शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

आचारसंहिते लागल्यानंतर मराठवाड्यात ९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:58 IST

प्रचारादरम्यान शेतक-यांच्या आत्महत्यांसंदर्भात राजकीय पक्ष चकार शब्द बोलायला तयार नाहीत,

ठळक मुद्देआरोप प्रत्यारोपात नेते व्यस्त : राजकीय रणधुमाळीत राजकीय पक्ष विसरले पोशिंद्याला

- विकास राऊत

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून मराठवाड्यात ९१ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

निवडणुकीच्या प्रचारातील राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि राजकीय गदारोळात जगाच्या पोशिंद्याचा सर्वांना विसर पडल्याचे दिसत आहे. मराठवाडा विभागातील भीषण दुष्काळ, २०१२ पासून आजवर नापिकीचा होत असलेला सामना आणि सावकारी पाशात अडकलेले शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.शेतकºयांचे जीवनमान उंचावण्याची त्यासाठी कर्जमाफीपासून ते पेन्शन देण्यापर्यंत राजकीय पक्ष आश्वासने देत असताना प्रचारादरम्यान शेतकºयांच्या आत्महत्यांसंदर्भात राजकीय पक्ष चकार शब्द बोलायला तयार नाहीत, असे चित्र आहे.

१ जानेवारी ते १४ एप्रिलपर्यंत २२० शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. १४८ शेतकºयांना सरकारी मदत दिली असून, ५४ प्रकरणे अपात्र आहेत. १८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. १ ते ३१ मार्चपर्यंत ६९ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, मागील पंधरवड्यात सुमारे २२ शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

औरंगाबादमध्ये २५, जालन्यातील २१, परभणीती १७, हिंगोलीत १२, नांदेडमध्ये २९, बीडमधील ५२, लातूरमधील २५, उस्मानाबादमधील ३९ शेतकºयांनी आजवर आत्महत्या केली आहे. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत शेतकºयांनी आत्महत्या केल्याचा आकडा मोठा आहे.महिना              आत्महत्याजानेवारी                 ६२फेबु्रवारी                ६७मार्च                       ६९एप्रिल                    २२एकूण                  २२०रणधुमाळीत शेतक-यांचा विसरकै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले की, राजकीय रणधुमाळीत शेतकºयांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. मुळ मुद्यांपासून राजकारण भरकटले आहे. शेतकºयांची आत्महत्या, त्यांच्या आर्थिक प्रश्नांना बगल दिली जात आहे. जाती-धर्म आणि एकमेकांवर आरोप करणारी भाषणे निवडणुकीच्या रणधुमाळीत होत आहेत. प्रचाराचा पहिला आणि दुसरा टप्पा संपला तरीही शेतकºयांच्या धोरणांवर उपायात्मक चर्चा होत नाहीत. शेतक-यांची क्रयशक्ती संपली असून पर्यावरण, पाणी-चाराटंचाईमुळे ते हताश आहेत. धोरण, नियोजन करण्याऐवजी दोषारोप करणारे राजकारण सुरू आहे. राजकारण्यांची ९८ टक्के भाषणे एकमेकांवर आरोप करणारी आहेत.रोजच पुलवामा होत आहेराज्यात दिवसाकाठी ४३ शेतकरी आत्महत्या करीत असल्यामुळे येथे रोजच पुलवामा होतो आहे. काँग्रेसने शेतकरीविरोधात केलेले कायदे भाजपने रद्द केले नाहीत. ते दोन्ही पक्ष शेतकरी आत्महत्यांना जबाबदार आहेत. शेतकºयांचे मारेकरी हेच पक्ष आहेत, म्हणून ते तोंड लपवीत आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीतदेखील ते शेतकºयांविषयी बोलत नाहीत, असा आरोप शेतकरी पुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019farmer suicideशेतकरी आत्महत्या