शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मजुराच्या पोराने बनविली चुंबकीय बलावर धावणारी रेल्वे; बुलेट ट्रेनला ठरेल पर्याय

By विजय सरवदे | Updated: March 27, 2023 15:47 IST

चार वर्षांपूर्वी डॉ. रावजी शिंदे यांनी आपल्या सहकारी शास्त्रज्ञांसोबत चुंबकीय रेल्वेचे प्रारूप (मॉडेल) तयार केले.

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागात लहानाचा मोठा झालेल्या एका तरुणाने आपल्या अथक बुद्धीच्या बळावर देशातील पहिली इंधन विरहित रेल्वे तयार केली. ही रेल्वे चुंबकीय बलावर ताशी ६०० किमी वेगाने धावू शकते, शिवाय ती बुलेट ट्रेनलाही पर्याय ठरेल. पुढील महिन्यात चेन्नई येथील आयआयटीमध्ये या रेल्वेच्या मॉडेलचे परीक्षण केले जाणार आहे. थोर शास्त्रज्ञ डॉ. रावजी शिंदे यांनी तयार केलेली ही रेल्वे भविष्यात परिवहन क्षेत्रामध्ये क्रांती करणारी ठरेल.

संगमनेर तालुक्यातील मनोलीचे रहिवासी डॉ. रावजी शिंदे यांनी माजी राष्ट्रपती ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या टीममध्ये आठ वर्षे काम केले. ते नुकतेच ‘एमजीएम’मध्ये एका राष्ट्रीय चर्चासत्रासाठी आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ला त्यांनी या चुंबकीय रेल्वेच्या (मॅग्लेव्ह) संशोधनाचा इतिहास तसेच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत संरक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती कथन केला.

डॉ. शिंदे हे कानपूर येथील आयआयटीचे सुवर्णपदक विजेते आहेत. त्यांनी स्वदेशी चुंबकीय तंत्रज्ञान विकसित केले असून भारत सरकारने त्यांना ‘उत्कृष्ट वैज्ञानिक’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. असे असले तरी त्यांचे लहानपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानतर ‘गेट’ परीक्षेत देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे त्यांना ठाऊकही नव्हते. त्यावेळी ते आईला मदत म्हणून खदानीत दगड फोडण्याचे काम करायचे. कानपूर येथे आयआयटीची पदवी घेतल्यानंतर ते डॉ. शिंदे सांगतात, जपानमध्ये उच्चशिक्षणासाठी गेलो. तेथेच पीएच.डी.ची पदवी संपादन केली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम कार्यक्रमासाठी जपानला आले आणि भारतीय विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. तेव्हा भारतात आयआयटी करून आपले विद्यार्थी पदवीचा उपयोग विदेशासाठी करतात. देशाला तुमची गरज आहे. तुम्ही परत चला, अशी त्यांनी साद दिली आणि मी त्यांच्यासोबत भारतात परत आलो. ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’त त्यांच्या टीममध्ये बरेच वर्षे काम केले.

भारत तिसरा देश ठरेलअलीकडे चार वर्षांपूर्वी डॉ. शिंदे यांनी आपल्या सहकारी शास्त्रज्ञांसोबत चुंबकीय रेल्वेचे प्रारूप (मॉडेल) तयार केले. ही रेल्वे चालविण्यासाठी द्रवरूप नायट्रोजन चुंबकीय शक्तीच्या रुळांचा वापर केला जातो. रेल्वेच्या प्रारूपाची प्रात्यक्षिके यशस्वी झाल्यानंतर त्यासंबंधी भारत सरकारसोबत चर्चा झाली. मात्र, कोरोना काळात दोन वर्षे गेली. आता चेन्नई येथील आयआयटीतील रेल्वे विभागाने या रेल्वेच्या परीक्षणासाठी निमंत्रण दिले आहे. ही रेल्वे प्रत्यक्षात उतरल्यास चुंबकीय रेल्वेसाठी जपान आणि चीननंतर भारत देश जगात तिसरा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :railwayरेल्वेtourismपर्यटनscienceविज्ञानAurangabadऔरंगाबाद