शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

एक मेसेज अन् लिपिकाचे ८६ हजार गायब, वेळीच पोलिसात धाव घेतल्याने परत मिळणार पैसे

By राम शिनगारे | Updated: October 31, 2022 19:54 IST

तासाभरात सायबर ठाणे गाठल्यामुळे पैसे परत मिळणार

औरंगाबाद : चालू महिन्याचे वीजबिल भरण्यात आलेले नाही. त्यामुळे आज महाविद्यालयाची वीज बंद करण्यात येईल, असा मेसेज शहरातील एका महाविद्यालयाच्या लिपिकाच्या मोबाइलवर आला. त्यामुळे घाबरलेल्या लिपिकाने मेसेजमध्ये दिलेल्या फोनवर संपर्क केल्यानंतर सायबर भामट्यांनी त्यांना ‘एनी डेस्क’ ॲप डाऊनलोड करण्यास सांगून तब्बल ८६ हजार २८९ रुपयांना फसवले. फसवणूक झाल्याचे समजताच लिपिकाने तासाभरात सायबर ठाणे गाठले. सायबर पोलिसांनी तात्काळ प्रक्रिया करीत संबंधिताचे बँक खाते ‘फ्रीज’ केले. त्यामुळे गेलेेले पैसे लिपिकाला परत मिळणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांनी दिली. हा प्रकार २९ ऑक्टोबर रोजी घडला.

विवेकानंद महाविद्यालयातील एका लिपिकाला, महाविद्यालयाचे चालू महिन्याचे वीजबिल भरलेले नाही. त्यामुळे वीज आज बंद करण्यात येत असल्याचा मेसेज आला. वीज बंद झाल्यास व्यवस्थापन आपल्यावरच कारवाई करेल या भीतीपोटी लिपिकाने मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क केला. तेव्हा सायबर भामट्यांनी त्यांना ‘एनी डेस्क’ नावाचे ॲप मोबाइलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावरून दहा रुपये भरून वीजबिल ‘अपग्रेड’ करा, असे सांगितले. त्यानुसार लिपिकाने १० रुपये पाठविले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ८६ हजार २८९ रुपये ‘डेबिट’ झाले. तेव्हा लिपिकास आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी तात्काळ आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाणे गाठले. तेथे सहायक निरीक्षक सातोदकर यांना घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा सातोदकर यांनी तांत्रिक तपास केल्यानंतर लिपिकाच्या बँक खात्यातून मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील एचडीएफसीच्या बँकेतील खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचे समजले. त्यानंतर अधिकृतपणे संबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ‘क्रेडिट’ झालेले बँक खाते ‘फ्रीज’ करण्यास सांगितले. त्यामुळे लिपिकाला गेलेले ८६ हजार २८९ रुपये परत मिळणार आहेत. ही कामगिरी निरीक्षक गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांनी केली.

१४ लाख परत मिळविलेऑनलाइन फसवणूक झालेल्या २३ जणांनी सायबर पोलिसांशी तात्काळ संपर्क साधल्यामुळे तब्बल १४ लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम परत मिळवून दिली आहे. त्यामुळे कोणाचीही ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही निरीक्षक गौतम पातारे यांनी केले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारी