शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मजुराच्या पोराने बनविली चुंबकीय बलावर धावणारी रेल्वे; बुलेट ट्रेनला ठरेल पर्याय

By विजय सरवदे | Updated: March 27, 2023 15:47 IST

चार वर्षांपूर्वी डॉ. रावजी शिंदे यांनी आपल्या सहकारी शास्त्रज्ञांसोबत चुंबकीय रेल्वेचे प्रारूप (मॉडेल) तयार केले.

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागात लहानाचा मोठा झालेल्या एका तरुणाने आपल्या अथक बुद्धीच्या बळावर देशातील पहिली इंधन विरहित रेल्वे तयार केली. ही रेल्वे चुंबकीय बलावर ताशी ६०० किमी वेगाने धावू शकते, शिवाय ती बुलेट ट्रेनलाही पर्याय ठरेल. पुढील महिन्यात चेन्नई येथील आयआयटीमध्ये या रेल्वेच्या मॉडेलचे परीक्षण केले जाणार आहे. थोर शास्त्रज्ञ डॉ. रावजी शिंदे यांनी तयार केलेली ही रेल्वे भविष्यात परिवहन क्षेत्रामध्ये क्रांती करणारी ठरेल.

संगमनेर तालुक्यातील मनोलीचे रहिवासी डॉ. रावजी शिंदे यांनी माजी राष्ट्रपती ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या टीममध्ये आठ वर्षे काम केले. ते नुकतेच ‘एमजीएम’मध्ये एका राष्ट्रीय चर्चासत्रासाठी आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ला त्यांनी या चुंबकीय रेल्वेच्या (मॅग्लेव्ह) संशोधनाचा इतिहास तसेच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत संरक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती कथन केला.

डॉ. शिंदे हे कानपूर येथील आयआयटीचे सुवर्णपदक विजेते आहेत. त्यांनी स्वदेशी चुंबकीय तंत्रज्ञान विकसित केले असून भारत सरकारने त्यांना ‘उत्कृष्ट वैज्ञानिक’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. असे असले तरी त्यांचे लहानपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानतर ‘गेट’ परीक्षेत देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे त्यांना ठाऊकही नव्हते. त्यावेळी ते आईला मदत म्हणून खदानीत दगड फोडण्याचे काम करायचे. कानपूर येथे आयआयटीची पदवी घेतल्यानंतर ते डॉ. शिंदे सांगतात, जपानमध्ये उच्चशिक्षणासाठी गेलो. तेथेच पीएच.डी.ची पदवी संपादन केली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम कार्यक्रमासाठी जपानला आले आणि भारतीय विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. तेव्हा भारतात आयआयटी करून आपले विद्यार्थी पदवीचा उपयोग विदेशासाठी करतात. देशाला तुमची गरज आहे. तुम्ही परत चला, अशी त्यांनी साद दिली आणि मी त्यांच्यासोबत भारतात परत आलो. ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’त त्यांच्या टीममध्ये बरेच वर्षे काम केले.

भारत तिसरा देश ठरेलअलीकडे चार वर्षांपूर्वी डॉ. शिंदे यांनी आपल्या सहकारी शास्त्रज्ञांसोबत चुंबकीय रेल्वेचे प्रारूप (मॉडेल) तयार केले. ही रेल्वे चालविण्यासाठी द्रवरूप नायट्रोजन चुंबकीय शक्तीच्या रुळांचा वापर केला जातो. रेल्वेच्या प्रारूपाची प्रात्यक्षिके यशस्वी झाल्यानंतर त्यासंबंधी भारत सरकारसोबत चर्चा झाली. मात्र, कोरोना काळात दोन वर्षे गेली. आता चेन्नई येथील आयआयटीतील रेल्वे विभागाने या रेल्वेच्या परीक्षणासाठी निमंत्रण दिले आहे. ही रेल्वे प्रत्यक्षात उतरल्यास चुंबकीय रेल्वेसाठी जपान आणि चीननंतर भारत देश जगात तिसरा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :railwayरेल्वेtourismपर्यटनscienceविज्ञानAurangabadऔरंगाबाद