शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

औरंगाबादहून दोन नवीन विमानसेवा सुरू होण्याची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 17:52 IST

उदयपूरसह नव्या शहरांबरोबर हवाई कनेक्टिव्हिटी मिळण्याची अपेक्षा

ठळक मुद्देपर्यटन, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणीऔरंगाबादहून जेट एअरवेजकडून सकाळी आणि सायंकाळी विमानसेवा सुरू होती.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारी जेट एअरवेजची दोन विमाने बंद झालेली आहेत. त्यामुळे औरंगाबादहून दिल्ली, मुंबईसाठी किमान दोन नवीन विमानसेवा सुरू होण्याची क्षमता आहे. त्याबरोबर नव्या विमान कंपनी औरंगाबादेत आल्यास उदयपूरसह नव्या शहरांबरोबर हवाई कनेक्टिव्हिटी मिळण्याची अपेक्षा उद्योग, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

औरंगाबादहून जेट एअरवेजकडून सकाळी आणि सायंकाळी विमानसेवा सुरू होती. सायंकाळच्या वेळेत मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानाने दररोज १३४ प्रवाशांची ये-जा होत होती. एअर इंडिया, ट्रूजेट आणि जेट एअरवेज कंपनीच्या विमानसेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले गेले. मात्र, आता जेट एअरवेजची सेवा बंद झाली. परिणामी केवळ दोन कंपन्यांचीच सेवा उरली. सध्या दिल्ली, मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना एकमेव एअर इंडियाच्या विमानाचा आधार आहे. परंतु या विमानाची बुकिंग फुल होणे, अधिक तिकीट दर अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी असलेल्या औरंगाबादेत जेट एअरवेजचे विमान बंद झाल्याने अनेक लोक बेरोजगार झाले. पर्यटन, उद्योग क्षेत्रांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर किमान दिल्ली, मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींपासून उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, पर्यटन क्षेत्रातील लोकांकडून प्रयत्न सुरू आहे. 

‘इंडिगो’नेही दर्शविली सकारात्मकताइंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटरने गुरुवारी (दि.२७) ‘इंडिगो’च्या मुख्य वाणिज्य अधिकाऱ्यांकडे औरंगाबाद आणि दिल्लीहून विमानसेवा सुरू करण्याची मागणी के ली आहे. यामध्ये दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली, मुंबई-औरंगाबाद-मुंबई, मुंबई-औरंगाबाद-उदयपूर-औरंगाबाद-मुंबई आणि दिल्लीहून खजुराहो-वाराणसीसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. याचा या कंपनीने सकारात्मक विचार केला आहे. ‘जेट’मधून आलेले अधिकारी आमच्याशी जोडले गेले आहेत. त्यांना या मार्गांसंबंधी अधिक चांगली माहिती आहे. त्यामुळे या मार्गांसंबंधी पडताळणी, क्षमता पाहिली जाईल, असे ‘इंडिगो’ने इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटरला कळविली आहे. 

स्पाईस जेटच्या अधिकाऱ्यांनी केली विमानतळावर पाहणीचिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गुरुवारी स्पाईस जेटच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सोयी-सुविधा आणि प्रवासी क्षमतेचा आढावा घेतला. यामुळे लवकरच स्पाईस जेटकडून औरंगाबादहून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्पाईस जेटकडून दिल्ली, मुंबईसाठी विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

प्रयत्नांना यश मिळेलयापूर्वी विमानसेवेसाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केला जात होता. मात्र, आता सर्वांनी एकत्रितपणे पाठपुरावा सुरूकेला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे आहेत. औरंगाबादहून लवकरच नवीन विमान सुरू होईल.- जसवंत सिंह राजपूत, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरम

 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमानtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद