शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
4
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
5
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
6
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
7
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
8
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
9
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
10
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
11
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
12
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
13
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
14
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
15
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
16
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
17
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
18
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
20
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?

शहरानंतर नाव बदलाची मोहीम किल्ल्यापर्यंत; दौलताबाद किल्ल्याचे नाव पुन्हा होणार 'देवगिरी'

By सुमेध उघडे | Updated: September 17, 2022 17:08 IST

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या पर्यटन विभागातर्फे आज दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भारतमाता मंदिराच्या प्रांगणात एका विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

औरंगाबाद: शहराजवळील ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याची ओळख पुन्हा एकदा देवगिरी किल्ला करण्यात येईल अशी घोषणा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज केली. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शहराची नावे बदलाची मोहीम आता किल्ल्याचे नाव बदलापर्यंत आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे. 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या पर्यटन विभागातर्फे आज दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भारतमाता मंदिराच्या प्रांगणात एका विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटन मंत्री लोढा यांनी देवगिरी किल्ल्याला गेल्या काही वर्षात दौलताबादचा किल्ला असं नाव पडलं आहे. ते पुन्हा देवगिरी किल्ला करण्याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती दिली. तसेच इथून पुढे दरवर्षी १७ सप्टेंबरला दौलताबाद येथील भारत माता मंदिराच्या प्रांगणात पर्यटन विभागाच्यावतीने ध्वजारोहण कार्यक्रम पार पडेल असेही त्यांनी सांगितले. शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे राज्य सरकारने पाठवला आहे. यासोबतच शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचा देखील प्रस्ताव आहे. ही नावे बदल्याची मोहीम आता किल्ल्याचे सुरुवातीचे नाव देण्यापर्यंत आली आहे. 

दौलताबाद किल्ल्याचा थोडक्यात इतिहासराष्ट्रकूट राजवंशाचा पाडाव झाल्यानंतर त्यांचा मांडलिक असलेल्या भिल्लम यादव (पाचवा) याने देवगिरीवर स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्या वंशात पुढे सिंघणदेव, कृष्णदेव, महादेव, आमणदेव आणि शेवटी रामचंद्रदेव यादव हे राजे झाले. दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी करून यादवांचा पराभव केला आणि संपत्ती लुटली, सत्ता मिळवली. पुढे मुहम्मद तुघलकने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवली होती. याच तुघलकाने देवगिरीचे नाव दौलताबाद केले. मात्र, अनेक अडचणी आल्याने तो पुन्हा दिल्ली गेला. त्यानंतर बहामनी, निजामशाही आणि मुघलांची या प्रदेशावर सत्ता राहिली. मलिक अंबर या वजीराने चांदबीबीच्या मृत्यूनंतर मुघलांपासून वाचवून अहमदनगरच्या निजामाला दौलताबादला आणून इथून त्याच्या नावे राज्य चालवले. त्यानंतर त्यांनी खडकीला तळ हलवला. पुढे मुघलांच्या काळात या खडकीचे नाव औरंगाबाद झाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDoulatabad Fortदौलताबाद किल्लाtourismपर्यटनMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढा