शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महामार्गावर वाहतूक रोखून ‘अर्थ’पूर्ण चौकशी; पोलिसच साधताहेत ‘समृद्धी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:02 IST

गाड्या महामार्गावर मधोमध थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे वेगात येणाऱ्या इतर गाड्याही त्या ठिकाणी थांबल्या होत्या.

- शेख मुनीरछत्रपती संभाजीनगर : वेगवान वाहतुकीच्या मोहाने अनेकांच्या जिवावर उठलेला बाळासाहेब ठाकरे महामार्ग आता वाहतूक पोलिसांच्या ‘समृद्धी’त भर घालतो आहे. सुसाट वाहने महामार्गावर अचानक मध्यभागी थांबवून वाहतूक पोलिस त्यांची ‘अर्थ’पूर्ण चौकशी करीत असल्याने एक नवेच संकट वाहनचालकांवर आल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले.

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग अनेक कारणांनी चर्चेत आहे. वेगवान वाहनांच्या सतत होणाऱ्या अपघातामुळे समृद्धी महामार्ग प्रत्येकाच्या तोंडोतोंडी झालेला आहे. या संकटातून वाचणारे वाहनचालक आता वाहतूक पोलिसांच्या चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकत आहेत. महामार्गावर अचानक कुणालाही वाहने थांबविता येत नाहीत; परंतु जटवाडा परिसरात वाहतूक पोलिसांनी समृद्धीवरून जाणाऱ्या अवजड वाहनांना रोखून त्यांची झाडाझडती घेणे सुरू केले आहे. चौकशीचा ‘अर्थ’ ध्यानात घेऊन वाहनचालक वाहतूक पोलिसांना पाहून अगोदरच सावध होत आहेत. ट्रकचालकाशी सौहार्दाची बोलणी झाल्यावरच त्यांना पुढे जाऊ दिले जाते. या भागात एकाच वेळी शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या चार अवजड वाहतुकीच्या गाड्या रविवारी भरदुपारी थांबविण्यात आल्या होत्या. या गाड्यांमधील चालकांकडून गाडीच्या कागदपत्रांची तपासणी केली. वाहतूक पोलिसांशी बोलणी करून पुढे निघालेल्या एका ट्रकचालकाशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्याने चौकशीचे इंगित सांगितले. विशेष म्हणजे थांबविलेल्या या गाड्या महामार्गावर मधोमध थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे वेगात येणाऱ्या इतर गाड्याही त्या ठिकाणी थांबल्या होत्या. या रस्त्यावर कोठेही थांबण्यास मनाई आहे.

कागदपत्रांत क्षुल्लक त्रुटी आढळल्याने गाडी सोडण्यासाठी प्रत्येकी २०० रुपये द्यावे लागले.- संबंधित वाहनचालक.

‘समृद्धी’वर वाहने उभी करू नये : आरटीओसमृद्धी महामार्गावर पार्किंग करता येत नाही. पेट्रोल पंपावर दिलेल्या जागेतच वाहने उभी केली पाहिजेत. रस्त्यावर वाहन उभे केल्यास ‘नो पार्किंग’ची कारवाई केली जाते. तसेच नियमांचे उल्लंघन करून धावणाऱ्या वाहनांचे फोटो काढून कारवाई केली जाते, अशी माहिती आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी आरटीओ कार्यालयाने विविध उपाययोजना सुरूरु केल्या आहेत. यासाठी रात्रंदिवस दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. या महामार्गावर धोकादायक पद्धतीने वाहनांची पार्किंग करणाऱ्यांवरही आरटीओ कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांत तब्बल १ हजार ४०१ वाहनचालकांवर ‘नो पार्किंग’ची कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीस