शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

परीक्षेपूर्वीच भावी वकिलांची कसोटी; विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा पाढा 

By राम शिनगारे | Updated: June 13, 2023 12:12 IST

आजपासून विधि अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु होत आहेत

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विधि महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात होत आहे. त्यापूर्वीच भावी वकिलांची कसोटी सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थी मागील सत्रात नापास झाल्यामुळे त्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज केले होते. त्याचा निकाल लागलेला नाही. तसेच अनेकांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. त्याविषयीचा निर्णय परीक्षेच्या पूर्वसंध्येपर्यंत समोर आला नसल्यामुळे विद्यार्थी चिंतित आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी म्हणाल्या, निकाल राखीव ठेवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी अर्ज सादर केले आहेत त्यांनी पुनर्परीक्षेसाठी अर्ज केलेला असेल तर त्यांनी परीक्षा द्यावी, ज्या परीक्षेत जास्त मार्क असतील ती ग्राह्य धरली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. फार्मसी आणि विधि अभ्यासक्रमांच्या अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यांच्या राखीव निकालाचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्याचवेळी नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी मिळण्यासाठी अर्ज केले होते. मात्र, त्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे रिचेकिंगचा निकालही जाहीर झालेला नाही. त्यामुळे पुनर्परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची की नाही, याविषयी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संदिग्धता आहे. 

ज्या पेपरला अधिक मार्क, ते ग्राह्य धरण्यात येतीलयाविषयी परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राखीव निकाल ठेवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली काढला आहे. तसेच फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन ऑनलाइन झालेले असल्यामुळे त्यांना फोटो काॅपी देण्यात येत नाही. विधि अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी अर्ज केलेला असेल तर त्या संबंधित विद्यार्थ्यांच्या प्राचार्यांच्या लॉगिनमध्ये आहेत. त्यामुळे त्या ठिकाणाहून त्यांना त्या मिळू शकतात. तसेच विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला असेल तर परीक्षा द्यावी, ज्या परीक्षेत सर्वाधिक मार्क आहेत, ते ग्राह्य धरण्यात येतील. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नसल्याचेही डॉ. गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थी