शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

आचारसंहिते लागल्यानंतर मराठवाड्यात ९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:58 IST

प्रचारादरम्यान शेतक-यांच्या आत्महत्यांसंदर्भात राजकीय पक्ष चकार शब्द बोलायला तयार नाहीत,

ठळक मुद्देआरोप प्रत्यारोपात नेते व्यस्त : राजकीय रणधुमाळीत राजकीय पक्ष विसरले पोशिंद्याला

- विकास राऊत

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून मराठवाड्यात ९१ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

निवडणुकीच्या प्रचारातील राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि राजकीय गदारोळात जगाच्या पोशिंद्याचा सर्वांना विसर पडल्याचे दिसत आहे. मराठवाडा विभागातील भीषण दुष्काळ, २०१२ पासून आजवर नापिकीचा होत असलेला सामना आणि सावकारी पाशात अडकलेले शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.शेतकºयांचे जीवनमान उंचावण्याची त्यासाठी कर्जमाफीपासून ते पेन्शन देण्यापर्यंत राजकीय पक्ष आश्वासने देत असताना प्रचारादरम्यान शेतकºयांच्या आत्महत्यांसंदर्भात राजकीय पक्ष चकार शब्द बोलायला तयार नाहीत, असे चित्र आहे.

१ जानेवारी ते १४ एप्रिलपर्यंत २२० शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. १४८ शेतकºयांना सरकारी मदत दिली असून, ५४ प्रकरणे अपात्र आहेत. १८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. १ ते ३१ मार्चपर्यंत ६९ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, मागील पंधरवड्यात सुमारे २२ शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

औरंगाबादमध्ये २५, जालन्यातील २१, परभणीती १७, हिंगोलीत १२, नांदेडमध्ये २९, बीडमधील ५२, लातूरमधील २५, उस्मानाबादमधील ३९ शेतकºयांनी आजवर आत्महत्या केली आहे. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत शेतकºयांनी आत्महत्या केल्याचा आकडा मोठा आहे.महिना              आत्महत्याजानेवारी                 ६२फेबु्रवारी                ६७मार्च                       ६९एप्रिल                    २२एकूण                  २२०रणधुमाळीत शेतक-यांचा विसरकै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले की, राजकीय रणधुमाळीत शेतकºयांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. मुळ मुद्यांपासून राजकारण भरकटले आहे. शेतकºयांची आत्महत्या, त्यांच्या आर्थिक प्रश्नांना बगल दिली जात आहे. जाती-धर्म आणि एकमेकांवर आरोप करणारी भाषणे निवडणुकीच्या रणधुमाळीत होत आहेत. प्रचाराचा पहिला आणि दुसरा टप्पा संपला तरीही शेतकºयांच्या धोरणांवर उपायात्मक चर्चा होत नाहीत. शेतक-यांची क्रयशक्ती संपली असून पर्यावरण, पाणी-चाराटंचाईमुळे ते हताश आहेत. धोरण, नियोजन करण्याऐवजी दोषारोप करणारे राजकारण सुरू आहे. राजकारण्यांची ९८ टक्के भाषणे एकमेकांवर आरोप करणारी आहेत.रोजच पुलवामा होत आहेराज्यात दिवसाकाठी ४३ शेतकरी आत्महत्या करीत असल्यामुळे येथे रोजच पुलवामा होतो आहे. काँग्रेसने शेतकरीविरोधात केलेले कायदे भाजपने रद्द केले नाहीत. ते दोन्ही पक्ष शेतकरी आत्महत्यांना जबाबदार आहेत. शेतकºयांचे मारेकरी हेच पक्ष आहेत, म्हणून ते तोंड लपवीत आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीतदेखील ते शेतकºयांविषयी बोलत नाहीत, असा आरोप शेतकरी पुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019farmer suicideशेतकरी आत्महत्या