शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

देवळाई येथील तलावात वर्षभरात ७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:50 IST

देवळाईलगत गांधेली तलावात मुरुमाचा उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने काही ठिकाणी खोल तर काही ठिकाणी उथळ भौगोलिक अवस्था निर्माण झाली आहे. दगडाचे धोकादायक कठडे असल्याने तलावाच्या पाण्यात उतरणे वर्षभरात ७ जणांच्या जिवावर बेतले आहे.   

औरंगाबाद : देवळाईलगत गांधेली तलावात मुरुमाचा उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने काही ठिकाणी खोल तर काही ठिकाणी उथळ भौगोलिक अवस्था निर्माण झाली आहे. दगडाचे धोकादायक कठडे असल्याने तलावाच्या पाण्यात उतरणे वर्षभरात ७ जणांच्या जिवावर बेतले आहे.  

या तलावाच्या परिक्षेत्रात कुणीही जाऊ नये व त्यासाठी खबरदारी घेऊन चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या वतीने धोकादायक तलावाच्या पाण्यात कोणीही उतरू नये, उतरल्यास त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा नोटीसवजा सूचना बोर्ड लावण्यात आला होता. किमान सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर येथील बोर्ड कुणी तरी काढून फेकला असून, उन्हाचा उकाडा जसा वाढत गेला अन् पाण्यात उतरण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. मित्र परिवारासह निघालेल्या युवकांनी पाण्यात उतरून आंघोळ करण्यासाठी उडी मारली. पाण्यात पोहत दूरपर्यंत फेरी मारली अन् अचानक पाण्यात बुडाला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करून त्याचा शोध स्थानिक नागरिक, अग्निशामक विभागाने घेतला.

ही पहिलीच घटना नाही तर चिकलठाणा पोलिसांच्या नोंदणीनुसार पाण्यात बुडून हा सातवा मृत्यू झाला आहे. हा धोकादायक तलाव असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना असून, येथील बहुतांश नागरिक व मुलेदेखील पाण्यात उतरत नाहीत. तलावातील हजारो टन मुरूम, मातीचा उपसा झाला असल्याने भौगोलिक रचना अत्यंत धोकादायक आहे. पाण्याचा साठा पाहून पाण्यात उतरण्याचा मोह उन्हाळ्यात अनेकांना होतो. तलावाची माहिती नसल्याने धोक्याच्या घटना अर्ध्या डझनाच्या वर घडल्या आहेत. ग्रामपंचायत लक्ष देणारच आहे;परंतु पोलिसांची दिवसातून एकदा तरी गस्त असावी. कारवाईच्या भीतीने तलावात कुणी उतरणार नाही, असे उपसरपंच अमोल तळेकर म्हणाले. 

रहदारीच्या ठिकाणी तार कुंपण हवेदेवळाई रोडवरून जाताना काही अंतरावर तलाव असल्याने पाणी दिसते; परंतु या तलावाला तारेचे कुंपण लावून नोटीस बोर्डाद्वारे पाण्यात उतरण्यास बंदी घालावी, अशी मागणी अनेक नागरिकांतून व्यक्त होत आहे. 

ग्रामपंचायतीला दिल्या सूचनातलावात कोणी उतरू नये, असा बोर्ड पुन्हा लावणार आहोत; परंतु तलाव गांधेली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने त्यांनीदेखील तलाव परिक्षेत्रात कुणीही उतरू नये, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी खबरदारी घ्यावी, असे चिकलठाणा पोलिसांनी पत्र पाठवून सूचित केले आहे, असे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूSatara areaसातारा परिसरAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस