शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

बजाज आॅटो कंपनीकडून ७५ टक्के पाण्याची बचत

By admin | Updated: May 12, 2016 00:54 IST

औरंगाबाद : भीषण टंचाई परिस्थितीत विविध उपाययोजनांचा वापर करून वाळूजच्या बजाज आॅटोने पाण्याच्या वापरात लक्षणीय घट केली आहे.

औरंगाबाद : भीषण टंचाई परिस्थितीत विविध उपाययोजनांचा वापर करून वाळूजच्या बजाज आॅटोने पाण्याच्या वापरात लक्षणीय घट केली आहे. उत्पादनात सातत्याने वाढ होत असताना २०११-१२ च्या तुलनेत २०१५-१६ यावर्षी ७५ टक्के पाण्याची बचत करून बजाज आॅटोने मराठवाड्यातील उद्योगांसमोर अनोखा आदर्श निर्माण केला आहे.सलग चौथ्या वर्षी मराठवाडा भीषण दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत आहे. उद्योगांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या जायकवाडी धरणातील जिवंत साठा केव्हाच संपला आहे. मृतसाठ्यातून आतापर्यंत १६ कोटी घनमीटर पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. यावरून भीषण टंचाईची कल्पना येते. या पार्श्वभूमीवर बजाज आॅटोने विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत केली आहे. २०११-१२ या वर्षाच्या तुलनेत २०१५-१६ मध्ये पाण्याचा वापर एकतृतीयांशपेक्षाही कमी झाला असल्याचे बजाज आॅटोचे उपाध्यक्ष (मॅन्युफॅक्चरिंग) डी. एन. नार्वेकर यांनी सांगितले.अशी केली बचतपाण्याची बचत करण्यासाठी बजाज आॅटोने विविध उपक्रम हाती घेतले. 1 पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठविण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसाच्या पाण्याचे फेरभरण करणारी यंत्रणा कंपनीत उभारण्यात आली. कंपनीत पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविले जात आहे. 2 वापरलेल्या शंभर टक्के पाण्यावर ‘आरओ प्लँट’मध्ये प्रक्रिया करून कारखान्यातील विविध कामांसाठी त्याचा वापर करण्यात आला. 3 सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर ‘टॉयलेट’ तसेच बगिच्यांसाठी केला जात आहे.4 पाण्याच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच पाण्याचा काटकसरीने वापर होतो की नाही, हे पाहण्यासाठी कंपनीत पाण्याचे मीटर बसविण्यात आले आहेत.5 जमिनीखालील अशुद्ध पाण्याच्या पाईपलाईन तसेच फायर हायड्रंट लाईन्स गंजू नयेत तसेच त्यातून पाण्याची गळती होऊ नये, यासाठी या पाईपलाईन्स बदलून त्या जमिनीवरून टाकण्यात आल्या आहेत.‘सीआयआय’तर्फे तीन पुरस्कारसकारात्मक पद्धतीने पाण्याचा वापर करणारा उद्योग म्हणून वाळूजच्या बजाज आॅटोची ओळख आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केल्याबद्दल कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीजने (सीआयआय) बजाज आॅटोचा ‘एक्सलन्स वॉटर इफिशियन्ट युनिट’ म्हणून तीन वेळा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.पाणी बचतीसाठीव्यापक प्रयत्न हवेतमराठवाडा भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत बजाज आॅटोने पाण्याचा कमीत कमी वापर करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे पाणी वापरात ७५ टक्के बचत झाली आहे. टंचाईवर मात करण्यासाठी इतर उद्योगांनीही नवनवीन कल्पना राबवून पाणी बचतीसाठी प्रयत्न करावेत. - डी. एन. नार्वेकर, उपाध्यक्ष (मॅन्युफॅक्चरिंग), बजाज आॅटोपाण्याचा काटकसरीने वापर करून त्याची बचत करणे सध्याच्या परिस्थितीत नितांत गरज आहे. पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र अभियान’ सुरू केले आहे. पाणी बचतीसाठी तुम्ही नवनवीन कल्पना राबवीत असाल, तर आपले अनुभव आम्हाला ९८८१३००४९४, ९८८११९७३९८ या क्रमांकावर कळवावेत.