शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

देवळाई येथील तलावात वर्षभरात ७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:50 IST

देवळाईलगत गांधेली तलावात मुरुमाचा उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने काही ठिकाणी खोल तर काही ठिकाणी उथळ भौगोलिक अवस्था निर्माण झाली आहे. दगडाचे धोकादायक कठडे असल्याने तलावाच्या पाण्यात उतरणे वर्षभरात ७ जणांच्या जिवावर बेतले आहे.   

औरंगाबाद : देवळाईलगत गांधेली तलावात मुरुमाचा उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने काही ठिकाणी खोल तर काही ठिकाणी उथळ भौगोलिक अवस्था निर्माण झाली आहे. दगडाचे धोकादायक कठडे असल्याने तलावाच्या पाण्यात उतरणे वर्षभरात ७ जणांच्या जिवावर बेतले आहे.  

या तलावाच्या परिक्षेत्रात कुणीही जाऊ नये व त्यासाठी खबरदारी घेऊन चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या वतीने धोकादायक तलावाच्या पाण्यात कोणीही उतरू नये, उतरल्यास त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा नोटीसवजा सूचना बोर्ड लावण्यात आला होता. किमान सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर येथील बोर्ड कुणी तरी काढून फेकला असून, उन्हाचा उकाडा जसा वाढत गेला अन् पाण्यात उतरण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. मित्र परिवारासह निघालेल्या युवकांनी पाण्यात उतरून आंघोळ करण्यासाठी उडी मारली. पाण्यात पोहत दूरपर्यंत फेरी मारली अन् अचानक पाण्यात बुडाला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करून त्याचा शोध स्थानिक नागरिक, अग्निशामक विभागाने घेतला.

ही पहिलीच घटना नाही तर चिकलठाणा पोलिसांच्या नोंदणीनुसार पाण्यात बुडून हा सातवा मृत्यू झाला आहे. हा धोकादायक तलाव असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना असून, येथील बहुतांश नागरिक व मुलेदेखील पाण्यात उतरत नाहीत. तलावातील हजारो टन मुरूम, मातीचा उपसा झाला असल्याने भौगोलिक रचना अत्यंत धोकादायक आहे. पाण्याचा साठा पाहून पाण्यात उतरण्याचा मोह उन्हाळ्यात अनेकांना होतो. तलावाची माहिती नसल्याने धोक्याच्या घटना अर्ध्या डझनाच्या वर घडल्या आहेत. ग्रामपंचायत लक्ष देणारच आहे;परंतु पोलिसांची दिवसातून एकदा तरी गस्त असावी. कारवाईच्या भीतीने तलावात कुणी उतरणार नाही, असे उपसरपंच अमोल तळेकर म्हणाले. 

रहदारीच्या ठिकाणी तार कुंपण हवेदेवळाई रोडवरून जाताना काही अंतरावर तलाव असल्याने पाणी दिसते; परंतु या तलावाला तारेचे कुंपण लावून नोटीस बोर्डाद्वारे पाण्यात उतरण्यास बंदी घालावी, अशी मागणी अनेक नागरिकांतून व्यक्त होत आहे. 

ग्रामपंचायतीला दिल्या सूचनातलावात कोणी उतरू नये, असा बोर्ड पुन्हा लावणार आहोत; परंतु तलाव गांधेली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने त्यांनीदेखील तलाव परिक्षेत्रात कुणीही उतरू नये, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी खबरदारी घ्यावी, असे चिकलठाणा पोलिसांनी पत्र पाठवून सूचित केले आहे, असे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूSatara areaसातारा परिसरAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस