शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:28 IST

तत्काळ या मार्गावरील रस्ता दुभाजकावर लाईट बॅरिअर टाकण्यात यावे, अशी मागणी माार्गवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे. 

ठळक मुद्देलाईट बॅरिअरचा आहे अभाव अनेकांना गमवावा लागला प्राण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी

कायगाव (औरंगाबाद ) : औरंगाबाद-अहमदनगर राष्ट्रीय मार्गावरील रस्ता दुभाजकावर असणाऱ्या लाईट बॅरिअरअभावी अपघाताचा धोका वाढला आहे. लाईट बॅरिअर नसल्याने रात्रीच्या वेळेस वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश समोरासमोरील वाहनांना त्रासदायक ठरत असल्याने अनेकदा यामुळे अपघात होत आहेत. त्यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन लाईट बॅरिअर बसवावे, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

औरंगाबाद-अहमदनगर-पुणे हा राष्ट्रीय मार्ग आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, एमआयडीसीचा पुण्यातील एमआयडीसीशी आद्योगिक संपर्क आहे. त्यामुळे या मार्गावरून जवळपास २४ तास मोठी वाहतूक होते. या मार्गाचे १० वर्षांपूर्वी रुंदीकरण झाले होते. सर्वप्रथम द्विपदरी असणारा हा मार्ग नंतर चौपदरी झाला. तेव्हापासून या रस्त्यावर दुभाजक तयार करण्यात आले. त्यानंतर या मार्गावर दोन्ही बाजूंनी एकेरी वाहतूक सुरू झाली. एकेरी वाहतूक सुरू झाल्याने समोरासमोरच्या वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण कमालीचे घटले. मात्र, एकाच लेनमध्ये चालणाऱ्या वाहनांचे अपघात वाढल्याचे निदर्शनास आले आहे. एकेरी वाहतूक असल्याने वाहनांच्या वेगात वाढ  झाली. त्यामुळे ओव्हरटेक करण्याच्या नादात होणारे अपघातही वाढले. तसेच दुसरीकडे रात्रीच्या रहदारीत मोठ्या वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश समोरासमोरच्या वाहनांच्या चालकांना त्रासदायक ठरून अपघात होत असल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, औरंगाबाद-अहमदनगर या मार्गाचे रुंदीकरण करताना रस्त्याचे दोन भाग झाले होते. अहमदनगरहून वडाळा (ता. नेवासा) गावापर्यंत एका ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते, तर वडाळ्याहून वाळूजपर्यंत दुसऱ्या ठेकेदाराला काम दिले गेले. वडाळ्यापासून अहमदनगरपर्यंत रस्ता दुभाजकावर फायबरचे लाईट बॅरिअर बसविण्यात आले होते. मात्र, वाळूजहून वडाळ्यापर्यंत लाईट बॅरिअरऐवजी रस्ता दुभाजकावर लहान लहान झाडे लावण्यात आली. या झाडांचा म्हणावा तसा उपयोग कधीच झाला नाही. उलट हिरव्या झाडांच्या आकर्षणाने रस्त्यावर विविध जनावरांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीला अडथळेच निर्माण झाले. बहुतांश जागेवरून आता ही झाडे नष्ट झाली आहेत. त्यामुळे रस्ता दुभाजक पूर्ण रिकामा झाला आहे. 

औरंगाबाद ते अहमदनगरदरम्यान या राष्ट्रीय मार्गावर लिंबेजळगाव, खडका फाटा आणि शेंडी या तीन ठिकाणी वाहनांकडून टोल वसुली केली जाते. मात्र, असे असूनही वाहनधारकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तत्काळ या मार्गावरील रस्ता दुभाजकावर लाईट बॅरिअर टाकण्यात यावे, अशी मागणी माार्गवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे. 

लाईट बॅरिअरचे काम काय?रात्रीच्या वेळेस वाहनांच्या हेडलाईटच्या तीव्र प्रकाशाने समोरच्या वाहनांच्या चालकांना त्रास होतो. समोरच्या बाजूने येणाऱ्या वाहनांचा प्रकाश दुसऱ्या बाजूच्या चालकाच्या डोळ्यांवर पडतो. त्यामुळे समोरासमोर वाहतूक होत असताना वाहनांचा प्रकाश दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या वाहनचालकांना त्रासदायक ठरू नये, यासाठी रस्ता दुभाजकावर लाईट बॅरिअर बसविण्यात येतात. हे बॅरिअर वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश अडवितात. त्यामुळे अपघाताचा धोका कमी होतो. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबाद