शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

जायकवाडी धरणाची ८ दरवाजे उघडले; गोदावरी पात्रात ५७८१ क्युसेकने विसर्ग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 19:34 IST

दरवाजा क्र.10,14,16,18,19,21,23,27  हे आठ दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून विसर्ग सुरु

ठळक मुद्देनाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून होणारे विसर्ग चार दिवसापासून बंदधरणाचा जलसाठा ९१.९९ % झाल्याने धरणातून विसर्ग

पैठण (औरंगाबाद ): जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे अर्धाफुटाने वर उचलून गोदावरी पात्रात सांडव्यातून ४१९२ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाच्या विमोचिकेतून गोदावरी पात्रात १५९० विसर्ग सुरू असल्याने धरणातून गोदावरी पात्रात एकत्रित ५७८१ क्युसेक असा विसर्ग सुरू आहे. धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग होत असल्याने गोदावरी गतीने वहाती झाली आहे. गोदावरीतून वाहते झालेले पाणी आज जालना जिल्ह्यात पोहचले असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाचा जलसाठा १५ ऑगस्ट रोजी ९२% च्या जवळपास पोहचल्याने जायकवाडी धरणाच्या सांडव्यातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन जायकवाडी प्रशासनाने १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने उचलून गोदावरीत पहिला विसर्ग केला.या वेळी गोदावरी पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक ए पी कोहिरकर, मुख्य अभियंता दिलीप तवार, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, उपविभागीय अभियंया अशोक चव्हाण, बुध्दभूषण दाभाडे, संदीप राठोड, आर ई चक्रे, राजाराम गायकवाड, बबन बोधने, खराडकर आदींनी पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

जायकवाडी धरणातून होणारा विसर्गजायकवाडी धरणाचे दरवाजा क्र.10,14,16,18,19,21,23,27  हे आठ दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून प्रत्येक दरवाजातून ५२४ क्युसेक असा मिळून ४१९२ क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मिती नंतर विमोचिकेतून १५८९ क्युसेक असा मिळून गोदावरी पात्रात ५७८१ क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणाच्या डाव्या कालव्यातून १४०० क्युसेक व उजव्या कालव्यातून ९०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणाच्या जलसाठ्यातून ८०८० क्युसेक एकूण विसर्ग सर्व मार्गाने होत आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदी पात्रातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील बंधारे भरणार आहेत. शिवाय नदीकाठावरील गावांची तहान भागणार असून लाभक्षेत्रातील विहीरींची पाणीपातळी वाढणार आहे. गोदावरी नदी पात्रातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातले सर्व बंधाऱ्याचे दरवाजे उघडे करून खालील बंधाऱ्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे.

आवक बंदनाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून होणारे विसर्ग चार दिवसापासून बंद करण्यात आल्याने गुरुवारी धरणात येणारी आवक निरंक झाली. मात्र धरणाचा जलसाठा ९१.९९ % झाल्याने धरणातून विसर्ग करण्यात येऊन धरणात आगामी काळातील संभाव्य पूर नियंत्रित करण्यासाठी पॉकेट तयार करण्यात येत आहे. मराठवाड्यात पाणी टंचाई असल्याने तेथील पाणीटंचाईचे निवारण होणार असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणgodavariगोदावरीWaterपाणीAurangabadऔरंगाबाद