शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

वाळूज उद्योगनगरीतील ८३२ कारखानदारांकडे ८ कोटींचा कर थकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 5:17 PM

वाळूज महानगर : रांजणगाव ग्रामपंचायतीचा ८३२ कारखान्यांकडे ८ कोटीचा कर थकीत असून, आतापर्यंत केवळ १२६ कारखानदारांनी जवळपास ३ कोटी रुपयाचा कर भरला आहे. थकीत कराचा भरणा करण्यासाठी कारखानदार टाळाटाळ करीत असल्याने ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले असून, विकास कामे रखडल्याचा आरोप केला जात आहे.

वाळूज महानगर : रांजणगाव ग्रामपंचायतीचा ८३२ कारखान्यांकडे ८ कोटीचा कर थकीत असून, आतापर्यंत केवळ १२६ कारखानदारांनी जवळपास ३ कोटी रुपयाचा कर भरला आहे. थकीत कराचा भरणा करण्यासाठी कारखानदार टाळाटाळ करीत असल्याने ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले असून, विकास कामे रखडल्याचा आरोप केला जात आहे.

वाळूज उद्योगनगरीतील अर्थिकदृष्टया संपन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात लहान-मोठे ९५८ कारखाने आहेत. चालु अर्थिक वर्षात या कारखान्याकडे ९ कोटी ८८ लाख ३ हजार ३ रुपयांचा कर थकीत आहे. या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाºया १२६ कारखान्यांनी नोव्हेंबर अखेरपर्यंत २ कोटी ८७ लाख १ हजार ७०० रुपयाचा कर ग्रामपंचायतीकडे भरला आहे.

ग्रामपंचायतीने उर्वरित संबंधित कारखानदारांना कराचा भरणा करण्यासाठी वेळोवेळी नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, बहुतांश कारखानदार कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने या ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले आहे. परिमाणी गावातील विकास कामे रखडली असून, गावातील नागरिकांच्या रोषाला ग्रामपंचायत पदाधिकाºयांना सामारे जावे लागत आहे. उद्योनगरीत रोजगारांची संधी उपलब्ध झाल्यामुळे देशाच्या विविध भागांतून आलेले कामगार गावात स्थायिक झाले आहेत. या कामगारामुळे गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायत प्रशासनाची दमछाक होत आहे.

शासनाच्या विविध योजना तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून मिळणारा निधी लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असल्यामुळे गावातील विकास कामांना ब्रेक लागत आहे. किमान नागरी सुविधा मिळविण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असून, पुरेशा निधीअभावी गावातील विकास कामे रखडली आहेत.

विकास कामांवर होतोय परिणामग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाºया ९५८ पैकी ८३२ कारखान्यांनी ग्रामपंचायतीचा ७ कोटी ७९ लाख ३१ हजार ८३५ रुपयाचा कर थकविला आहे. शासन नियमानुसार कर आकारणी करुनही कारखानदार टाळाटाळ करीत असल्याने थकबाक वाढतच आहे. परिणामी गावातील विविध विकास कामांवरही विपरीत परिणाम होत आहे.

जप्तीची मोहिम राबविणारग्रामपंचायतीचा थकीत कर भरण्यास कारखानदार टाळाटाळ करीत असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने जप्तीची मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात थकबाकीदार कारखानदारांना नोटीसा बजावून कराचा भरणा लवकर न केल्यास पोलिस बंदोबस्तात जप्तीची मोहिम राबवून कारखान्याची यंत्र सामुग्री जप्त केली जाणार असल्याची माहिती प्रभारी सरपंच मोहनीराज धनवटे, ग्रामविकास अधिकारी एस.एन.रोहकले यांनी दिली.--------------------------------------

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबाद