शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत ७० हजार पथदिव्यांचा लखलखाट; एकही दिवा बंद राहणार नाही याची मनपाकडून काळजी

By मुजीब देवणीकर | Updated: October 24, 2022 13:46 IST

महापालिका प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिवाळीचे खास नियोजन करण्याची सूचना सर्व विभागांना दिली.

औरंगाबाद : दिवाळी हा प्रकाशोत्सव असतो. महापालिकेच्या विद्युत विभागाने यंदा दिवाळीत शहरातील एकही पथदिवा बंद राहणार नाही, यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. मागील आठ दिवसांत बंद असलेले सर्व पथदिवे सुरू करण्यात आले. ७० हजार पथदिव्यांचा लखलखाट दररोज रात्री रस्त्यांवर पडत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ए. बी. देशमुख यांनी दिली.

महापालिका प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिवाळीचे खास नियोजन करण्याची सूचना सर्व विभागांना दिली. प्रामुख्याने पाणीपुरवठा, पथदिवे आणि घनकचरा विभागाला कोणत्याही तक्रारी येणार नाहीत, याची काळजी घ्यावी असे सांगितले होते. त्यानुसार सर्व विभागांनी चांगले नियोजनही केल्याचे दिसून येत आहे. विद्युत विभागाने इलेक्ट्राॅन या खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अगोदर कोणत्या भागात पथदिवे बंद आहेत, याचे सर्वेक्षण केले. त्यानंतर पथदिवे कोणत्या कारणामुळे बंद आहेत, याची माहिती घेतली. बहुतांश ठिकाणी केबलचा मुद्दा होता. काही ठिकाणी तर फक्त अर्थिंगमुळे दिवे बंद असल्याचे समोर आले. युद्धपातळीवर सर्व पथदिवे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

सर्व नऊ झोनमधील ६०० पेक्षा अधिक पथदिवे रात्रंदिवस काम करून सुरू करण्यात आल्याचे देशमुख यांनी नमूद केले. दररोज रात्री मनपा आणि खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील प्रमुख रस्त्यांवर संयुक्तरित्या पाहणीही करण्यात येत आहे. एकही पथदिवा बंद दिसला तरी इलेक्ट्राॅनचा चमू दहा मिनिटांमध्ये पोहोचून दिवा सुरू करीत आहे. वसाहतींमधील अंतर्गत रस्त्यांवरील पथदिवा बंद असल्याची तक्रार प्राप्त होताच संबंधित चमू प्रतिसाद देत असून, अद्याप अशा प्रकारच्या तक्रारीही मनपाकडे नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDiwaliदिवाळी 2022