शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेपूर्वीच भावी वकिलांची कसोटी; विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा पाढा 

By राम शिनगारे | Updated: June 13, 2023 12:12 IST

आजपासून विधि अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु होत आहेत

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विधि महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात होत आहे. त्यापूर्वीच भावी वकिलांची कसोटी सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थी मागील सत्रात नापास झाल्यामुळे त्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज केले होते. त्याचा निकाल लागलेला नाही. तसेच अनेकांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. त्याविषयीचा निर्णय परीक्षेच्या पूर्वसंध्येपर्यंत समोर आला नसल्यामुळे विद्यार्थी चिंतित आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी म्हणाल्या, निकाल राखीव ठेवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी अर्ज सादर केले आहेत त्यांनी पुनर्परीक्षेसाठी अर्ज केलेला असेल तर त्यांनी परीक्षा द्यावी, ज्या परीक्षेत जास्त मार्क असतील ती ग्राह्य धरली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. फार्मसी आणि विधि अभ्यासक्रमांच्या अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यांच्या राखीव निकालाचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्याचवेळी नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी मिळण्यासाठी अर्ज केले होते. मात्र, त्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे रिचेकिंगचा निकालही जाहीर झालेला नाही. त्यामुळे पुनर्परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची की नाही, याविषयी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संदिग्धता आहे. 

ज्या पेपरला अधिक मार्क, ते ग्राह्य धरण्यात येतीलयाविषयी परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राखीव निकाल ठेवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली काढला आहे. तसेच फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन ऑनलाइन झालेले असल्यामुळे त्यांना फोटो काॅपी देण्यात येत नाही. विधि अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी अर्ज केलेला असेल तर त्या संबंधित विद्यार्थ्यांच्या प्राचार्यांच्या लॉगिनमध्ये आहेत. त्यामुळे त्या ठिकाणाहून त्यांना त्या मिळू शकतात. तसेच विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला असेल तर परीक्षा द्यावी, ज्या परीक्षेत सर्वाधिक मार्क आहेत, ते ग्राह्य धरण्यात येतील. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नसल्याचेही डॉ. गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थी