शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर वाहतूक रोखून ‘अर्थ’पूर्ण चौकशी; पोलिसच साधताहेत ‘समृद्धी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:02 IST

गाड्या महामार्गावर मधोमध थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे वेगात येणाऱ्या इतर गाड्याही त्या ठिकाणी थांबल्या होत्या.

- शेख मुनीरछत्रपती संभाजीनगर : वेगवान वाहतुकीच्या मोहाने अनेकांच्या जिवावर उठलेला बाळासाहेब ठाकरे महामार्ग आता वाहतूक पोलिसांच्या ‘समृद्धी’त भर घालतो आहे. सुसाट वाहने महामार्गावर अचानक मध्यभागी थांबवून वाहतूक पोलिस त्यांची ‘अर्थ’पूर्ण चौकशी करीत असल्याने एक नवेच संकट वाहनचालकांवर आल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले.

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग अनेक कारणांनी चर्चेत आहे. वेगवान वाहनांच्या सतत होणाऱ्या अपघातामुळे समृद्धी महामार्ग प्रत्येकाच्या तोंडोतोंडी झालेला आहे. या संकटातून वाचणारे वाहनचालक आता वाहतूक पोलिसांच्या चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकत आहेत. महामार्गावर अचानक कुणालाही वाहने थांबविता येत नाहीत; परंतु जटवाडा परिसरात वाहतूक पोलिसांनी समृद्धीवरून जाणाऱ्या अवजड वाहनांना रोखून त्यांची झाडाझडती घेणे सुरू केले आहे. चौकशीचा ‘अर्थ’ ध्यानात घेऊन वाहनचालक वाहतूक पोलिसांना पाहून अगोदरच सावध होत आहेत. ट्रकचालकाशी सौहार्दाची बोलणी झाल्यावरच त्यांना पुढे जाऊ दिले जाते. या भागात एकाच वेळी शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या चार अवजड वाहतुकीच्या गाड्या रविवारी भरदुपारी थांबविण्यात आल्या होत्या. या गाड्यांमधील चालकांकडून गाडीच्या कागदपत्रांची तपासणी केली. वाहतूक पोलिसांशी बोलणी करून पुढे निघालेल्या एका ट्रकचालकाशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्याने चौकशीचे इंगित सांगितले. विशेष म्हणजे थांबविलेल्या या गाड्या महामार्गावर मधोमध थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे वेगात येणाऱ्या इतर गाड्याही त्या ठिकाणी थांबल्या होत्या. या रस्त्यावर कोठेही थांबण्यास मनाई आहे.

कागदपत्रांत क्षुल्लक त्रुटी आढळल्याने गाडी सोडण्यासाठी प्रत्येकी २०० रुपये द्यावे लागले.- संबंधित वाहनचालक.

‘समृद्धी’वर वाहने उभी करू नये : आरटीओसमृद्धी महामार्गावर पार्किंग करता येत नाही. पेट्रोल पंपावर दिलेल्या जागेतच वाहने उभी केली पाहिजेत. रस्त्यावर वाहन उभे केल्यास ‘नो पार्किंग’ची कारवाई केली जाते. तसेच नियमांचे उल्लंघन करून धावणाऱ्या वाहनांचे फोटो काढून कारवाई केली जाते, अशी माहिती आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी आरटीओ कार्यालयाने विविध उपाययोजना सुरूरु केल्या आहेत. यासाठी रात्रंदिवस दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. या महामार्गावर धोकादायक पद्धतीने वाहनांची पार्किंग करणाऱ्यांवरही आरटीओ कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांत तब्बल १ हजार ४०१ वाहनचालकांवर ‘नो पार्किंग’ची कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीस