शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेपूर्वीच भावी वकिलांची कसोटी; विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा पाढा 

By राम शिनगारे | Updated: June 13, 2023 12:12 IST

आजपासून विधि अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु होत आहेत

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विधि महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात होत आहे. त्यापूर्वीच भावी वकिलांची कसोटी सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थी मागील सत्रात नापास झाल्यामुळे त्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज केले होते. त्याचा निकाल लागलेला नाही. तसेच अनेकांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. त्याविषयीचा निर्णय परीक्षेच्या पूर्वसंध्येपर्यंत समोर आला नसल्यामुळे विद्यार्थी चिंतित आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी म्हणाल्या, निकाल राखीव ठेवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी अर्ज सादर केले आहेत त्यांनी पुनर्परीक्षेसाठी अर्ज केलेला असेल तर त्यांनी परीक्षा द्यावी, ज्या परीक्षेत जास्त मार्क असतील ती ग्राह्य धरली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. फार्मसी आणि विधि अभ्यासक्रमांच्या अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यांच्या राखीव निकालाचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्याचवेळी नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी मिळण्यासाठी अर्ज केले होते. मात्र, त्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे रिचेकिंगचा निकालही जाहीर झालेला नाही. त्यामुळे पुनर्परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची की नाही, याविषयी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संदिग्धता आहे. 

ज्या पेपरला अधिक मार्क, ते ग्राह्य धरण्यात येतीलयाविषयी परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राखीव निकाल ठेवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली काढला आहे. तसेच फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन ऑनलाइन झालेले असल्यामुळे त्यांना फोटो काॅपी देण्यात येत नाही. विधि अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी अर्ज केलेला असेल तर त्या संबंधित विद्यार्थ्यांच्या प्राचार्यांच्या लॉगिनमध्ये आहेत. त्यामुळे त्या ठिकाणाहून त्यांना त्या मिळू शकतात. तसेच विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला असेल तर परीक्षा द्यावी, ज्या परीक्षेत सर्वाधिक मार्क आहेत, ते ग्राह्य धरण्यात येतील. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नसल्याचेही डॉ. गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थी