शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

एक मेसेज अन् लिपिकाचे ८६ हजार गायब, वेळीच पोलिसात धाव घेतल्याने परत मिळणार पैसे

By राम शिनगारे | Updated: October 31, 2022 19:54 IST

तासाभरात सायबर ठाणे गाठल्यामुळे पैसे परत मिळणार

औरंगाबाद : चालू महिन्याचे वीजबिल भरण्यात आलेले नाही. त्यामुळे आज महाविद्यालयाची वीज बंद करण्यात येईल, असा मेसेज शहरातील एका महाविद्यालयाच्या लिपिकाच्या मोबाइलवर आला. त्यामुळे घाबरलेल्या लिपिकाने मेसेजमध्ये दिलेल्या फोनवर संपर्क केल्यानंतर सायबर भामट्यांनी त्यांना ‘एनी डेस्क’ ॲप डाऊनलोड करण्यास सांगून तब्बल ८६ हजार २८९ रुपयांना फसवले. फसवणूक झाल्याचे समजताच लिपिकाने तासाभरात सायबर ठाणे गाठले. सायबर पोलिसांनी तात्काळ प्रक्रिया करीत संबंधिताचे बँक खाते ‘फ्रीज’ केले. त्यामुळे गेलेेले पैसे लिपिकाला परत मिळणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांनी दिली. हा प्रकार २९ ऑक्टोबर रोजी घडला.

विवेकानंद महाविद्यालयातील एका लिपिकाला, महाविद्यालयाचे चालू महिन्याचे वीजबिल भरलेले नाही. त्यामुळे वीज आज बंद करण्यात येत असल्याचा मेसेज आला. वीज बंद झाल्यास व्यवस्थापन आपल्यावरच कारवाई करेल या भीतीपोटी लिपिकाने मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क केला. तेव्हा सायबर भामट्यांनी त्यांना ‘एनी डेस्क’ नावाचे ॲप मोबाइलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावरून दहा रुपये भरून वीजबिल ‘अपग्रेड’ करा, असे सांगितले. त्यानुसार लिपिकाने १० रुपये पाठविले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ८६ हजार २८९ रुपये ‘डेबिट’ झाले. तेव्हा लिपिकास आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी तात्काळ आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाणे गाठले. तेथे सहायक निरीक्षक सातोदकर यांना घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा सातोदकर यांनी तांत्रिक तपास केल्यानंतर लिपिकाच्या बँक खात्यातून मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील एचडीएफसीच्या बँकेतील खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचे समजले. त्यानंतर अधिकृतपणे संबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ‘क्रेडिट’ झालेले बँक खाते ‘फ्रीज’ करण्यास सांगितले. त्यामुळे लिपिकाला गेलेले ८६ हजार २८९ रुपये परत मिळणार आहेत. ही कामगिरी निरीक्षक गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांनी केली.

१४ लाख परत मिळविलेऑनलाइन फसवणूक झालेल्या २३ जणांनी सायबर पोलिसांशी तात्काळ संपर्क साधल्यामुळे तब्बल १४ लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम परत मिळवून दिली आहे. त्यामुळे कोणाचीही ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही निरीक्षक गौतम पातारे यांनी केले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारी