शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

८६ टक्के आधार जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 11:34 PM

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्डला आधार क्रमांक जोडण्याचे काम जिल्ह्यात ८६ टक्के पूर्ण झाले आहे़ या कामासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ मिळाल्याने आगामी महिनाभरात १०० टक्के पूर्ण होईल, असा विश्वास पुरवठा विभागातील अधिकाºयांनी व्यक्त केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्डला आधार क्रमांक जोडण्याचे काम जिल्ह्यात ८६ टक्के पूर्ण झाले आहे़ या कामासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ मिळाल्याने आगामी महिनाभरात १०० टक्के पूर्ण होईल, असा विश्वास पुरवठा विभागातील अधिकाºयांनी व्यक्त केला़परभणी जिल्ह्यामध्ये २ लाख १३ हजार रेशनकार्डधारक आहेत़ तर रेशनकार्डावर सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेणाºया लाभार्थ्यांची संख्या १२ लाख ९७ हजार ५६५ एवढी आहे़ रेशनकार्डावरील कुटूंब प्रमुखासह त्याच्या कुटूंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक रेशनकार्डला जोडण्याची प्रक्रिया मागील एक-दोन वर्षांपासून सुरू आहे़ प्रत्येक सदस्याचा आधार क्रमांक मिळविण्यासाठी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत काम केले जात आहे़दोन वर्षांपासून सुरू झालेले हे काम आता अंतीम टप्प्यात पोहचले आहे़ जवळपास ७ लाख २५ हजार सदस्यांचे आधार क्रमांक पुरवठा विभागाकडे जमा झाले आहेत़ सदस्यांचे आधारकार्ड मिळविण्याचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले आहे़ त्याचप्रमाणे प्रत्येक कुटूंबातील किमान एका सदस्याचे आधार क्रमांक रेशनकार्डला जोडण्याचे कामही ८६ टक्के पूर्ण झाले आहे़ जिल्ह्यात २ लाख १३ हजार कुटूंब प्रमुखांपैकी १ लाख ८५ हजार कुटूंबप्रमुखांचे आधार क्रमांक पुरवठा विभागाने रेशनकार्डला जोडले आहेत़ त्यामुळे हे काम जवळपास अंतीम टप्प्यात पोहचले असून, सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व लाभार्थ्यांचे आधार क्रमांक रेशनकार्डला लिंक करण्याचे काम पूर्ण होईल, असे पुरवठा विभागातून सांगण्यात आले़जून महिन्यापासून जिल्ह्यात आॅनलाईन धान्य वितरण सुरू झाले आहे़ प्रत्येक रेशन दुकानावर ई-पॉस मशीन देण्यात आली असून, लाभार्थ्याचा आधार क्रमांक लिंक असेल तर त्या लाभार्थ्यास रेशनचे धान्य मिळत आहे़जिल्ह्यामध्ये सध्या सर्वच दुकानांवरून आॅनलाईन धान्य वितरण बंधनकारक करण्यात आले आहे़ त्यामुळे ज्या लाभार्थ्याचे आधार क्रमांक रेशन कार्डाशी जोडले नाहीत, असे लाभार्थी धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ १५ टक्के लाभार्थ्यांचे आधार क्रमांक अजूनही रेशन कार्डाशी जोडणे बाकी असल्याने या लाभार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी, या उद्देशान पुरवठा विभागाने या कामाला प्राधान्य देवून काम १०० टक्के पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे़