शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सहा वर्षांनंतर लागला पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 18:30 IST

दशमेशनगर येथे घरात एकटे राहणाऱ्या मिश्रीलाल कन्हैयालाल बरडिया (८१) यांच्या घराच्या खिडकी तोडून १ लाख ५ हजार रुपये रोख आणि ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.

ठळक मुद्दे २०१५ साली दशमेशनगरात लुटले होते वृद्धाला

औरंगाबाद : ज्योतीनगर परिसरातील दशमेशनगरात १४ ऑक्टोबर २०१५ रोजी लुटून फरार झालेल्या एका गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १२ मार्च रोजी अंबाजोगाई येथे सापळा रचून शिताफीने पकडले. या आरोपीसह त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली होती. पांडुरंग उर्फ गजानन कचरे (रा. अंबाजोगाई, जि. बीड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

आरोपी कचरे टोळीतील आरोपी सूर्यकांत श्रीराम मुळे (२८,रा. गांधीनगर, अंबाजोगाई), विनोद दिगंबर गायकवाड (रा. ज्योतीनगर ) , गोरखनाथ रघुनाथ खळेकर (२१) सुनील भाऊसाहेब पवार, नंदू पंढरीनाथ सिरसाट, राजेंद्र श्रीराम कळसे यांनी कट रचून १४ ऑक्टोबर २०१५ रोजी रात्री दशमेशनगर येथे घरात एकटे राहणाऱ्या मिश्रीलाल कन्हैयालाल बरडिया (८१) यांच्या घराच्या खिडकी तोडून १ लाख ५ हजार रुपये रोख आणि ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या गुन्ह्यात चार आरोपी प्रत्यक्ष सहभागी झाले होते. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा केल्यापासून आरोपी पांडुरंग उर्फ गजानन फरार झाला होता. त्याचे साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती.

दरम्यान, १२ मार्च रोजी तो त्याच्या गावी आल्याची माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांना मिळाली. फौजदार योगेश धोंडे, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, हवालदार गणपत गरड, गजानन मांटे, भावसिंग चव्हाण, राहुल खरात, सुनील मोटे , नितीन देशमुख आणि चालक तातेराव सिनगारे यांच्या पथकाला लगेच अंबाजोगाईला रवाना केले. पथकाने सापळा रचून आरोपी पांडुरंग ऊर्फ गजानन हा रात्री अंबाजोगाई येथील त्याच्या घरातून बाहेर पडला आणि चौकात येताच पथकाने त्याला शिताफीने पकडले.

न्यायालयात हजर न होणाऱ्या आरोपीला अटकयाच गुन्ह्यातील आरोपी राजेंद्र कचरे हा अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्याला सशर्त जामीन दिला होता. मात्र जेलमधून बाहेर पडल्यावर तो कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी हजर होत नव्हता. यामुळे न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले होते. पोलिसांनी त्यालाही अटक करून न्यायालयांत हजर केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादRobberyचोरी