शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

साखर, तेलाविनाच वाटाला ‘आनंदाचा शिधा’; अर्धवट पुरवठ्यामुळे प्रशासनाची तारेवरची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 12:15 IST

दिवाळीच्या दिवसांपर्यंत कंत्राटदाराकडून जिल्ह्याला मागणीनुसार फूड किट मिळाल्या नाहीत.

औरंगाबाद : राज्य सरकारने दिवाळीनिमित्ताने रेशन दुकानातून रवा, साखर, हरभरा डाळ आणि पामतेल या चार वस्तूंचे किट ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमातून गरिबांना देण्याचा निर्णय घेतला, पण या उपक्रमात किटमधील साहित्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठाच केला नाही. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी साखर, तेल यांच्याशिवायच हा शिधा वाटप करावा लागला. परिणामी शासनाच्या उद्देश्याला हरताळ फासला गेला. जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांपर्यंत किट वाटप करताना पुरवठा विभागाची प्रचंड दमछाक झाली.

दिवाळीच्या दिवसापर्यंत पुरवठा विभागाला रवा, हरभरा डाळ मागणीनुसार मिळाले. तेल, साखरेचा अर्धवट प्रमाणात पुरवठा झाला. अनेक दारिद्र्य रेषेखालील व प्राधान्य कुटुंब कार्डधारकांच्या पदरात ‘आनंदचा शिधा’ अर्धवटच पडला. प्रशासनाने तीन वस्तू असलेले किट प्रत्येकी ७५ रुपयांमध्ये वाटप केल्या. अनेक ठिकाणी तेल, साखरेविनाच शिधा वाटप झाले.

जिल्ह्यात ७ लाख ३३ हजार ५०२ रेशन कार्डधारक आहेत. त्यापैकी ५ लाख ५८ हजार कार्डधारक रेशन धान्यास पात्र आहेत. या सर्व कार्डधारकांना शासनाच्या घोषणेनुसार यंदा दिवाळीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरित केला जाणार होता. शासनाने दिवाळी किट उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटदारही नियुक्त केला. जिल्हा पुरवठा विभागाने कंत्राटदाराकडे दुसऱ्याच दिवशी फूड पॅकेटची मागणी नोंदविली होती, परंतु दिवाळीच्या दिवसांपर्यंत कंत्राटदाराकडून जिल्ह्याला मागणीनुसार फूड किट मिळाल्या नाहीत. त्यामुळे पुरवठा विभागासह रेशन दुकानदारांना तारेवरची कसरत करावी लागली.

५०१ दुकानांवर दिल्या तीन वस्तूजिल्ह्यात १८०१ रेशन दुकानांपैकी अंदाजे १३०० दुकानांवर दिवाळीचे फूड किट शंभर टक्के पुरवठा करण्यात प्रशासनाला यश आले. ३० टक्के रेशन दुकानांवर केवळ चारऐवजी तीन वस्तू उपलब्ध झाल्या. त्यामुळे ५०१ दुकानांशी संलग्न असलेल्या कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमातील पूर्ण किट दिवाळसणात मिळाले नाही.

जे उपलब्ध झाले ते दिलेअखेर जिल्हा पुरवठा विभागाने ज्या ठिकाणी तीन पॅकेट उपलब्ध आहेत, त्या दुकानदारांनी शंभरऐवजी ७५ रुपये घेऊन ते कार्डधारकांना वितरीत करावेत, असा निर्णय घेतला. तीन फुड पॅकेट का देताय, उर्वरित पॅकेट कुठे आहेत, असा सवाल उपस्थितीत करीत ग्राहकांनी दुकानदारांसोबत वाद घातल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDiwaliदिवाळी 2022