शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

औरंगाबादहून दोन नवीन विमानसेवा सुरू होण्याची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 17:52 IST

उदयपूरसह नव्या शहरांबरोबर हवाई कनेक्टिव्हिटी मिळण्याची अपेक्षा

ठळक मुद्देपर्यटन, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणीऔरंगाबादहून जेट एअरवेजकडून सकाळी आणि सायंकाळी विमानसेवा सुरू होती.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारी जेट एअरवेजची दोन विमाने बंद झालेली आहेत. त्यामुळे औरंगाबादहून दिल्ली, मुंबईसाठी किमान दोन नवीन विमानसेवा सुरू होण्याची क्षमता आहे. त्याबरोबर नव्या विमान कंपनी औरंगाबादेत आल्यास उदयपूरसह नव्या शहरांबरोबर हवाई कनेक्टिव्हिटी मिळण्याची अपेक्षा उद्योग, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

औरंगाबादहून जेट एअरवेजकडून सकाळी आणि सायंकाळी विमानसेवा सुरू होती. सायंकाळच्या वेळेत मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानाने दररोज १३४ प्रवाशांची ये-जा होत होती. एअर इंडिया, ट्रूजेट आणि जेट एअरवेज कंपनीच्या विमानसेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले गेले. मात्र, आता जेट एअरवेजची सेवा बंद झाली. परिणामी केवळ दोन कंपन्यांचीच सेवा उरली. सध्या दिल्ली, मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना एकमेव एअर इंडियाच्या विमानाचा आधार आहे. परंतु या विमानाची बुकिंग फुल होणे, अधिक तिकीट दर अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी असलेल्या औरंगाबादेत जेट एअरवेजचे विमान बंद झाल्याने अनेक लोक बेरोजगार झाले. पर्यटन, उद्योग क्षेत्रांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर किमान दिल्ली, मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींपासून उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, पर्यटन क्षेत्रातील लोकांकडून प्रयत्न सुरू आहे. 

‘इंडिगो’नेही दर्शविली सकारात्मकताइंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटरने गुरुवारी (दि.२७) ‘इंडिगो’च्या मुख्य वाणिज्य अधिकाऱ्यांकडे औरंगाबाद आणि दिल्लीहून विमानसेवा सुरू करण्याची मागणी के ली आहे. यामध्ये दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली, मुंबई-औरंगाबाद-मुंबई, मुंबई-औरंगाबाद-उदयपूर-औरंगाबाद-मुंबई आणि दिल्लीहून खजुराहो-वाराणसीसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. याचा या कंपनीने सकारात्मक विचार केला आहे. ‘जेट’मधून आलेले अधिकारी आमच्याशी जोडले गेले आहेत. त्यांना या मार्गांसंबंधी अधिक चांगली माहिती आहे. त्यामुळे या मार्गांसंबंधी पडताळणी, क्षमता पाहिली जाईल, असे ‘इंडिगो’ने इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटरला कळविली आहे. 

स्पाईस जेटच्या अधिकाऱ्यांनी केली विमानतळावर पाहणीचिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गुरुवारी स्पाईस जेटच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सोयी-सुविधा आणि प्रवासी क्षमतेचा आढावा घेतला. यामुळे लवकरच स्पाईस जेटकडून औरंगाबादहून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्पाईस जेटकडून दिल्ली, मुंबईसाठी विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

प्रयत्नांना यश मिळेलयापूर्वी विमानसेवेसाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केला जात होता. मात्र, आता सर्वांनी एकत्रितपणे पाठपुरावा सुरूकेला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे आहेत. औरंगाबादहून लवकरच नवीन विमान सुरू होईल.- जसवंत सिंह राजपूत, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरम

 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमानtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद