शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शॉटसर्किटने लागलेल्या आगीने ८ एकरवरील फळबागा जळून खाक; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 18:25 IST

आज गुढीपाडवा नवीन वर्ष साजरा करण्यात सर्व व्यस्त असताना सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास अचानक शेतात आग लागली

सिल्लोड: विद्युतवाहिनीच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीने सर्वे नंबर ३४९ मधील रजाळवाडी शिवारातील आठ एकरवरील फळबागा जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी घडली. आगीमध्ये आंबा, सीताफळ, जांभूळ, करवंदांच्या फळबागांसह त्यातील ठिबक सिंचन प्रणाली, शेतीचे साहित्य, औजारे, वखार, मोटार, पाईप असे साहित्य जळून शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

महेश शंकरपेल्ली यांनी रजाळवाडी शिवारात सन २०१० मध्ये फळबाग लागवड केली. नैसर्गिक व सेंद्रिय पद्धतीने या बागेची जोपासना करण्यात आली. बागेमध्ये त्यांनी विविध झाडांची लागवड करून जैवविविधता जोपासलेली होती. ही सेंद्रिय बाग पाहण्यासाठी कोकण, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणाहून शेतकरी भेट देण्यास येत. दरम्यान, आज गुढीपाडवा नवीन वर्ष साजरा करण्यात सर्व व्यस्त असताना सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास शेतातून गेलेल्या विद्युतवाहिनीच्या घर्षणामुळे ठिणगी पडली. छोट्या ठिणगीमुळे बागेतील वाळलेले गवत पेटले, हवा वाहत असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. काही वेळातच आगीमध्ये आंबा, सीताफळ, जांभूळ, करवंदांच्या फळबागांसह त्यातील ठिबक सिंचन प्रणाली, शेतीचे साहित्य, औजारे, वखार, मोटार, पाईप असे साहित्य जळून खाक झाले. 

या घटनेची माहिती मिळताचतलाठी सज्जा सिल्लोड काशिनाथ ताठे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. महावितरण सिल्लोडचे अधिकारी यांनी येऊन घटनास्थळी प्राथमिक चौकशी करून, पंचनामा करण्याचे आश्वासन दिले असे शंकरपेल्ली यांनी सांगितले. झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने करून द्यावी, अशी शंकरपेल्ली यांनी मागणी केली आहे. दरम्यान, सन २०१८  मध्ये सुद्धा अशाच प्रकारे आग लागून त्यांची दीड एकर बाग जळाली होती. त्यावेळी सुद्धा त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.   

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद