शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

सासरहून पळालेल्या विवाहितेची बॉयफ्रेंडसोबत रेल्वेसमोर उडी; युवकाचा मृत्यू, विवाहिता बचावली

By राम शिनगारे | Updated: March 29, 2023 17:52 IST

लग्नानंतर महिनाभरातच विवाहिता बॉयफ्रेंडसोबत पळाली; ठाणे येथून दोघेही आले होते छत्रपती संभाजीनगरात

छत्रपती संभाजीनगर : एक महिन्यापूर्वी विवाह झालेल्या युवतीने प्रियकरासोबत ठाण्यातून पळ काढला. पुण्यातून हे जोडपे छत्रपती संभाजीनगरात मंगळवारी सायंकाळी दाखल झाले. दोघांना एकत्रित राहता येत नाही, त्यामुळे एकनाथनगर भागातील रेल्वेसमोर रात्री ९.३० वाजता युवकाने उडी घेतली. त्याच्या पाठोपाठ युवतीनेही उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्यात युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर युवती जखमी झाली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद उस्मानपुरा पोलिस ठाण्यात केल्याची माहिती निरीक्षक गिता बागवडे यांनी दिली.

उमेश मोहन तारू (२३, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे मृत प्रियकराचे तर पुजा विनोद तायडे (१९, रा. हनुमानकुंडनगर, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे जखमी विवाहित युवतीचे नाव आहे. उस्मानपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश व पुजा यांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्यास दोन्ही कुटुंबाचा विरोध असल्यामुळे पुजाचा विवाह मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपुर जिल्ह्यातील युवकासोबत २८ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला. पुजाचा पती ठाणे येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. लग्नानंतर पुजा काही दिवस सासरी राहिल्यानंतर माहेरी आली. दोन दिवसांपूर्वी ती ठाण्यात नवऱ्याकडे राहण्यास गेली. तेव्हा उमेश आणि पुजात फोनवरून बोलणे सुरू होते. उमेश तिला भेटण्यासाठी ठाण्यात गेला. तेथून दोघे पळून पुण्यात आले. उमेशने पुण्यात भावाकडून काही पैसे घेतले. त्यानंतर दोघे छत्रपती संभाजीनगर येथे बसने मंगळवारी सायंकाळी पोहचले. शहरातच लॉजवर दोघे राहणार होते.

मात्र, दोघांच्या कुटुंबांना सोबत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फोन सुरू झाले. युवतीचा विवाह झालेला असल्यामुळे मुलाचे कुटुंब दोघांच्या विवाहाला मान्यता देणार नाहीत, या भितीमुळे उमेशने सोबत राहू शकत नाहीत तर आत्महत्या करू असा निर्णय घेतला. त्यासाठी दोघे चालतच एकनाथनगर भागातील रेल्वे रूळाकडे गेले. युवती उमेशच्या मोबाईलवरून त्याच्या भावाशी बोलत असतानाच ९.३० वाजेच्या सुमारास आलेल्या रेल्वेसमोर उमेशने उडी घेतली. रेल्वेच्या धडकेने तो दुरवर फेकला गेला. युवतीनेही रेल्वेकडे धाव घेतली. तिच्या डोक्याला मार लागला. उमेश जागीच ठार झाल्यामुळे युवतीने मदतीसाठी अनेकांना बोलावले. मात्र, उस्मानपुरा पोलिस आल्यानंतर त्यांनी दोघांना घाटीत दाखल केले. या घटनाक्रमाविषयी उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रतन डोईफोने यांनी युवतीचा सविस्तर जबाब नोंदवला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार राजेश फिरंगे करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी