शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

शहरानंतर नाव बदलाची मोहीम किल्ल्यापर्यंत; दौलताबाद किल्ल्याचे नाव पुन्हा होणार 'देवगिरी'

By सुमेध उघडे | Updated: September 17, 2022 17:08 IST

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या पर्यटन विभागातर्फे आज दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भारतमाता मंदिराच्या प्रांगणात एका विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

औरंगाबाद: शहराजवळील ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याची ओळख पुन्हा एकदा देवगिरी किल्ला करण्यात येईल अशी घोषणा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज केली. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शहराची नावे बदलाची मोहीम आता किल्ल्याचे नाव बदलापर्यंत आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे. 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या पर्यटन विभागातर्फे आज दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भारतमाता मंदिराच्या प्रांगणात एका विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटन मंत्री लोढा यांनी देवगिरी किल्ल्याला गेल्या काही वर्षात दौलताबादचा किल्ला असं नाव पडलं आहे. ते पुन्हा देवगिरी किल्ला करण्याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती दिली. तसेच इथून पुढे दरवर्षी १७ सप्टेंबरला दौलताबाद येथील भारत माता मंदिराच्या प्रांगणात पर्यटन विभागाच्यावतीने ध्वजारोहण कार्यक्रम पार पडेल असेही त्यांनी सांगितले. शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे राज्य सरकारने पाठवला आहे. यासोबतच शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचा देखील प्रस्ताव आहे. ही नावे बदल्याची मोहीम आता किल्ल्याचे सुरुवातीचे नाव देण्यापर्यंत आली आहे. 

दौलताबाद किल्ल्याचा थोडक्यात इतिहासराष्ट्रकूट राजवंशाचा पाडाव झाल्यानंतर त्यांचा मांडलिक असलेल्या भिल्लम यादव (पाचवा) याने देवगिरीवर स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्या वंशात पुढे सिंघणदेव, कृष्णदेव, महादेव, आमणदेव आणि शेवटी रामचंद्रदेव यादव हे राजे झाले. दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी करून यादवांचा पराभव केला आणि संपत्ती लुटली, सत्ता मिळवली. पुढे मुहम्मद तुघलकने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवली होती. याच तुघलकाने देवगिरीचे नाव दौलताबाद केले. मात्र, अनेक अडचणी आल्याने तो पुन्हा दिल्ली गेला. त्यानंतर बहामनी, निजामशाही आणि मुघलांची या प्रदेशावर सत्ता राहिली. मलिक अंबर या वजीराने चांदबीबीच्या मृत्यूनंतर मुघलांपासून वाचवून अहमदनगरच्या निजामाला दौलताबादला आणून इथून त्याच्या नावे राज्य चालवले. त्यानंतर त्यांनी खडकीला तळ हलवला. पुढे मुघलांच्या काळात या खडकीचे नाव औरंगाबाद झाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDoulatabad Fortदौलताबाद किल्लाtourismपर्यटनMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढा