शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणाची ८ दरवाजे उघडले; गोदावरी पात्रात ५७८१ क्युसेकने विसर्ग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 19:34 IST

दरवाजा क्र.10,14,16,18,19,21,23,27  हे आठ दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून विसर्ग सुरु

ठळक मुद्देनाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून होणारे विसर्ग चार दिवसापासून बंदधरणाचा जलसाठा ९१.९९ % झाल्याने धरणातून विसर्ग

पैठण (औरंगाबाद ): जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे अर्धाफुटाने वर उचलून गोदावरी पात्रात सांडव्यातून ४१९२ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाच्या विमोचिकेतून गोदावरी पात्रात १५९० विसर्ग सुरू असल्याने धरणातून गोदावरी पात्रात एकत्रित ५७८१ क्युसेक असा विसर्ग सुरू आहे. धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग होत असल्याने गोदावरी गतीने वहाती झाली आहे. गोदावरीतून वाहते झालेले पाणी आज जालना जिल्ह्यात पोहचले असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाचा जलसाठा १५ ऑगस्ट रोजी ९२% च्या जवळपास पोहचल्याने जायकवाडी धरणाच्या सांडव्यातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन जायकवाडी प्रशासनाने १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने उचलून गोदावरीत पहिला विसर्ग केला.या वेळी गोदावरी पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक ए पी कोहिरकर, मुख्य अभियंता दिलीप तवार, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, उपविभागीय अभियंया अशोक चव्हाण, बुध्दभूषण दाभाडे, संदीप राठोड, आर ई चक्रे, राजाराम गायकवाड, बबन बोधने, खराडकर आदींनी पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

जायकवाडी धरणातून होणारा विसर्गजायकवाडी धरणाचे दरवाजा क्र.10,14,16,18,19,21,23,27  हे आठ दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून प्रत्येक दरवाजातून ५२४ क्युसेक असा मिळून ४१९२ क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मिती नंतर विमोचिकेतून १५८९ क्युसेक असा मिळून गोदावरी पात्रात ५७८१ क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणाच्या डाव्या कालव्यातून १४०० क्युसेक व उजव्या कालव्यातून ९०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणाच्या जलसाठ्यातून ८०८० क्युसेक एकूण विसर्ग सर्व मार्गाने होत आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदी पात्रातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील बंधारे भरणार आहेत. शिवाय नदीकाठावरील गावांची तहान भागणार असून लाभक्षेत्रातील विहीरींची पाणीपातळी वाढणार आहे. गोदावरी नदी पात्रातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातले सर्व बंधाऱ्याचे दरवाजे उघडे करून खालील बंधाऱ्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे.

आवक बंदनाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून होणारे विसर्ग चार दिवसापासून बंद करण्यात आल्याने गुरुवारी धरणात येणारी आवक निरंक झाली. मात्र धरणाचा जलसाठा ९१.९९ % झाल्याने धरणातून विसर्ग करण्यात येऊन धरणात आगामी काळातील संभाव्य पूर नियंत्रित करण्यासाठी पॉकेट तयार करण्यात येत आहे. मराठवाड्यात पाणी टंचाई असल्याने तेथील पाणीटंचाईचे निवारण होणार असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणgodavariगोदावरीWaterपाणीAurangabadऔरंगाबाद