शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राज्यात ७५ हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 20:19 IST

एकट्या महाराष्ट्रात १९९८ च्या कार्यभारानुसार प्राध्यापकांच्या ७५ हजार जागा रिक्त आहेत.

औरंगाबाद : देशातील उच्चशिक्षण कठीण अवस्थेतून जात आहे. विद्यापीठ अनुदान आयोग बंद केला आहे. आता उच्चशिक्षा आयोग स्थापन करून त्यावर मागच्या दाराने आपलीच माणसे घुसविण्याचा प्रयत्न होत आहे. एकट्या महाराष्ट्रात १९९८ च्या कार्यभारानुसार प्राध्यापकांच्या ७५ हजार जागा रिक्त आहेत. प्राध्यापक सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त जागांची भरतीच केली जात नाही. यामुळे मूलभूत शिक्षणाचा पायाच ठिसूळ केला जात असल्याचा आरोप एमफुक्टोच्या राज्य अध्यक्षा डॉ. ताप्ती मुखोपाध्याय यांनी केला.

देशव्यापी एआयफुक्टो प्राध्यापक संघटनेशी संलग्न असलेल्या एमफुक्टो आणि बामुक्टो या संघटनेतर्फे देवगिरी महाविद्यालयात विभागीय मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यापूर्वी एमफुक्टोच्या अध्यक्षा ताप्ती मुखोपाध्याय, एआयफुक्टोच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉ. मधु परांजपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुखोपाध्याय म्हणाल्या, संघटनेने सातव्या वेतन आयोगासाठी राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. मात्र या आयोगाच्या पूर्वी प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरल्या पाहिजेत. यासाठी वेतन आयोग लांबला तरी काही फरक पडत नाही. याच वेळी कंत्राटी पद्धतीवर दिले जाणारे तुटपुंजे वेतन अन्यायकारी आहे.

समान काम करणाऱ्या एका प्राध्यापकाला लाख रुपये महिना आणि कंत्राटी प्राध्यापकाला दहा हजार रुपये महिना दिला जातो. यातून एकप्रकारची विषमता निर्माण होत आहे. ही नष्ट करण्यासाठी एमफुक्टो, एआयफुक्टो लढणार असल्याचेही मुखोपाध्याय यांनी स्पष्ट केले. तसेच उच्चशिक्षणाविषयी निर्माण झालेल्या समस्याच सत्तेवर असलेल्या सरकारला घालविण्यासाठी जबाबदार राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बामुक्टोचे अध्यक्ष डॉ. बाप्पासाहेब म्हस्के, सचिव डॉ. विक्रम खिलारे, डॉ. दिलीप बिरुटे, जिल्हाध्यक्ष डॉ. उमाकांत राठोड, डॉ. शूजात कादरी, डॉ. शफी शेख, डॉ. मारोती तेगमपुरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Professorप्राध्यापकState Governmentराज्य सरकारEducationशिक्षण