शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

१०० दिवसात मिळाले केवळ ८१९ कुटुंबांच्या डोक्यावर छत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:05 AM

महाआवास ग्रामीण योजना थंडावली : २२ हजार १६२ कुटुंब घराच्या प्रतीक्षेत, खुलताबाद, सिल्लोड, सोयगावचे काम मंदावले --- लोकमत न्यूज ...

महाआवास ग्रामीण योजना थंडावली : २२ हजार १६२ कुटुंब घराच्या प्रतीक्षेत, खुलताबाद, सिल्लोड, सोयगावचे काम मंदावले

---

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : राज्यात मुख्यमंत्र्यांनी सुरु केलेल्या महत्त्वाकांक्षी महाआवास ग्रामीण योजनेतून १०० दिवसात विविध योजनांचा कृतीसंगम घडवून लाभार्थ्याला घरकुल उभारुन देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, १०० दिवसात केवळ ८१९ घरकुलांची उभारणी झाली. जिल्ह्यात घरकुल उभारणी ४४.४० टक्क्यांपुढे गेली नाही. मंजूर ३९ हजार २५ घरांपैकी केवळ १७ हजार ७०० घरकुले पूर्ण झाली असून, २२ हजार १६२ कुटुंब डोक्यावर हक्काचे छत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

२० नोव्हेंबर २०२०ला राष्ट्रीय घरकुल दिनानिमित्त सुरु झालेल्या योजनेवेळी ३९ हजार ८६२ घरकुल बांधणीचे उद्दिष्ट होते. त्यावेळी जिल्ह्यात ३१ हजार ६९९ घरकुलांना मंजुरी तर १६ हजार ८८१ घरकुले पूर्णत्वास आली होती. गेल्या १०० दिवसात केवळ ८१९ घरकुले बांधून पूर्ण झाली तर ७ हजार ३२६ लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली. आता २२ हजार १६२ घरकुले विविध कारणांनी पूर्ण झालेली नाहीत. पंतप्रधान, रमाई, शबरी, पारधी आवास योजना या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येतात. प्रत्यक्षात गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ही कामे होतात.

कोरोनाचा प्रादुर्भाव महाआवास योजनेच्या सुरुवातीपासून पुढील १०० दिवस कमी होता. मात्र, तिन्ही योजनांचे काम ४५ टक्क्यांपेक्षा अधिक होऊ शकले नाही. सुरुवातीला आघाडीवर असलेल्या खुलताबाद, ग्रामविकास राज्यमंत्र्यांचा मतदार संघ असलेल्या सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील घरकुले पूर्ण होण्याचे प्रमाण सर्वात कमी असून, गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यात काम अधिक झालेले दिसते.

---

पंतप्रधान आवास योजनेची

५ वर्षातील १० हजार ८९२ घरकुले अपूर्ण

---

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये २०१६-१७चे ६६१, २०१७-१८चे ३५४, २०१८-१९चे २४२, २०१९-२०चे २,८२६, २०२०-२१चे ६,८०९ अशी १० हजार ९९२ घरे अद्याप पूर्ण व्हायची आहेत. तर या योजनेतून ११ हजार २७१ घरे पूर्ण झाली. म्हणजेच मंजूर घरकुलांपैकी ५०.८६ टक्के लाभार्थ्यांचे घरकुल पूर्ण झाले. औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक काम या योजनेतून झाले असून, सोयगाव तालुक्यात सर्वात कमी काम झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

---

रमाई योजनेची ३४.५१ टक्के घरकुले पूर्णत्वास

--

रमाई आवास योजनेतून गेल्या पाच वर्षात १५ हजार २९७ घरे बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १४ हजार ६७४ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. मध्यंतरी निधीअभावी घरकुले अपूर्ण अवस्थेत होती. मात्र, जानेवारीच्या सुमारास निधीचा प्रश्न सुटल्याने रमाई घरकुल योजनेच्या कामाला गती आली. आतापर्यंत ५ हजार २७९ घरे पूर्ण झाली तर १० हजार १८ घरे अपूर्ण असून, हे प्रमाण केवळ ३४.५१ टक्के आहे. खुलताबाद तालुक्याचे सर्वाधिक काम असून, तुलनेत औरंगाबाद, फुलंब्री तालुक्यातील काम कमी दिसते.

----

‘शबरी आवास’चे ४७.४७ टक्के काम

---

शबरी आवास योजनेतून २,२३२ घरकुलांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून मंजुरी देण्यात आली. त्यापैकी १,१२३ घरे पूर्ण झाली असून, १ हजार २३४ घरे अपूर्ण आहेत. खुलताबाद तालुक्याचे काम सर्वाधिक ६८.५२ टक्के काम झाले असून, सर्वात कमी काम औरंगाबाद तालुक्याचे आहे.