शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

740 जणांना जीवदान

By admin | Updated: July 7, 2014 00:19 IST

विलास चव्हाण, परभणी येथील जिल्हा रुग्णालयात मागील वर्षभरात कीटकनाशक प्राशन करणाऱ्या ७९० रुग्णांपैकी तब्बल ७४० जणांचे जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे़

विलास चव्हाण, परभणीयेथील जिल्हा रुग्णालयात मागील वर्षभरात कीटकनाशक प्राशन करणाऱ्या ७९० रुग्णांपैकी तब्बल ७४० जणांचे जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे़आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीमुळे मनुष्याचे आयुष्यमान वाढत आहे़ परंतु, काही जण घरातील क्षुल्लक भांडणे, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जीवनात आलेल्या नैराश्यातून कीटकनाशक प्राशन करून आपला लाखामोलाचा जीव संपविण्याचा प्रयत्न करतात. त्यांना जीवनदान देण्याचे कार्य जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी केले आहे.पूर्वी ग्रामीण भागात एकत्र कुंटुब पद्धत अस्तित्वात होती़ त्यावेळी घरातील वडिलधारी अथवा कारभारी व्यक्ती कोणत्याही संकटाला सामोरे जात होती. त्यामुळे घरातील लहान भांवडांना अथवा महिलांना संकटाला कसे सामोरे जावे याचे एक प्रकारे प्रशिक्षण मिळत होते़ परंतु, गेल्या काही वर्षापासून विभक्त कुंटुंब पद्धत अस्तित्वात येत आहे़ यामुळे ‘हम दो हमारे दो’ या कुंटुंबपद्धतीमुळे मुलांना सामाजिक जिम्मेदारीचे भानच राहिले नाही़ जो-तो स्वत:साठीच जगत आहे़ घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास कुंटुंबावर आभाळ कोसळत आहे़ अशा प्रतिकूल परिस्थितीत आपले कोणीच जवळचे नसल्याने अनेक जण संकटाला सामोरे जाण्याऐवजी कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपवत आहेत़ जिल्ह्यात २०१३-१४ या वर्षभरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केलेल्यांची संख्या खालीलप्रमाणे - एप्रिल महिन्यात- ५, मे - ५, जून- ३ , जुलै- ३, आॅगस्ट- ४, सप्टेंबर- ९, आॅक्टोबर- ६, नोव्हेंबर- १, डिसेंबर- ३, जानेवारी- ६, फेब्रुवारी- २, मार्च-३ असे एकूण ५० जणांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़जिल्हा रुग्णालयात मोफत उपचारकीटकनाशक प्राशन केलेले अथवा साप चावलेल्या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार केले जातात़ परंतु, खाजगी रुग्णालयात मात्र याच उपचारांसाठी ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो़ ७९० जणांवर उपचार येथील जिल्हा रुग्णालयात कीटकनाशक प्राशन करणाऱ्या तब्बल ७९० जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले़ ते पुढीलप्रमाणे- एप्रिल महिन्यात- ४०, मे - ५९, जून- ५० , जुलै- ४८, आॅगस्ट- ९९, सप्टेबर- ९९, आॅक्टोबर- ६८, नोव्हेबर- ५५, डिसेंबर- ६८, जानेवारी- १००, फेब्रुवारी- ५३, मार्च-५१ असे एकूण ७९० जणांनी कीटकनाशक प्राशन केले होते़सावधगिरी बाळगाआॅगस्ट ते आॅक्टोबर या महिन्यात सोयाबीन, कपाशीवर फवारणी करताना शेतकरी किंवा मजूर कोणतीही सुरक्षा बाळगत नाहीत़ त्यामुळे कीटकनाशक तोंडात जाते. तसेच शेतात साप चावण्याच्या घटनाही घडतात़ यामुळे आॅगस्ट ते आॅक्टोबर या महिन्यात कीटकनाशक प्राशन व साप चावलेले रुग्ण अधिक येतात. या काळात शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्तघरगुती भांडणे, ताण-तणाव, संकटांला घाबरून अनेक जण कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करीत आहेत़ यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त असल्याची माहिती, अस्थिव्यंग विभागाचे प्रमुख डॉ़ प्रकाश डाके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़