शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

जायकवाडी धरणाची ८ दरवाजे उघडले; गोदावरी पात्रात ५७८१ क्युसेकने विसर्ग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 19:34 IST

दरवाजा क्र.10,14,16,18,19,21,23,27  हे आठ दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून विसर्ग सुरु

ठळक मुद्देनाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून होणारे विसर्ग चार दिवसापासून बंदधरणाचा जलसाठा ९१.९९ % झाल्याने धरणातून विसर्ग

पैठण (औरंगाबाद ): जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे अर्धाफुटाने वर उचलून गोदावरी पात्रात सांडव्यातून ४१९२ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाच्या विमोचिकेतून गोदावरी पात्रात १५९० विसर्ग सुरू असल्याने धरणातून गोदावरी पात्रात एकत्रित ५७८१ क्युसेक असा विसर्ग सुरू आहे. धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग होत असल्याने गोदावरी गतीने वहाती झाली आहे. गोदावरीतून वाहते झालेले पाणी आज जालना जिल्ह्यात पोहचले असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाचा जलसाठा १५ ऑगस्ट रोजी ९२% च्या जवळपास पोहचल्याने जायकवाडी धरणाच्या सांडव्यातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन जायकवाडी प्रशासनाने १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने उचलून गोदावरीत पहिला विसर्ग केला.या वेळी गोदावरी पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक ए पी कोहिरकर, मुख्य अभियंता दिलीप तवार, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, उपविभागीय अभियंया अशोक चव्हाण, बुध्दभूषण दाभाडे, संदीप राठोड, आर ई चक्रे, राजाराम गायकवाड, बबन बोधने, खराडकर आदींनी पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

जायकवाडी धरणातून होणारा विसर्गजायकवाडी धरणाचे दरवाजा क्र.10,14,16,18,19,21,23,27  हे आठ दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून प्रत्येक दरवाजातून ५२४ क्युसेक असा मिळून ४१९२ क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मिती नंतर विमोचिकेतून १५८९ क्युसेक असा मिळून गोदावरी पात्रात ५७८१ क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणाच्या डाव्या कालव्यातून १४०० क्युसेक व उजव्या कालव्यातून ९०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणाच्या जलसाठ्यातून ८०८० क्युसेक एकूण विसर्ग सर्व मार्गाने होत आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदी पात्रातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील बंधारे भरणार आहेत. शिवाय नदीकाठावरील गावांची तहान भागणार असून लाभक्षेत्रातील विहीरींची पाणीपातळी वाढणार आहे. गोदावरी नदी पात्रातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातले सर्व बंधाऱ्याचे दरवाजे उघडे करून खालील बंधाऱ्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे.

आवक बंदनाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून होणारे विसर्ग चार दिवसापासून बंद करण्यात आल्याने गुरुवारी धरणात येणारी आवक निरंक झाली. मात्र धरणाचा जलसाठा ९१.९९ % झाल्याने धरणातून विसर्ग करण्यात येऊन धरणात आगामी काळातील संभाव्य पूर नियंत्रित करण्यासाठी पॉकेट तयार करण्यात येत आहे. मराठवाड्यात पाणी टंचाई असल्याने तेथील पाणीटंचाईचे निवारण होणार असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणgodavariगोदावरीWaterपाणीAurangabadऔरंगाबाद