शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

मराठवाड्यातील ८ हजार ४९६ गावे दुष्काळाच्या दुष्टचक्रात, सरकारी मदतीकडे लक्ष

By विकास राऊत | Updated: December 21, 2023 11:25 IST

 खरीप हंगामाची पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ८ हजार ४९६ गावांतील खरीप हंगाम पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातून गेला. विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत आली असून, दुष्काळाच्या दुष्टचक्रात मराठवाडा असल्याचे सध्याचे चित्र आहे.

मागील वर्षी सततच्या पावसाने व अतिवृष्टीने नुकसान केले. त्यापोटी शासनाने २७०० कोटींची घोषणा केली. त्यातील सुमारे १७०० कोटी सततच्या पावसाच्या नुकसानीचे असून, ते पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यातच मार्च-एप्रिल २०२३ मधील अवकाळी पाऊस, सरत्या वर्षातील पावसाळ्यात दोन जिल्ह्यांत अतिवृष्टी व सहा जिल्ह्यांत महिनाभराचा पावसाचा खंड, पुढे रब्बी हंगामात अवकाळी पिकांनी नुकसान केले असून, त्यासाठी भरपाईचा अद्याप काहीही निर्णय नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून, शासनाकडून मदतीचा ओघ विलंबाने होत असल्यामुळे शेतकरी आर्थिककोंडीत सापडला आहे. दरम्यान, विभागातील ७६ तालुक्यांतील सर्व गावांतील अंतिम पैसेवारीनुसार खरीप हंगामाचे उत्पादन घटले आहे. माजलगाव तालुक्यातील ५ गावे पूर्णत: बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

पैसेवारी कमी आलेली जिल्हानिहाय गावेजिल्हा...........................गावेछत्रपती संभाजीनगर......१३५६धाराशिव.....................७१९बीड...........................१३९७परभणी.......................८३२नांदेड.........................१५६२जालना.......................९७१लातूर...........................९५२हिंगोली.......................७०७एकूण..........................८४९६

साडेनऊ लाख शेतकऱ्यांना फटकामराठवाड्यात नोव्हेंबर २०२३ महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाचा विभागातील ९ लाख ५० हजार ८३० शेतकऱ्यांना फटका बसला. ४ लाख ८० हजार ३५१ हेक्टरवरील रब्बी, फळपिके व भाजीपाल्याचे नुकसान झाले. मराठवाड्याला २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर काळात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६३९३४ शेतकऱ्यांचे, जालना जिल्ह्यात १९१२१९, परभणी २३१७८७, हिंगोलीत २५७४८७, नांदेड ३७९१, लातूर ६५५, बीड १५ धाराशिव जिल्ह्यातील १९१२ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. याकाळात वीज पडल्याने ३५ मोठी, १५७ लहान जनावरे, तर इतर २४ जनावरे दगावली. ३१ घरांची पडझड झाली, १४ झोपड्यांचे, तर ८ गोठ्यांचे नुकसान झाले. वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला.

किती मदत अपेक्षित?छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२३ कोटी, जालना ११५ कोटी, परभणी ९ कोटी, हिंगोली १० कोटी, नांदेड ५ कोटी, लातूर १६ लाख, बीड सव्वा लाख, धाराशिव अडीच कोटींचा मदत निधी अपेक्षित आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र