शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

जिल्हा परिषदेत बदल्यांसाठी ९४८ अर्ज

By admin | Updated: May 20, 2015 00:19 IST

लातूर : लातूर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याच्या बदल्यासाठी विकल्प सादर करण्यात आले असून त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सर्व विभागातील प्रशासकीय

लातूर : लातूर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याच्या बदल्यासाठी विकल्प सादर करण्यात आले असून त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सर्व विभागातील प्रशासकीय, विनंती आणि आपसी बदलीसाठी ९३४ अर्ज आले आहेत़ ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीयस्तरावरील बदल्या होणार नाहीत़ शिक्षकाच्या केवळ आपसी बदल्या होणार आहेत़लातूर जिल्हा परिषदेत सध्या बदल्याचे वारे जोरात सुरू आहेत़ या बदल्यासाठी प्रशासकीय बदल्यासाठी १० वर्ष तर विनंती बदल्यासाठी ५ वर्ष ज्यांनी पूर्ण केले तसेच आपसी बदल्यासाठी अशा सर्व कर्मचाऱ्यांनी विकल्प ५ मे पर्यंत सादर केले आहेत़ आता बदल्यांचा मुहूर्त २१ ते २५ मेचा असल्याने त्याच्या कडे सगळ्याचे लक्ष लागले आहे़ जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाचे अर्ज जरी ३८२ आले असले तरी या सर्व विभागातील प्रशासकीय बदल्या १० टक्क्यानुसार ८२ व विनंती बदल्या १० टक्क्यानुसार १४३ अशा एकूण २२५ जागेवर बदल्या होणार आहेत़ सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्याचे ८५ अर्ज आले आहेत़ तर पंचायत विभागातील ४७, कृषी विभागातील ७ ,बांधकाम विभाग ७, आरोग्य विभागातील सुमारे ५५२ अर्ज आले आहेत़ लघुपाठबंधारे विभाग ७, पशुसंवर्धन विभाग ७ , महिला व बालकल्याण ७, शिक्षण विभाग २१४, अर्थ विभाग ८ अशा सर्व विभागातील ९४८ अर्जांचा पाऊसच पडला आहे़ जिल्हा परिषदेतील बदल्यांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे़ त्यानुसार २१ ते २५ मे या कालावधीत बदल्या होणार आहे़ शिक्षक, आरोग्य, पंचायत विभागातील प्रशासकीय बदल्या स्थगिती असून त्यांच्या केवळ आपसी बदल्याच होणार आहेत़शिक्षण विभागातील बदल्यांना राज्यशासनाकडून स्थगिती मिळाली आहे़ तसे पत्रही जि़प़प्रशासनाला मिळाले आहे़त्यामुळे या विभागातील बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे, असे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी सांगितले़ जिल्हा परिषदेत बदल्याचे वारे वाहत असले तरी आरोग्य, पंचायत विभाग तसेच शिक्षकांच्या बदल्याबाबत शासनाकडूनच बे्रक लावला आहे़ पंचायत विभागातील तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी १५ मे २०१४ नुसारच प्रशासकीय बदल्या करु नयेत असे आदेश दिले आहेत़ तर शिक्षण विभागातील बदल्याबाबत ग्रामविकास व जल संधारण विभागाने १८ मे रोजी शासनादेश काढून प्रशासकीय व आंतर जिल्हा बदल्याना ब्रेक लावला आहे़ ज्या जिल्हा परिषदांतर्गत शिक्षकांच्या आपसी बदल्या व्यतिरिक्त जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा बदल्या झाल्यास असल्यास सदर बदल्या स्थगित करण्यात याव्यात असे आदेश दिले आहे़ त्यामुळे शासन शिक्षकांच्या आता केवळ आपसी बदल्याच होणार आहे़