शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

सासरहून पळालेल्या विवाहितेची बॉयफ्रेंडसोबत रेल्वेसमोर उडी; युवकाचा मृत्यू, विवाहिता बचावली

By राम शिनगारे | Updated: March 29, 2023 17:52 IST

लग्नानंतर महिनाभरातच विवाहिता बॉयफ्रेंडसोबत पळाली; ठाणे येथून दोघेही आले होते छत्रपती संभाजीनगरात

छत्रपती संभाजीनगर : एक महिन्यापूर्वी विवाह झालेल्या युवतीने प्रियकरासोबत ठाण्यातून पळ काढला. पुण्यातून हे जोडपे छत्रपती संभाजीनगरात मंगळवारी सायंकाळी दाखल झाले. दोघांना एकत्रित राहता येत नाही, त्यामुळे एकनाथनगर भागातील रेल्वेसमोर रात्री ९.३० वाजता युवकाने उडी घेतली. त्याच्या पाठोपाठ युवतीनेही उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्यात युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर युवती जखमी झाली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद उस्मानपुरा पोलिस ठाण्यात केल्याची माहिती निरीक्षक गिता बागवडे यांनी दिली.

उमेश मोहन तारू (२३, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे मृत प्रियकराचे तर पुजा विनोद तायडे (१९, रा. हनुमानकुंडनगर, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे जखमी विवाहित युवतीचे नाव आहे. उस्मानपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश व पुजा यांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्यास दोन्ही कुटुंबाचा विरोध असल्यामुळे पुजाचा विवाह मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपुर जिल्ह्यातील युवकासोबत २८ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला. पुजाचा पती ठाणे येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. लग्नानंतर पुजा काही दिवस सासरी राहिल्यानंतर माहेरी आली. दोन दिवसांपूर्वी ती ठाण्यात नवऱ्याकडे राहण्यास गेली. तेव्हा उमेश आणि पुजात फोनवरून बोलणे सुरू होते. उमेश तिला भेटण्यासाठी ठाण्यात गेला. तेथून दोघे पळून पुण्यात आले. उमेशने पुण्यात भावाकडून काही पैसे घेतले. त्यानंतर दोघे छत्रपती संभाजीनगर येथे बसने मंगळवारी सायंकाळी पोहचले. शहरातच लॉजवर दोघे राहणार होते.

मात्र, दोघांच्या कुटुंबांना सोबत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फोन सुरू झाले. युवतीचा विवाह झालेला असल्यामुळे मुलाचे कुटुंब दोघांच्या विवाहाला मान्यता देणार नाहीत, या भितीमुळे उमेशने सोबत राहू शकत नाहीत तर आत्महत्या करू असा निर्णय घेतला. त्यासाठी दोघे चालतच एकनाथनगर भागातील रेल्वे रूळाकडे गेले. युवती उमेशच्या मोबाईलवरून त्याच्या भावाशी बोलत असतानाच ९.३० वाजेच्या सुमारास आलेल्या रेल्वेसमोर उमेशने उडी घेतली. रेल्वेच्या धडकेने तो दुरवर फेकला गेला. युवतीनेही रेल्वेकडे धाव घेतली. तिच्या डोक्याला मार लागला. उमेश जागीच ठार झाल्यामुळे युवतीने मदतीसाठी अनेकांना बोलावले. मात्र, उस्मानपुरा पोलिस आल्यानंतर त्यांनी दोघांना घाटीत दाखल केले. या घटनाक्रमाविषयी उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रतन डोईफोने यांनी युवतीचा सविस्तर जबाब नोंदवला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार राजेश फिरंगे करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी