शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साखर, तेलाविनाच वाटाला ‘आनंदाचा शिधा’; अर्धवट पुरवठ्यामुळे प्रशासनाची तारेवरची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 12:15 IST

दिवाळीच्या दिवसांपर्यंत कंत्राटदाराकडून जिल्ह्याला मागणीनुसार फूड किट मिळाल्या नाहीत.

औरंगाबाद : राज्य सरकारने दिवाळीनिमित्ताने रेशन दुकानातून रवा, साखर, हरभरा डाळ आणि पामतेल या चार वस्तूंचे किट ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमातून गरिबांना देण्याचा निर्णय घेतला, पण या उपक्रमात किटमधील साहित्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठाच केला नाही. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी साखर, तेल यांच्याशिवायच हा शिधा वाटप करावा लागला. परिणामी शासनाच्या उद्देश्याला हरताळ फासला गेला. जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांपर्यंत किट वाटप करताना पुरवठा विभागाची प्रचंड दमछाक झाली.

दिवाळीच्या दिवसापर्यंत पुरवठा विभागाला रवा, हरभरा डाळ मागणीनुसार मिळाले. तेल, साखरेचा अर्धवट प्रमाणात पुरवठा झाला. अनेक दारिद्र्य रेषेखालील व प्राधान्य कुटुंब कार्डधारकांच्या पदरात ‘आनंदचा शिधा’ अर्धवटच पडला. प्रशासनाने तीन वस्तू असलेले किट प्रत्येकी ७५ रुपयांमध्ये वाटप केल्या. अनेक ठिकाणी तेल, साखरेविनाच शिधा वाटप झाले.

जिल्ह्यात ७ लाख ३३ हजार ५०२ रेशन कार्डधारक आहेत. त्यापैकी ५ लाख ५८ हजार कार्डधारक रेशन धान्यास पात्र आहेत. या सर्व कार्डधारकांना शासनाच्या घोषणेनुसार यंदा दिवाळीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरित केला जाणार होता. शासनाने दिवाळी किट उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटदारही नियुक्त केला. जिल्हा पुरवठा विभागाने कंत्राटदाराकडे दुसऱ्याच दिवशी फूड पॅकेटची मागणी नोंदविली होती, परंतु दिवाळीच्या दिवसांपर्यंत कंत्राटदाराकडून जिल्ह्याला मागणीनुसार फूड किट मिळाल्या नाहीत. त्यामुळे पुरवठा विभागासह रेशन दुकानदारांना तारेवरची कसरत करावी लागली.

५०१ दुकानांवर दिल्या तीन वस्तूजिल्ह्यात १८०१ रेशन दुकानांपैकी अंदाजे १३०० दुकानांवर दिवाळीचे फूड किट शंभर टक्के पुरवठा करण्यात प्रशासनाला यश आले. ३० टक्के रेशन दुकानांवर केवळ चारऐवजी तीन वस्तू उपलब्ध झाल्या. त्यामुळे ५०१ दुकानांशी संलग्न असलेल्या कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमातील पूर्ण किट दिवाळसणात मिळाले नाही.

जे उपलब्ध झाले ते दिलेअखेर जिल्हा पुरवठा विभागाने ज्या ठिकाणी तीन पॅकेट उपलब्ध आहेत, त्या दुकानदारांनी शंभरऐवजी ७५ रुपये घेऊन ते कार्डधारकांना वितरीत करावेत, असा निर्णय घेतला. तीन फुड पॅकेट का देताय, उर्वरित पॅकेट कुठे आहेत, असा सवाल उपस्थितीत करीत ग्राहकांनी दुकानदारांसोबत वाद घातल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDiwaliदिवाळी 2022