतो. दरम्यान, उत्तरप्रदेशातील नोएडा येथून ट्रकमध्ये पॉलिथीन बॅगा घेऊन चालक भारतसिंग व क्लिनर संतोषसिंग हे २३ नोव्हेंबरला दुपारी १.३० वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीत आले होते. या परिसरातील आरएसपीएल कंपनीचा माल पोहोच करण्यासाठी या दोघांनी कंपनीजवळ ट्रक उभा केला होता.

दरम्यान, सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दोघे नाष्टा करण्यासाठी एका कॅन्टीनच्या दिशेने पायी जात होते. याच वेळी एफडीसी कंपनीकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एम.एच.०४, सी.ए.६५८९) रस्ता ओलांडणाºया संतोषसिंगला धडक दिली. घटनेनंतर तात्त्काळ भारतसिंगने नागरिकांच्या मदतीने संतोषला रस्त्याच्याकडेला हलविले. १०८ रुग्णवाहिकेतून त्याला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास दोघेही भाऊ पुन्हा एमआयडीसीत परतले होते. रात्री जेवण केल्यानंतर भारतसिंग व संतोषसिंग हे ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपी गेले होते.

शनिवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास चालक भारतसिंग संतोषसिंग याला चहा पिण्यासाठी उठवित होता. मात्र, तो झोपेतून उठत नसल्याने भारतसिंगने ट्रॉन्सपोर्टच्या कार्यालयात याची माहिती दिली. त्यानंतर संतोषसिंग याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता सकाळी १० वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी चालक भारतसिंग याच्या तक्रारीवरुन फरार आयशर चालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे हे करीत आहेत.

तीन दिवसात तिघांचा बळीवाळूज एमआयडीसी परिसरात तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन दिवसांत तिघांचा बळी गेला आहे. साजापूरच्या पेट्रोल पंपाजवळ २२ नोव्हेंबरला रिक्षा नादूरुस्त ट्रकवर धडल्यामुळे रिक्षाचालक जालिंदर भुजाडी यांचा मृत्यू झाला होता. २३ नोव्हेंबरला प्रकाशसिंग सज्जनसिंग मुनोत यांना भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर तिसºया दिवशी आयशरच्या धडकेने संतोष सिंग याचाही बळी गेला आहे.

वाहतुक शाखा कुचकामीवाळूज उद्योगनगरीत बेशिस्त वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावरच वाहने उभी राहत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. वाळूज उद्योगनगरीसाठी स्वतंत्र वाहतुक शाखेची निर्मिती होऊनही वाहतुकीला शिस्त लागत नसल्यामुळे नागरिक व वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.-------------------------------

टॅग्स :AccidentअपघातWalujवाळूजAurangabadऔरंगाबाद