शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

शॉटसर्किटने लागलेल्या आगीने ८ एकरवरील फळबागा जळून खाक; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 18:25 IST

आज गुढीपाडवा नवीन वर्ष साजरा करण्यात सर्व व्यस्त असताना सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास अचानक शेतात आग लागली

सिल्लोड: विद्युतवाहिनीच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीने सर्वे नंबर ३४९ मधील रजाळवाडी शिवारातील आठ एकरवरील फळबागा जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी घडली. आगीमध्ये आंबा, सीताफळ, जांभूळ, करवंदांच्या फळबागांसह त्यातील ठिबक सिंचन प्रणाली, शेतीचे साहित्य, औजारे, वखार, मोटार, पाईप असे साहित्य जळून शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

महेश शंकरपेल्ली यांनी रजाळवाडी शिवारात सन २०१० मध्ये फळबाग लागवड केली. नैसर्गिक व सेंद्रिय पद्धतीने या बागेची जोपासना करण्यात आली. बागेमध्ये त्यांनी विविध झाडांची लागवड करून जैवविविधता जोपासलेली होती. ही सेंद्रिय बाग पाहण्यासाठी कोकण, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणाहून शेतकरी भेट देण्यास येत. दरम्यान, आज गुढीपाडवा नवीन वर्ष साजरा करण्यात सर्व व्यस्त असताना सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास शेतातून गेलेल्या विद्युतवाहिनीच्या घर्षणामुळे ठिणगी पडली. छोट्या ठिणगीमुळे बागेतील वाळलेले गवत पेटले, हवा वाहत असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. काही वेळातच आगीमध्ये आंबा, सीताफळ, जांभूळ, करवंदांच्या फळबागांसह त्यातील ठिबक सिंचन प्रणाली, शेतीचे साहित्य, औजारे, वखार, मोटार, पाईप असे साहित्य जळून खाक झाले. 

या घटनेची माहिती मिळताचतलाठी सज्जा सिल्लोड काशिनाथ ताठे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. महावितरण सिल्लोडचे अधिकारी यांनी येऊन घटनास्थळी प्राथमिक चौकशी करून, पंचनामा करण्याचे आश्वासन दिले असे शंकरपेल्ली यांनी सांगितले. झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने करून द्यावी, अशी शंकरपेल्ली यांनी मागणी केली आहे. दरम्यान, सन २०१८  मध्ये सुद्धा अशाच प्रकारे आग लागून त्यांची दीड एकर बाग जळाली होती. त्यावेळी सुद्धा त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.   

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद