शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:28 IST

तत्काळ या मार्गावरील रस्ता दुभाजकावर लाईट बॅरिअर टाकण्यात यावे, अशी मागणी माार्गवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे. 

ठळक मुद्देलाईट बॅरिअरचा आहे अभाव अनेकांना गमवावा लागला प्राण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी

कायगाव (औरंगाबाद ) : औरंगाबाद-अहमदनगर राष्ट्रीय मार्गावरील रस्ता दुभाजकावर असणाऱ्या लाईट बॅरिअरअभावी अपघाताचा धोका वाढला आहे. लाईट बॅरिअर नसल्याने रात्रीच्या वेळेस वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश समोरासमोरील वाहनांना त्रासदायक ठरत असल्याने अनेकदा यामुळे अपघात होत आहेत. त्यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन लाईट बॅरिअर बसवावे, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

औरंगाबाद-अहमदनगर-पुणे हा राष्ट्रीय मार्ग आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, एमआयडीसीचा पुण्यातील एमआयडीसीशी आद्योगिक संपर्क आहे. त्यामुळे या मार्गावरून जवळपास २४ तास मोठी वाहतूक होते. या मार्गाचे १० वर्षांपूर्वी रुंदीकरण झाले होते. सर्वप्रथम द्विपदरी असणारा हा मार्ग नंतर चौपदरी झाला. तेव्हापासून या रस्त्यावर दुभाजक तयार करण्यात आले. त्यानंतर या मार्गावर दोन्ही बाजूंनी एकेरी वाहतूक सुरू झाली. एकेरी वाहतूक सुरू झाल्याने समोरासमोरच्या वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण कमालीचे घटले. मात्र, एकाच लेनमध्ये चालणाऱ्या वाहनांचे अपघात वाढल्याचे निदर्शनास आले आहे. एकेरी वाहतूक असल्याने वाहनांच्या वेगात वाढ  झाली. त्यामुळे ओव्हरटेक करण्याच्या नादात होणारे अपघातही वाढले. तसेच दुसरीकडे रात्रीच्या रहदारीत मोठ्या वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश समोरासमोरच्या वाहनांच्या चालकांना त्रासदायक ठरून अपघात होत असल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, औरंगाबाद-अहमदनगर या मार्गाचे रुंदीकरण करताना रस्त्याचे दोन भाग झाले होते. अहमदनगरहून वडाळा (ता. नेवासा) गावापर्यंत एका ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते, तर वडाळ्याहून वाळूजपर्यंत दुसऱ्या ठेकेदाराला काम दिले गेले. वडाळ्यापासून अहमदनगरपर्यंत रस्ता दुभाजकावर फायबरचे लाईट बॅरिअर बसविण्यात आले होते. मात्र, वाळूजहून वडाळ्यापर्यंत लाईट बॅरिअरऐवजी रस्ता दुभाजकावर लहान लहान झाडे लावण्यात आली. या झाडांचा म्हणावा तसा उपयोग कधीच झाला नाही. उलट हिरव्या झाडांच्या आकर्षणाने रस्त्यावर विविध जनावरांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीला अडथळेच निर्माण झाले. बहुतांश जागेवरून आता ही झाडे नष्ट झाली आहेत. त्यामुळे रस्ता दुभाजक पूर्ण रिकामा झाला आहे. 

औरंगाबाद ते अहमदनगरदरम्यान या राष्ट्रीय मार्गावर लिंबेजळगाव, खडका फाटा आणि शेंडी या तीन ठिकाणी वाहनांकडून टोल वसुली केली जाते. मात्र, असे असूनही वाहनधारकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तत्काळ या मार्गावरील रस्ता दुभाजकावर लाईट बॅरिअर टाकण्यात यावे, अशी मागणी माार्गवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे. 

लाईट बॅरिअरचे काम काय?रात्रीच्या वेळेस वाहनांच्या हेडलाईटच्या तीव्र प्रकाशाने समोरच्या वाहनांच्या चालकांना त्रास होतो. समोरच्या बाजूने येणाऱ्या वाहनांचा प्रकाश दुसऱ्या बाजूच्या चालकाच्या डोळ्यांवर पडतो. त्यामुळे समोरासमोर वाहतूक होत असताना वाहनांचा प्रकाश दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या वाहनचालकांना त्रासदायक ठरू नये, यासाठी रस्ता दुभाजकावर लाईट बॅरिअर बसविण्यात येतात. हे बॅरिअर वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश अडवितात. त्यामुळे अपघाताचा धोका कमी होतो. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबाद