शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

कडाक्याच्या थंडीत औरंगाबादमध्ये पोलिसांची ७२ तास ड्यूटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 12:29 IST

विविध भागांत झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांमुळे सोमवारी रात्रीपासून अलर्ट झालेल्या पोलिसांना ७२ तास बंदोबस्तासाठी रस्त्यांवर काढावे लागले. 

औरंगाबाद : कोरेगाव-भीमाच्या घटनेचे सोमवारी सायंकाळपासून शहरात तीव्र पडसाद उमटले आणि बघता बघता तीन दिवस शहर तणावाखाली होते. विविध भागांत झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांमुळे सोमवारी रात्रीपासून अलर्ट झालेल्या पोलिसांना ७२ तास बंदोबस्तासाठी रस्त्यांवर काढावे लागले. 

संवेदनशील आणि चळवळीचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या औरंगाबादेत सोमवारी सायंकाळपासून कोरेगाव-भीमा येथील घटनेचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. पीरबाजार, उस्मानपुरा येथून हजाराहून अधिक लोकांनी निषेध मोर्चा काढून क्रांतीचौक गाठले. अचानक रस्त्यावर आलेल्या या मोर्चेकर्‍यांना परवानगी नाकारली आणि तेथील एका शोरूमवर पहिला दगड फेकण्यात आला अन् तणावाला सुरुवात झाली. उस्मानपुर्‍यासह विविध भागांत दुकाने बंद झाली. या घटनेपासून अलर्ट झालेल्या पोलिसांनी एसआरपीची एक तुकडी सोबत घेऊन संवेदनशील भागात मोर्चा सांभाळला.

पोलीस अधिकारी, कर्मचारी सुट्या आणि रजा रद्द करून कर्तव्यावर हजर झाले. प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त, ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिकारी-कर्मचार्‍यांसोबत एसआरपीच्या चार कंपन्यांतील चारशे जवान सोमवारी रात्रीपासून ते आज गुरुवार सायंकाळपर्यंत रात्रंदिवस गस्तीवर होते. तब्बल ७२ तास पोलिसांना टुथ ब्रशही करता आला नाही. कोणता दगड कोठून येईल याचा नेम नसतो, ही बाब ओळखून डोक्यावर लोखंडी हेल्मेट ठेवून पोलिसांना मिळेल तो नाश्ता उभे राहूनच करावा लागला. 

गेल्या काही दिवसांपासून पारा १० अंशांपर्यंत घसरला आहे. शहरवासी ऊबदार कपड्यात घरात आरामशीर झोपलेले असताना त्यांच्या जीवित आणि मालमत्तांचे रक्षण करण्यासाठी कडाक्याच्या थंडीत तीन रात्री पोलिसांनी जागून काढल्या. काही विशेष पोलीस अधिकार्‍यांनीही पोलिसांना याकामी मदत केली. 

अन्नाची पाकिटेपोलिसांची रात्रंदिवस सुरू असलेली धावपळ पाहून मुकुंदवाडी येथील शिवसेना पदाधिकारी बाबासाहेब डांगे यांनी पोलिसांसाठी बुधवारी सकाळी नाश्त्याची पाकिटे वाटप केली. तसेच सिंधी कॉलनीतील गुरुद्वारातर्फे पोलिसांना सुमारे अडीच हजार अन्नाची पाकिटे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले. तर तरुणांच्या ग्रुपने पोलिसांना मोफत चहा व पाण्याच्या बाटल्या दिल्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस