शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

शुभ वर्तमान ! औरंगाबादमधील ९५० धार्मिक स्थळे नियमित होणार, मनपा लवकरच अंतिम यादी प्रसिद्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 13:26 IST

शहरातील विविध धर्मीयांसाठी आनंदाची बाब म्हणजे तब्बल ९५० धार्मिक स्थळे लवकरच अधिकृत होणार आहेत. महापालिकेने खंडपीठाच्या आदेशानुसार नागरिकांचे म्हणणे एकूण घेऊन ९९ टक्के धार्मिक स्थळे अधिकृत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

ठळक मुद्देअधिकृत धार्मिक स्थळांची यादीही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी मोजकीच धार्मिक स्थळे काढण्यात येतील.

औरंगाबाद : शहरातील विविध धर्मीयांसाठी आनंदाची बाब म्हणजे तब्बल ९५० धार्मिक स्थळे लवकरच अधिकृत होणार आहेत. शहरातील विविध धर्मीयांसाठी आनंदाची बाब म्हणजे तब्बल ९५० धार्मिक स्थळे लवकरच अधिकृत होणार आहेत. महापालिकेने खंडपीठाच्या आदेशानुसार नागरिकांचे म्हणणे एकूण घेऊन ९९ टक्के धार्मिक स्थळे अधिकृत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.अधिकृत धार्मिक स्थळांची यादीही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी मोजकीच धार्मिक स्थळे काढण्यात येतील.

शहरातील ११०० धार्मिक स्थळे अनधिकृत ठरवून महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी पाडापाडीला सुरुवातही केली होती. महापालिकेने शहरातील ४४ धार्मिक स्थळे काढण्याचे कामही केले. सर्वोच्च न्यायालय, खंडपीठाचा हवाला देत महापालिकेने सुरू केलेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. विविध धर्मांचे नागरिक आपापले धार्मिक स्थळ वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होते. धार्मिक स्थळ पाडण्यापूर्वी महापालिकेने नागरिकांचे म्हणणेच एकूण घेतले नव्हते. त्यापूर्वीच यादी अंतिम करून खंडपीठासमोर सादर केली होती. अलीकडे खंडपीठाने दिलेल्या एका आदेशात नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे असे मनपाला सांगितले. महापालिकेने यासाठी सहा वेगवेगळी पथके तयार करून नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.दरम्यान, मंगळवारी महापालिकेतर्फे धार्मिक स्थळांची सुनावणी घेण्यात आली. १५ ते २० नागरिकांचीच यावेळी उपस्थिती होती. ७ आक्षेपांवर यावेळी सुनावणी घेण्यात आल्याचे आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी सांगितले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, उपायुक्त अय्युब खान, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, अफसर सिद्दीकी, हेमंत कोल्हे, सी.एम. अभंग यांच्यासह सिडको, म्हाडा, सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिका-यांची उपस्थिती होती. सात आक्षेपांवरील सुनावणी घेतल्यानंतर मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर माहिती देताना म्हणाले की, शहरातील ब वर्गातील धार्मिक स्थळांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. 

पोलिसांकडून ही धार्मिक स्थळे वाहतुकीस अडचण निर्माण करणारी आहेत का?, लोकमान्यता आहे का?, याचा अहवाल मागवण्यात येणार आहे. पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. यापुढे कोणालाही म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली जाणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.  

शिवसेनेचा दावाधार्मिक स्थळांसंदर्भात आमचे म्हणणे ऐकून घ्यावे म्हणून ज्येष्ठ नगरसेवक राजू वैद्य यांनी खंडपीठात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने महापालिकेला नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, सुनावणी घ्या, असे आदेश दिले होते. शिवसेनेमुळे शहरातील धार्मिक स्थळे वाचल्याचा दावा वैद्य यांनी केला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका