शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

सासरहून पळालेल्या विवाहितेची बॉयफ्रेंडसोबत रेल्वेसमोर उडी; युवकाचा मृत्यू, विवाहिता बचावली

By राम शिनगारे | Updated: March 29, 2023 17:52 IST

लग्नानंतर महिनाभरातच विवाहिता बॉयफ्रेंडसोबत पळाली; ठाणे येथून दोघेही आले होते छत्रपती संभाजीनगरात

छत्रपती संभाजीनगर : एक महिन्यापूर्वी विवाह झालेल्या युवतीने प्रियकरासोबत ठाण्यातून पळ काढला. पुण्यातून हे जोडपे छत्रपती संभाजीनगरात मंगळवारी सायंकाळी दाखल झाले. दोघांना एकत्रित राहता येत नाही, त्यामुळे एकनाथनगर भागातील रेल्वेसमोर रात्री ९.३० वाजता युवकाने उडी घेतली. त्याच्या पाठोपाठ युवतीनेही उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्यात युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर युवती जखमी झाली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद उस्मानपुरा पोलिस ठाण्यात केल्याची माहिती निरीक्षक गिता बागवडे यांनी दिली.

उमेश मोहन तारू (२३, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे मृत प्रियकराचे तर पुजा विनोद तायडे (१९, रा. हनुमानकुंडनगर, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे जखमी विवाहित युवतीचे नाव आहे. उस्मानपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश व पुजा यांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्यास दोन्ही कुटुंबाचा विरोध असल्यामुळे पुजाचा विवाह मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपुर जिल्ह्यातील युवकासोबत २८ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला. पुजाचा पती ठाणे येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. लग्नानंतर पुजा काही दिवस सासरी राहिल्यानंतर माहेरी आली. दोन दिवसांपूर्वी ती ठाण्यात नवऱ्याकडे राहण्यास गेली. तेव्हा उमेश आणि पुजात फोनवरून बोलणे सुरू होते. उमेश तिला भेटण्यासाठी ठाण्यात गेला. तेथून दोघे पळून पुण्यात आले. उमेशने पुण्यात भावाकडून काही पैसे घेतले. त्यानंतर दोघे छत्रपती संभाजीनगर येथे बसने मंगळवारी सायंकाळी पोहचले. शहरातच लॉजवर दोघे राहणार होते.

मात्र, दोघांच्या कुटुंबांना सोबत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फोन सुरू झाले. युवतीचा विवाह झालेला असल्यामुळे मुलाचे कुटुंब दोघांच्या विवाहाला मान्यता देणार नाहीत, या भितीमुळे उमेशने सोबत राहू शकत नाहीत तर आत्महत्या करू असा निर्णय घेतला. त्यासाठी दोघे चालतच एकनाथनगर भागातील रेल्वे रूळाकडे गेले. युवती उमेशच्या मोबाईलवरून त्याच्या भावाशी बोलत असतानाच ९.३० वाजेच्या सुमारास आलेल्या रेल्वेसमोर उमेशने उडी घेतली. रेल्वेच्या धडकेने तो दुरवर फेकला गेला. युवतीनेही रेल्वेकडे धाव घेतली. तिच्या डोक्याला मार लागला. उमेश जागीच ठार झाल्यामुळे युवतीने मदतीसाठी अनेकांना बोलावले. मात्र, उस्मानपुरा पोलिस आल्यानंतर त्यांनी दोघांना घाटीत दाखल केले. या घटनाक्रमाविषयी उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रतन डोईफोने यांनी युवतीचा सविस्तर जबाब नोंदवला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार राजेश फिरंगे करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी