शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

७८ महाविद्यालयांच्या अनुदानाचा प्रश्न काही सुटेना; २४ वर्षांपासून प्राध्यापक विनावेतन राबतात

By राम शिनगारे | Updated: March 6, 2025 13:58 IST

अनुदान मिळण्याच्या प्रतीक्षेत २४ वर्षांपासून प्राध्यापक विनावेतन; ५ वेळा झाल्या फक्त तपासण्याच

छत्रपती संभाजीनगर : राज्यात २००१ पूर्वीची ७८ वरिष्ठ महाविद्यालये, २४ तुकड्या आणि १४ विषयांना अनुदान देण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा तपासण्या करण्यात आल्या. मुंबईतील आझाद मैदानात २५० दिवस बेमुदत धरणे आंदोलन करणाऱ्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना आश्वासनावर बोळवण करण्यात आल्याचे यातून स्पष्ट झाले. २४ वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले काही प्राध्यापक विनावेतनच निवृत्तही झाल्याची धक्कादायक माहिती आहे.

राज्यात कायम विनाअनुदानित धोरण २४ नोव्हेंबर २००१ रोजी लागू करण्यात आले. हे धोरण लागू होण्यापूर्वीच शासनाने ७८ महाविद्यालयांना विनाअनुदानित म्हणून मान्यता दिलेली होती. त्यामुळे ही महाविद्यालये अनुदानास पात्र ठरतात. या महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अनुदान मिळण्याच्या प्रतीक्षेत तब्बल २४ वर्षे काढली. मुंबईतील आझाद मैदानात ६ फेब्रुवारी ते १३ ऑक्टोबर २०२४ असे २५० दिवस बेमुदत धरणे आंदोलन केले. तेव्हा शासन व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत झालेल्या चर्चेनुसार विभागीय सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करून अनुदान देण्याविषयीचा अहवाल संचालकांना पाठविण्यात आला. त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या ताेंडावर अनुदानाच्या प्रतीक्षेतील प्राध्यापकांना सत्ताधाऱ्यांकडून केवळ आश्वासनेच मिळाली.

पाच वेळा तपासण्याराज्यातील ७८ महाविद्यालयांना अनुदान देण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा तपासण्या केल्या आहेत. २०१० मध्ये पहिल्यांदा ७८ महाविद्यालयांना अनुदान देण्यासाठी प्रस्ताव तयार केला. तेव्हा तपासणी केली. त्यानंतर महायुती सरकारने २०१४, २०१८ मध्ये पुन्हा तपासणी केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने २०२१ साली तपासणी केली. या तपासणीनंतर पुन्हा सत्तेत आलेल्या महायुती सरकारने २०२४ मध्ये तपासणी केली. मात्र अद्याप अनुदान काही दिलेले नाही.

अर्थमंत्रालयाची नकारात्मक भूमिकाया ७८ महाविद्यालयांना अनुदान देण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने शिफारस केलेली आहे. मात्र, प्रत्येक वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विभाग असलेल्या अर्थमंत्रालयाने नकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हा प्रश्न निकाली निघत नसल्याचेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

उच्च न्यायालयात दाद मागूराज्य शासनाने ७८ महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान देणे नितांत गरजेचे आहे. २४ वर्षांपासून अनुदानासाठी लढा देत आहोत; पण शासनाकडून फक्त आश्वासन मिळते. प्रश्न निकाली काढला जात नाही. महिनाभरात तिढा न सुटल्यास उच्च न्यायालयात दाद मागू.- डॉ. भाऊसाहेब झिरपे, अध्यक्ष, राज्य कृती समिती

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcollegeमहाविद्यालयState Governmentराज्य सरकार