शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

९१ कोटी रुपये दिले; कचऱ्याचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:50 IST

शहरात मागील १६ महिन्यांपासून कचराकोंडी सुरू आहे. शहरात जमा होणारा कचरा चार वेगवेगळ्या भागांत नेऊन टाकण्याचे काम मनपा प्रशासन मागील वर्षभरापासून करीत आहे. चिकलठाणा वगळता कुठेच कचºयावर प्रक्रिया होत नाही. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला ९१ कोटी रुपयांचे भरघोस अनुदान दिले होते.

ठळक मुद्देशासनाकडून विचारणा : आयुक्त आज खुलासा करणार

औरंगाबाद : शहरात मागील १६ महिन्यांपासून कचराकोंडी सुरू आहे. शहरात जमा होणारा कचरा चार वेगवेगळ्या भागांत नेऊन टाकण्याचे काम मनपा प्रशासन मागील वर्षभरापासून करीत आहे. चिकलठाणा वगळता कुठेच कचºयावर प्रक्रिया होत नाही. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला ९१ कोटी रुपयांचे भरघोस अनुदान दिले होते. अनुदान मिळाल्यानंतरही प्रशासनाने नेमके काय केले? असा प्रश्न नगरविकास विभागाने उपस्थित केला आहे. प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमोर मनपा आयुक्त बुधवारी खुलासा करणार आहेत.१६ फेब्रुवारी २०१८ रोजी शहरात कचरा कोंडीला सुरुवात झाली. शहरात रस्त्यांवर अक्षरश: कचºयाचे डोंगर साचले होते. या कचरा कोंडीत राज्य शासनाने महापालिकेला चांगलीच साथ दिली. नगरविकास विभागाच्या तत्कालीन सचिव मनीषा म्हैसकर यांनी स्वत: औरंगाबादेत येऊन कचरा प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले होते. त्यानंतर लगेच शासनाने महापालिकेला कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी ९१ कोटी रुपयांचे अनुदान दिले. त्यानंतर महापालिकेने चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. चिकलठाणा येथील प्रकल्प दोन दिवसांपूर्वीच सुरू करण्यात महापालिकेला यश आहे. इतर प्रकल्प अद्याप रखडलेले आहेत, तर हर्सूलची निविदादेखील होऊ शकलेली नाही. १६ महिने उलटल्यानंतर राज्य शासनाने शहरातील कचºयाची नेमकी काय अवस्था आहे? अशी विचारणा महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे नगर विकास विभागात असलेल्या मनीषा म्हैसकर आता प्रधान सचिव आहेत. त्यांच्याकडे आयुक्त गुरुवारी सादरीकरण करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न