शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

मजुराच्या पोराने बनविली चुंबकीय बलावर धावणारी रेल्वे; बुलेट ट्रेनला ठरेल पर्याय

By विजय सरवदे | Updated: March 27, 2023 15:47 IST

चार वर्षांपूर्वी डॉ. रावजी शिंदे यांनी आपल्या सहकारी शास्त्रज्ञांसोबत चुंबकीय रेल्वेचे प्रारूप (मॉडेल) तयार केले.

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागात लहानाचा मोठा झालेल्या एका तरुणाने आपल्या अथक बुद्धीच्या बळावर देशातील पहिली इंधन विरहित रेल्वे तयार केली. ही रेल्वे चुंबकीय बलावर ताशी ६०० किमी वेगाने धावू शकते, शिवाय ती बुलेट ट्रेनलाही पर्याय ठरेल. पुढील महिन्यात चेन्नई येथील आयआयटीमध्ये या रेल्वेच्या मॉडेलचे परीक्षण केले जाणार आहे. थोर शास्त्रज्ञ डॉ. रावजी शिंदे यांनी तयार केलेली ही रेल्वे भविष्यात परिवहन क्षेत्रामध्ये क्रांती करणारी ठरेल.

संगमनेर तालुक्यातील मनोलीचे रहिवासी डॉ. रावजी शिंदे यांनी माजी राष्ट्रपती ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या टीममध्ये आठ वर्षे काम केले. ते नुकतेच ‘एमजीएम’मध्ये एका राष्ट्रीय चर्चासत्रासाठी आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ला त्यांनी या चुंबकीय रेल्वेच्या (मॅग्लेव्ह) संशोधनाचा इतिहास तसेच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत संरक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती कथन केला.

डॉ. शिंदे हे कानपूर येथील आयआयटीचे सुवर्णपदक विजेते आहेत. त्यांनी स्वदेशी चुंबकीय तंत्रज्ञान विकसित केले असून भारत सरकारने त्यांना ‘उत्कृष्ट वैज्ञानिक’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. असे असले तरी त्यांचे लहानपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानतर ‘गेट’ परीक्षेत देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे त्यांना ठाऊकही नव्हते. त्यावेळी ते आईला मदत म्हणून खदानीत दगड फोडण्याचे काम करायचे. कानपूर येथे आयआयटीची पदवी घेतल्यानंतर ते डॉ. शिंदे सांगतात, जपानमध्ये उच्चशिक्षणासाठी गेलो. तेथेच पीएच.डी.ची पदवी संपादन केली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम कार्यक्रमासाठी जपानला आले आणि भारतीय विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. तेव्हा भारतात आयआयटी करून आपले विद्यार्थी पदवीचा उपयोग विदेशासाठी करतात. देशाला तुमची गरज आहे. तुम्ही परत चला, अशी त्यांनी साद दिली आणि मी त्यांच्यासोबत भारतात परत आलो. ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’त त्यांच्या टीममध्ये बरेच वर्षे काम केले.

भारत तिसरा देश ठरेलअलीकडे चार वर्षांपूर्वी डॉ. शिंदे यांनी आपल्या सहकारी शास्त्रज्ञांसोबत चुंबकीय रेल्वेचे प्रारूप (मॉडेल) तयार केले. ही रेल्वे चालविण्यासाठी द्रवरूप नायट्रोजन चुंबकीय शक्तीच्या रुळांचा वापर केला जातो. रेल्वेच्या प्रारूपाची प्रात्यक्षिके यशस्वी झाल्यानंतर त्यासंबंधी भारत सरकारसोबत चर्चा झाली. मात्र, कोरोना काळात दोन वर्षे गेली. आता चेन्नई येथील आयआयटीतील रेल्वे विभागाने या रेल्वेच्या परीक्षणासाठी निमंत्रण दिले आहे. ही रेल्वे प्रत्यक्षात उतरल्यास चुंबकीय रेल्वेसाठी जपान आणि चीननंतर भारत देश जगात तिसरा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :railwayरेल्वेtourismपर्यटनscienceविज्ञानAurangabadऔरंगाबाद