शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वीटभट्टीत भिंत पडून कामगार युवकाचा मृत्यू, हर्सूल परिसरातील घटना

By राम शिनगारे | Updated: February 8, 2023 21:01 IST

मृताच्या नातेवाइकांनी बल्करमध्ये आलेल्या राखेतील केमिकलचा स्फोट झाला. या स्फोटामुळे भिंती कोसळून भावनेशचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

औरंगाबाद : हर्सूल परिसरात वीटभट्टीमध्ये एक धक्कादायक दुर्घटना घडली. एका छोट्या खोलीमध्ये झोपलेल्या कुटुंबाच्या अंगावर मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता भिंत पडली. त्यात चौघेजण आतमध्ये गाडले गेले. त्यातील एका युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी हर्सूल पोलिस तपास करीत असल्याची माहिती निरीक्षक अमोल देवकर यांनी दिली.

भावनेश नंदू पवार (१९, रा. बिडकीन, ता. पैठण, ह.मु. चेतनानगर वीटभट्टी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. जखमींमध्ये मृताचे वडील नंदू पवार (४५), आई चंदा पवार (४०) आणि भाऊ योगेश पवार (१७) यांचा समावेश आहे. चेतनानगरमध्ये मातीसह सिमेंटच्या विटा बनविण्यात येणारी भट्टी आहे. त्याठिकाणी पवार कुटुंब कामाला आहे. एका बल्करमध्ये (एमएच २१, एक्स ८३८६) औष्णिक विद्युत केंद्रातून राख आणली होती. ही राख पाइपच्या माध्यमातून एका कच्च्या खोलीत टाकली जात होती.

याच खोलीच्या शेजारी कच्च्या विटांनी बनविलेल्या खोलीत पवार कुटुंब झोपले होते. खोलीत टाकल्या जाणाऱ्या राखेच्या दाबातून त्या खोलीसह शेजारच्या खोलीची भिंत कोसळली. भिंतीत पवार कुटुंबीय गाडले गेले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत चौघांना माती, विटांच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढून घाटी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून भावनेशचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. भावनेशचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास उपनिरीक्षक सुनील चव्हाण करीत आहेत.

केमिकलचा स्फोट का?मृताच्या नातेवाइकांनी बल्करमध्ये आलेल्या राखेतील केमिकलचा स्फोट झाला. या स्फोटामुळे भिंती कोसळून भावनेशचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, नातेवाइकांनी तक्रार दिल्यानंतर संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद