शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

गुजरातच्या कापूस व्यापाºयाने केली शेतकºयांची ८० लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:53 IST

औरंगाबाद तालुक्यातील शेकटा येथील शेतकºयांच्या कापसाच्या पेमेंटसह स्थानिक कापूस व्यापाºयाच्या कमिशनची रक्कम न दिल्याप्रकरणी गुजरातच्या कापूस व्यापाºयाविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करमाड : औरंगाबाद तालुक्यातील शेकटा येथील शेतकºयांच्या कापसाच्या पेमेंटसह स्थानिक कापूस व्यापाºयाच्या कमिशनची रक्कम न दिल्याप्रकरणी गुजरातच्या कापूस व्यापाºयाविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाºयाने दोन वर्षांनंतरही ८० लाख रुपये दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शेकटा येथील संतोष निवृत्ती वाघ यांचा कापूस खरेदीचा व्यवसाय असून, त्यांची ओमसाई कॉटन ग्रुप नावाची कंपनी आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, २०१६ मध्ये सोमनाथ कॉटन जिनिंगचे मालक राजूभाई जोशी यांच्याशी माझा तोंडी करार झाला. त्यानुसार मी शेकटा परिसरातील शेतकºयांचा कापूस खरेदी करून सोमनाथ कॉटन जिनिंगला विक्री करून त्या मोबदल्यात ही कंपनी मला ७० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे कमिशन देण्याचे ठरले होते. ७ नोव्हेंबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंत गौरव जोशी व राकेश आचारी हे शेकटा येथे येऊन कापसाची प्रतवारी पाहून कापसाचे ट्रक कंपनीकडे पाठवत होते. तोपर्यंत त्यांनी २०८ ट्रकमधून २७ हजार १४५ क्विंटल कापूस कंपनीला पाठविला. त्याची किंमत १५ कोटी ५४ लाख ७६ हजार ७७५ रुपये होते. दरम्यान, त्यांनी १४ कोटी ७४ लाख ६० हजार ७१० रुपये शेतकºयांना आरटीजीएसद्वारे बँक खात्यात जमा केले.

परंतु त्यानंतर उर्वरित ६१ लाख ७० हजार ६८६ रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले नाहीत. तसेच कमिशनचे १९ लाख १५० रुपये मला दिले नाही. असे एकूण ८० लाख ७० हजार ८३६ रुपये बाकी असल्याने दोन वर्षांपासून कंपनी मालक जोशी व व्यवस्थापक अजय जोशी यांच्याशी वारंवार संपर्क साधून पैशाची मागणी केली. तसेच मी राजकोटला जाऊन आलो. शेतकरी मला पैशाची मागणी करीत असून, मला त्रास होत असल्याचे सांगितले. शेकटा येथील काही जणांना सोबत घेऊन राजकोट येथे कंपनीत गेलो. यावेळी राजू जोशी, अजय जोशी, गौरव जोशी, राकेश जोशी यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संतोष वाघ यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद