शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कुलगुरू होण्यासाठी विद्यापीठातील ८ जण इच्छुक; आतापर्यंत ७८ उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज

By राम शिनगारे | Updated: October 26, 2023 12:25 IST

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू होण्यासाठी ७८ जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यात विद्यापीठाच्या विविध विभागांमधील आठ जणांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. १६ जुलै २०१९ रोजी त्यांनी कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली होती. मुदत पूर्ण होत असल्यामुळे नवीन कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी नेमलेल्या शोध समितीने पात्र उमेदवारांकडून २० सप्टेंबर ते १९ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यात ७८ जणांनी ऑनलाइन अर्ज केले असून, २७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना हार्डकॉपी समितीकडे सादर करता येणार आहे. कुलगुरू शोध समितीच्या अध्यक्षपदी एआयसीटीईचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे आहेत. त्याशिवाय भोपाळ येथील माखनलाल चतुर्वेदी वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.जी. सुरेश आणि श्रीनगर येथील एनआयटीचे संचालक डॉ. सुधाकर एडला हे सदस्य असून, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी समितीचे सदस्य सचिव आहेत. नोडल ऑफिसर म्हणून श्रीनगर एनआयटीचे प्राध्यापक डॉ. जानिबुल बशीर आहेत.

विद्यापीठातील आठ जणांचा समावेश

कुलगुरूपदाचा अर्ज करण्यासाठी प्रशासनाकडून विद्यापीठातील आठ जणांनी परवानगी घेतली आहे. त्यात अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, वनस्पतीशास्त्राचे डॉ. अरविंद धाबे, परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी, रसायनशास्त्राचे डॉ. सुरेश गायकवाड, पर्यावरणाचे डॉ. सतीश पाटील, डॉ. एम.बी. मुळे, जीवरसायनच्या डॉ. वंदना हिवराळे, प्राणिशास्त्राचे डॉ. मार्टिन रेमंड यांचा समावेश आहे. त्याशिवाय विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील माजी प्रकुलगुरू तथा देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, कोहिनूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे, देवगिरीचे उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार, उमरगा येथील छत्रपती महाविद्यालयातील डॉ. धनंजय माने यांनीही अर्ज केल्याची माहिती आहे. यामध्ये पर्यावरणाचे डॉ. सतीश पाटील यांचे पारडे जड असल्याची चर्चा आहे.

निकषांमुळे अनेकांची संधी हुकलीकुलगुरूपदासाठी १० वर्षे प्रोफेसर आणि पाच वर्षे प्रशासकीय कामाचा अनुभव अनिवार्य आहे. त्यात महाविद्यालयातील प्राचार्यांचा प्रशासकीय अनुभव ग्राह्य असून, विभागाच्या प्रमुखाचा अनुभव ग्राह्य नाही. विशेष म्हणजे, विद्यापीठातील विभागप्रमुख हा प्रशासकीय अनुभव ग्राह्य धरलेला आहे. त्यामुळे महाविद्यालयातील अनेकांची अर्ज करण्याचीच संधी हिरावण्यात आली आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण