शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिते लागल्यानंतर मराठवाड्यात ९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:58 IST

प्रचारादरम्यान शेतक-यांच्या आत्महत्यांसंदर्भात राजकीय पक्ष चकार शब्द बोलायला तयार नाहीत,

ठळक मुद्देआरोप प्रत्यारोपात नेते व्यस्त : राजकीय रणधुमाळीत राजकीय पक्ष विसरले पोशिंद्याला

- विकास राऊत

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून मराठवाड्यात ९१ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

निवडणुकीच्या प्रचारातील राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि राजकीय गदारोळात जगाच्या पोशिंद्याचा सर्वांना विसर पडल्याचे दिसत आहे. मराठवाडा विभागातील भीषण दुष्काळ, २०१२ पासून आजवर नापिकीचा होत असलेला सामना आणि सावकारी पाशात अडकलेले शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.शेतकºयांचे जीवनमान उंचावण्याची त्यासाठी कर्जमाफीपासून ते पेन्शन देण्यापर्यंत राजकीय पक्ष आश्वासने देत असताना प्रचारादरम्यान शेतकºयांच्या आत्महत्यांसंदर्भात राजकीय पक्ष चकार शब्द बोलायला तयार नाहीत, असे चित्र आहे.

१ जानेवारी ते १४ एप्रिलपर्यंत २२० शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. १४८ शेतकºयांना सरकारी मदत दिली असून, ५४ प्रकरणे अपात्र आहेत. १८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. १ ते ३१ मार्चपर्यंत ६९ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, मागील पंधरवड्यात सुमारे २२ शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

औरंगाबादमध्ये २५, जालन्यातील २१, परभणीती १७, हिंगोलीत १२, नांदेडमध्ये २९, बीडमधील ५२, लातूरमधील २५, उस्मानाबादमधील ३९ शेतकºयांनी आजवर आत्महत्या केली आहे. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत शेतकºयांनी आत्महत्या केल्याचा आकडा मोठा आहे.महिना              आत्महत्याजानेवारी                 ६२फेबु्रवारी                ६७मार्च                       ६९एप्रिल                    २२एकूण                  २२०रणधुमाळीत शेतक-यांचा विसरकै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले की, राजकीय रणधुमाळीत शेतकºयांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. मुळ मुद्यांपासून राजकारण भरकटले आहे. शेतकºयांची आत्महत्या, त्यांच्या आर्थिक प्रश्नांना बगल दिली जात आहे. जाती-धर्म आणि एकमेकांवर आरोप करणारी भाषणे निवडणुकीच्या रणधुमाळीत होत आहेत. प्रचाराचा पहिला आणि दुसरा टप्पा संपला तरीही शेतकºयांच्या धोरणांवर उपायात्मक चर्चा होत नाहीत. शेतक-यांची क्रयशक्ती संपली असून पर्यावरण, पाणी-चाराटंचाईमुळे ते हताश आहेत. धोरण, नियोजन करण्याऐवजी दोषारोप करणारे राजकारण सुरू आहे. राजकारण्यांची ९८ टक्के भाषणे एकमेकांवर आरोप करणारी आहेत.रोजच पुलवामा होत आहेराज्यात दिवसाकाठी ४३ शेतकरी आत्महत्या करीत असल्यामुळे येथे रोजच पुलवामा होतो आहे. काँग्रेसने शेतकरीविरोधात केलेले कायदे भाजपने रद्द केले नाहीत. ते दोन्ही पक्ष शेतकरी आत्महत्यांना जबाबदार आहेत. शेतकºयांचे मारेकरी हेच पक्ष आहेत, म्हणून ते तोंड लपवीत आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीतदेखील ते शेतकºयांविषयी बोलत नाहीत, असा आरोप शेतकरी पुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019farmer suicideशेतकरी आत्महत्या